Month: May 2025

विदर्भ

इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून क्रिटिकल अर्थ मिनरल्स

नागपूर दि १०– भारतीय खाण ब्युरो (IBM), राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) च्या सहकार्याने हॉटेल रेडिसन ब्लू, नागपूर येथे “खाणीतील कचऱ्यापासून दुर्मिळ खनिजे काढणे – संधी आणि आव्हाने” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला संबोधित करतांना भारतीय खाण ब्युरो आयबीएम नागपूरचे प्रभारी महा नियंत्रक पी . एन . शर्मा […]Read More

देश विदेश

G-7 राष्ट्रांकडून भारत- पाकला परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. १० : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकच्या आडमुळेपणाविरोधात भारताने कठोर पावले उचलली आहेत. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या या युद्धस्थितीबाबत अलिप्त राहण्याचे धोरण अमेरिकेने स्वीकारले आहेत. तर G-7 देशांनी आज दोन्ही देशांनी सुसंवादाद्वारे युद्धस्थितीवर तत्काळ नियंत्रण आणावे असे आवाहन केले आहे. सात देशांच्या गटाने (G7) शनिवारी दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील लष्करी संघर्षाच्या वाढत्या वाढीच्या […]Read More

देश विदेश

बलुच आर्मीने पाक विरोधात दिला स्वातंत्र्याचा नारा

इस्लामाबाद. दि. ९ : पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानची पुरती पिछेहाट केली आहे. पाकला विविध आघाड्यांवर पराभूत करत भारतीय सैनिक पराक्रम गाजवत आहेत. बेजार झालेल्या पाकची आता दुसऱ्या बाजूनेही कोंडी झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पाकच्या अत्याचारांविरुद्ध लढणाऱ्या पाकमधील बलुचिस्तान या प्रातांने या अस्थिरतेचा फायदा करून घेत स्वातंत्र्याचा नारा दिला आहे. बलुचिस्तानच्या […]Read More

ट्रेण्डिंग

सिंधू पाणी करारावरून पाकला अजून एक झटका

नवी दिल्ली, दि. ९ : सिंधू पाणी करारावरून जागतिक बँकेने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. आम्ही भारताला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडू शकत नाही, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी म्हटले आहे. तसेच द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये मध्यस्थाव्यतिरिक्त संस्थेची कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बंगा म्हणाले की, हा करार दोन्ही देशांमधील आहे आणि जर ते […]Read More

ऍग्रो

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी

मुंबई दि ९– राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय आज राज्य सरकारने जारी केला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देण्यात आली होती. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने आणि पुढाकाराने मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा शासन […]Read More

राजकीय

जत येथे नवे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय

मुंबई दि ९ — जत,जि. सांगली येथील वाहन नोंदणी संख्या, एकूण लोकसंख्या याचा विचार करता स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणे गरजेचे होते. त्यामुळे जतला (MH- 59 या नावाने ) नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक म्हणाले की,जत चे स्थानिक आमदार गोपिचंद पडळकर यांनी […]Read More

Uncategorized

स्टार्टअप ही लोकचळवळ झाली पाहिज़े- मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ९ :- एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, त्यामुळेच भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जात होते. देशाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्टार्टअप ही लोकचळवळ व्हायला हवी, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. आज सहभागी झालेल्या कार्यक्रमात शासनाच्या सहा विभागांनी र्स्टाटअप्स […]Read More

राजकीय

मुंबई मेट्रोचा प्रवास सुसाट; बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो

मुंबई, दि. ९ — मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानका दरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र […]Read More

राजकीय

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर

मुंबई दि ९ — एसटी महामंडळ दरवर्षी ५ हजार याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन.२०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सी.एन.जी. व एल.एन.जी. सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रीड करून चालणाऱ्या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही. अशी […]Read More

बिझनेस

ही ठरली भारतातील सर्वांत फायदेशीर स्टार्टअप कंपनी

मुंबई, दि. ९ : २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६२३ कोटींचा निव्वळ नफा OYO ही देशातील सर्वांत फायदेशीर स्टार्टअप कंपनी झाली आहे. हॉटेल आणि ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म देणाऱ्या कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत १७२% जास्त नफा कमावला आहे. कंपनीच्या कागदपत्रांनुसार, OYO Statupचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २२९ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २५ मध्ये ६२३ कोटी रुपयांवर […]Read More