महाड दि ८– रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्याततळा-मांदाड रस्त्यावर एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २० प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींमधील ९ प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.अपघातातील जखमींना तात्काळ माणगाव येथील उप रुग्णालयात दाखल करण्यात […]Read More
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर “आयटीआयच्या” हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*
मुंबई, दि.8आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमांची केली घोषणा*ठाणे, जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात […]Read More
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. एवढेच नाही तर हा चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा चित्रपट १६ मे रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. […]Read More
मुंबई, दि.8कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडले असून कळवा मुंब्रा […]Read More
पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने ९ मे पर्यंत ७ राज्यांमधील २७ विमानतळ बंद केले आहेत. ही राज्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आहेत. प्रमुख विमानतळांमध्ये श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगड, जोधपूर, राजकोट, धर्मशाला, अमृतसर, भुज आणि जामनगर यांचा समावेश आहे. हे विमानतळ पाकिस्तान सीमेला लागून आहेत. […]Read More
मुंबई, दि. 8मुंबई महानगरातील मालमत्ताधारकांना मालमत्ताकर संबंधित विविध सेवासुविधांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेता यावा तसेच कर भरणा प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालमत्ताकर संदर्भात ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. या ऑनलाइन सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबईतील मालमत्ताधारकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/#/loginया संकेतस्थळावर जाऊन ‘आपले ग्राहक ओळखा’ (केवायसी) ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका […]Read More
मुंबई, दि. ८– मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर आज मुंबई उपनगर पालकमंत्री ऍड आशिष शेलार यांनी कामाबद्दल असमाधान व्यक्त करीत गेल्या सव्वा महिन्यात काही ठिकाणी 10 टक्के तर काही ठिकाणी 20 ते 30 पेक्षा जास्त काम झालेले दिसत नाही, एकूण कामे ही बेभरवशाची आहेत, असे निरिक्षण माध्यमांशी बोलताना नोंदवले.आज ऍड आशिष शेलार यांनी मुंबई पश्चिम […]Read More
नागपूर दि ८– आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांचा सॅनफ्रान्सिस्को येथे स्टेट ऑफ कॅलिफोर्निया, द काऊंटी ऑफ सॅंटा क्लारा ह्यूमन रिलेशन कमिशन यांच्यातर्फे ‘आउटस्टँडिंग इन्वॅल्युएबल सर्विस’ हे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.मागील सहा वर्षांपासून सॅनफ्रान्सिस्को येथे रेस्टॉरंट चालवत असलेल्या विष्णू मनोहर यांनी दिलेल्या सामाजिक योगदानासाठी त्यांना कमिशनचे आयुक्त नरेंद्र पाठक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित […]Read More
भारतीय सैन्यानं 6 मेला मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर आता पाकिस्तानात स्फोटांची मालिका सुरु झाली. कराची, रावळपिंडी, लाहोर, गुजरावालासह अनेक शहरांमध्ये स्फोट झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात घबराट आहे. कराची सकाळच्या सुमारास स्फोट झाले. त्यानंतर आता अन्य शहरांमध्ये स्फोटांची मालिका सुरु झाली आहे. लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात चार जण जखमी […]Read More
बीड दि ८…अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी (घाट) गावात नगर भोजनाच्या कार्यक्रमानंतर सुमारे ५० जणांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री गावात नगर भोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पहाटेपासून अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी अशा तक्रारी जाणवू लागल्या. यानंतर ग्रामस्थांना घेऊन सरपंच काशिनाथ कातकडे यांनी […]Read More