परभणी, दि. ५ —माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही […]Read More
महाबळेश्वर, 5 मे – थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दिनांक २ ते ४ मे रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. परंतु, व्ही.आय.पी व मंत्र्यांच्या ताफ्यामुळे अक्षरशः काही पर्यटकांची चांगलीच जिरली. त्यामुळे या महोत्सवाला पर्यटन मुक्त महोत्सव साजरा झाल्याची टीका होऊ […]Read More
जालना दि ५:– जालना आणि बदनापूर शहरासह परिसरात गारांचा पाऊस झालाय. यामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात आजपासून पुढील काही दिवस गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार जालना आणि बदनापूर शहरासह परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यावेळी अचानक पाऊस आल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली होती.दरम्यान, जालन्यात पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात […]Read More
मुंबई, दि. 5वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून (Contingency Reserve) पाणी उपलब्ध करून दिले आहे. सद्यस्थितीचा विचार करता मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नाही. दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन […]Read More
सातारा दि ५–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाबळेश्वर, जि. सातारा येथे ‘महापर्यटन उत्सव – सोहळा महाराष्ट्राचा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम […]Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महापर्यटन उत्सव – सोहळा महाराष्ट्राचा’ येथे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथील शिवसागर जलाशयातील 10 अत्याधुनिक जेटस्की बोटींचे लोकार्पण केले. जागतिक दर्जाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील जलपर्यटनाला चालना मिळणार आहे. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री उदय सामंत, […]Read More
मुंबई दि ५– राज्यात बारावीचा एकूण निकाल 91.88 टक्के इतका लागला असूनराज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण 14 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच 91.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, यंदा निकालाचा टक्का घसरला […]Read More
सांगली दि ५– म्हैस आणि गाईच्या दुध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ झाली आहे. सदरची वाढ तातडीने लागू करण्यात आली आहे. दूध उत्पादक व विक्रेता संघटनेने काल सांगलीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला. यापूर्वी म्हशीचे दूध दर 66 रुपये लिटर तर गाईचे दूध दर पन्नास रुपये लिटर याप्रमाणे होते. त्यात आता प्रति लिटर दोन […]Read More
पुणे दि ५– संगणक आणि लॅपटॉप रिपेरिंग करणारा पुण्यातील ताडीवाल रोड वस्तीतील रहिवासी प्रशांत कांबळे कबीर कला मंचच्या संपर्कात आला. नोव्हेंबर १५, २०१० रोजी मुंबईला कामानिमित्त जातो असे सांगून तो घरातून निघून गेला, मात्र परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबाने १८ जानेवारी २०११ रोजी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे मिसिंग रिपोर्ट दाखल केला. ATS ने २०११ दरम्यान […]Read More
पुणे दि. ४ :– राज्यात “वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन” ही योजना अंमलात आणण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात कुठल्याही उपनोंदणी कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करता येणार आहे. राज्यभरातील नागरिकांना ही योजना दिलासा देणारी ठरणार आहे. यापुढे एकाच जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार असल्यामुळे वेळ आणि कागदपत्रांचा त्रास टळणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. […]Read More