Month: May 2025

शिक्षण

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या

मुंबई, दि. १२ — महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर […]Read More

विदर्भ

बुद्ध पौर्णिमा विविध कार्यक्रमाने साजरी..

बुलडाणा दि १२– असे मानले जाते की भगवान बुद्ध यांचा जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना या दिवशीच बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून आजचा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो.. आशियातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलढाणा अर्बन परिवाराने बुद्ध जयंती निमित्त पुज्यनिय महाथेरो धम्मज्योतीजी भंतेजी, पुज्यनिय स्वरानंद भंतेजी […]Read More

विदर्भ

गडचिरोलीमध्ये मोठी कारवाई : नक्षलवादी छावणी उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त..

गडचिरोली दि १२:–गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भामरागड दलमने नव्याने सुरू झालेल्या कावंडे फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (FOB) जवळ जंगलात छावणी उभारल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना काल (११ मे) दुपारी मिळाली होती. या माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० कमांडोंच्या ‘सी-६०’ पथकाने सायंकाळी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान

पुणे दि १२– श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील करण्यात आला. वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, […]Read More

देश विदेश

आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला, संरक्षण दलाने केले स्पष्ट

नवी दिल्ली, दि. ११ : ऑपरेशन सिंदूर च्या सशस्वीतेबद्दल सांगण्यासाठी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायूदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, तसंच पाकिस्तानच्या लष्कराच्या 35-40 जवानांचा या ऑपरेशनमध्ये मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या लष्कराने दिली. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर कशाप्रकारे एअर स्ट्राईक केला, […]Read More

महानगर

महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये सुरु होणार ‘आपले सरकार सेवा केंद्र’

मुंबई, दि. ११ : राज्यातील नागरी सेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने आता महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरु केली जाणार आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून, लवकरच या केंद्रांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या सेवा केंद्रांतून अर्ज स्वीकारण्याबरोबरच, संगणकीय स्वरूपातील प्रमाणपत्रे व दस्तऐवज देखील उपलब्ध करून दिले जातील. शहरातील […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरातून या शहरांसाठी थेट विमान सेवा

येत्या 15 मेपासून बेंगळुरू, हैदराबाद आणि नागपूर या मेट्रो शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. या नव्या सेवेमुळे कोल्हापूरची सात मेट्रो शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असून, स्थानिक नागरिकांना प्रवासात मोठी सुलभता मिळणार आहे. नुकतेच याबाबत संजय घोडावत समुहाच्या स्टार एअरने याबाबत घोषणा केली आहे. सध्या स्टार एअर कोल्हापूरहून अहमदाबाद, मुंबई आणि तिरुपती या तीन […]Read More

देश विदेश

संरक्षण मंत्र्यांनी केले ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग केंद्राचे उद्घाटन

लखनऊ, दि. ११ : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या सर्वात मोठ्या एकत्रीकरण आणि चाचणी केंद्राचे उद्घाटन लखनऊ येथे केले. उद्घाटनाच्या वेळी त्यांनी स्पष्ट केले की, ब्राह्मोस हे केवळ एक शस्त्र नाही, तर भारताच्या सैनिकी सामर्थ्याचा शक्तिशाली संदेश आहे. हे उत्पादन आणि चाचणी केंद्र उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये स्थापन करण्यात […]Read More

राजकीय

राजकोटवर नव्याने उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण….

सिंधुदुर्ग दि ११– जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिभव्य पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. जमिनीपासून 91 फूट उंचीचा हा अतिभव्य असा पुतळा विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातील सर्वात उंच असा हा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच उभारण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री […]Read More

ट्रेण्डिंग

राज्याच्या या भागात पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट बंद

पेट्रोलपंपावर डिजिटल पेमेंट केल्यावर सायबर फ्रॉडचे काही गुन्हे घडले आहेत. याला आळा घालण्यासाठी आता पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पेट्रोल पंप चालक संघटनांनी या बाबत माहिती दिली असून १० मे पासून UPI आणि इतर डिजिटल मेपेंट स्वीकारणे बंद करण्यात येणार आहे. विदर्भ आणि नाशिक विभागात हा निर्णय प्रथम आमलात येणार आहे.Read More