Month: May 2025

ट्रेण्डिंग

हेमंत ढोमेने केली नवीन चित्रपटाची घोषणा

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे याने ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट मराठी शाळांची घटती संख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व, यावर प्रकाश टाकणार आहे. हेमंत ढोमे याने याआधी ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत, आणि आता […]Read More

ट्रेण्डिंग

पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद

भारताने ३० एप्रिलपासून २३ मेपर्यंत पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. या हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये अनेक पर्यटकांचा समावेश होता. भारताने या निर्णयाद्वारे पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. […]Read More

विज्ञान

जपान अंतराळात करणार सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती

जपानने अंतराळातून सौरऊर्जेचा वापर करून पृथ्वीवर वीज निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे नाव “ओहिसामा” (OHISAMA) आहे, ज्याचा अर्थ जपानी भाषेत “सूर्य” असा होतो. हा प्रकल्प सौरऊर्जेचा वापर करून स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये:सौरऊर्जेचे संकलन आणि रूपांतरण: ऊर्जेचे पृथ्वीवर प्रक्षेपण: मायक्रोवेव्हच्या स्वरूपात ऊर्जा पृथ्वीवर […]Read More

ट्रेण्डिंग

नमामि गंगे’च्या धर्तीवर राज्यातही गोदावरी,चंद्रभागा, पंचगंगा होणार स्वच्छ

महाराष्ट्रातील गोदावरी, चंद्रभागा आणि पंचगंगा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारने नमामी गंगे योजनेच्या धर्तीवर विशेष आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नद्यांचे पाणी स्वच्छ करणे, त्यांचे पर्यावरणीय संतुलन राखणे आणि त्यांना जैवविविधतेसाठी अनुकूल बनवणे हा आहे. पंढरपूरची श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी, नाशिक ते नांदेडपर्यंत वाहणारी गोदावरी नदी आणि कोल्हापूर व शिरोळदरम्यानची पंचगंगा […]Read More

आरोग्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आता जिल्ह्याच्या ठिकाणी …

मुंबई, दि. १ :– राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, त्यानुसार या कक्षाचे आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री / मंत्री/ राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. […]Read More