खेड (जामगे ) दि १३–श्री क्षेत्र कोटेश्वरी मनाई मंदिर, खेड (जामगे) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडत आहे. या धार्मिक उत्सवाच्या अनुषंगाने, काल लोकनेते मा. रामदासभाई कदम नाट्यगृह येथे “थेट तुमच्या घरातून” या विनोदी नाटकाचा ५० वा सुवर्ण प्रयोग संपन्न झाला.या विशेष प्रयोगाला रामदासभाई कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम […]Read More
नवी दिल्ली, १३ : भारतीयांसाठी चिप-आधारित बायोमेट्रिक ई-पासपोर्ट सादर करण्यात आले आहे. या नवीन सुविधेसह भारत आता अमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स आणि यूके सारख्या १२० हून अधिक देशांच्या यादीत सामील झाला आहे. जिथे हे तंत्रज्ञान आधीच वापरले जात आहे. ई-पासपोर्टमुळे इमिग्रेशन प्रक्रिया जलद आणि संपर्करहित होणार असून ओळखीची फसवणूकदेखील रोखण्यास मदत होईल. पासपोर्ट सेवा कार्यक्रम […]Read More
अंदमानात मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. निकोबार बेटांवर मागील 24 तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 6 जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली […]Read More
यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे. पुणे : 94.81 टक्केनागपूर : 90.78 टक्केसंभाजीनगर : 92.82 टक्केमुंबई : 95.84 टक्केकोल्हापूर : 96.78 […]Read More
पुणे दि १३– पुण्यातील कोथरूड, सिंहगड रस्ता आणि वारजे परिसरात आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात घट झाली असून, उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामानाचा अंदाज: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये १६ मेपर्यंत हलका पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे दैनंदिन तापमान […]Read More
जालना दि १३– जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी, कुंभारी, लिंगेवाडी, बेलोरा यासह आसपासच्या गावात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. पावसाचा जोर इतका होता की छोटे-मोठे ओढे खळखळून वाहायला लागलेत. यामुळे रस्त्याच्यावरून ओढ्यांचे पाणी वाहत असल्याने नागरिकांची ये – जा करायला प्रचंड गैरसोय होतेय. दरम्यान, जालना जिल्ह्यात मागील 3 […]Read More
चंद्रपूर दि १३:– राज्यातील प्रादेशिक आणि राखीव जंगलांमध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मचाण वन्यजीव गणना केली जाते. हजारोच्या संख्येत वन्यजीव प्रेमी खास तयार केलेल्या पाणवठ्याजवळील उंच मचाणीवर बसून रात्रभर वन्यजीव आणि पक्षी यांचे मनसोक्त दर्शन घेतात. निसर्गानुभव या नावाने वनविभागाच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला जातो. यासाठी आदल्या संध्याकाळी या सर्व वन्यजीवप्रेमींना त्यांच्या नियोजित मचाणीवर […]Read More
मुंबई, दि. 13अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिकपणे महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारच्यावतीने चालवली जाते. मात्र, एवढे असून महाराष्ट्र राज्य लॉटरीला लोकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ही लॉटरी इतर राज्यांच्या लॉटरीच्या तुलनेत मागे पडली आहे. त्यासाठी राज्य लॉटरीने स्वतःची ऑनलाईन लॉटरी सुरू करावी, परराज्यातील लॉटरीवर नियंत्रण ठेवावे आणि इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य लॉटरीची जाहिरात राज्य सरकारने […]Read More
मुंबई, दि.१३ : भारत- पाक दरम्यानच्या युद्धस्थितीमुळे स्थगिती करण्यात आलेले IPL सामने आता 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहेत. 3 जून ला या सिरिज मधील अंतिम सामना होणार आहे. बीसीसीआयने 13 साखळी आणि 4 प्लेऑफ असे एकूण 17 सामने हे 17 मे 3 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. साखळी फेरीतील 13 सामने हे बंगळुरु […]Read More
मुंबई, दि.12‘ऑपरेशन सिंदूर’वर व भारतीय लष्कराच्या पराक्रमाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण करणारे उबाठा खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची चौकशी करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईवर संशय घेणारे संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन्ही खासदारांच्या तोंडून पाकिस्तानची भाषा बाहेर पडत असून ते […]Read More