Month: May 2025

ट्रेण्डिंग

माजी सर न्यायाधीश चंद्रचूड या विद्यापीठातून शिकवणार कायद्याचे धडे

नवी दिल्ली, दि. १६ : भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची दिल्ली येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एनएलयू) मध्ये सुप्रतिष्ठ प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता धनंजय चंद्रचूड हे विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे देणार आहेत. या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात एनएलयू विद्यापीठ प्रशासनाने म्हटलं आहे की, “नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली येथे सुप्रतिष्ठ प्राध्यापक म्हणून भारताचे माजी […]Read More

महानगर

वानखेडे स्टेडीअमवर रोहीत शर्माच्या नावाचं स्टॅण्ड

मुंबई, दि. १६ : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये विशेष स्टँड उभारला आहे. याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. हा सन्मान त्याच्या उल्लेखनीय क्रिकेट कारकीर्दीचा आणि मुंबई क्रिकेटमधील योगदानाचा गौरव करण्यासाठी दिला गेला आहे. वानखेडे स्टेडियममधील या विशेष सोहळ्याला रोहित शर्मा यांचे आई-वडील पूर्णिमा […]Read More

देश विदेश

भारताने केला कच्च्या तेलाच्या आयातीचा विक्रम

भारताने मार्च २०२५ मध्ये दररोज ५४ लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केला आहे. २०२५ आणि २०२६ मध्ये भारतातील कच्च्या तेलाची मागणी सर्वात वेगाने वाढण्याची अपेक्षा असून ही मागणी चीनच्या मागणीच्या दुप्पट असेल, असे ओपेकने म्हटल असून वाढत्या ऊर्जेच्या गरजांमुळे ही मागणी वाढत आहे. मागणीतील ही वाढ २०२५ मध्ये चीनच्या तेलमागणीतील १.५ टक्के […]Read More

देश विदेश

महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंग संघाची खेलो इंडिया युथ गेम्समध्ये झळाळती कामगिरी

मुंबई, दि 16बिहार येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंग संघाने ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांची प्रभावी कमाई करत राज्याचा झेंडा उंचावला. विशेष म्हणजे, मुलींच्या गटात महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद आणि मुलांच्या गटात सांघिक उपविजेतेपद पटकावून एकूण वर्चस्व सिद्ध केले.साईराज परदेशी (३ राष्ट्रीय विक्रमांसह), अस्मिता ढोणे (२ राष्ट्रीय विक्रमांसह), […]Read More

राजकीय

‘ऑपरेशन सिंदूर’मागील भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षिय खासदार जाणार परदेशांत

नवी दिल्ली, दि. १६ : ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार सर्व पक्षांच्या खासदारांना परदेशात पाठवणार आहे . २२ मे पासून ५-६ खासदारांचे ८ गट १० दिवसांसाठी ५ देशांना भेट देतील. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहिती तेथील सरकार आणि सामान्य लोकांना देतील. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू खासदारांच्या परदेश दौऱ्यांचे सूत्रसंचालन […]Read More

देश विदेश

लंडनमध्ये फेटाळला फरार नीरव मोदीचा जामीन अर्ज

पीएनबी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी फरार नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. लंडनमधील किंग्ज बेंच डिव्हिजन हायकोर्टाने सुनावणीनंतर तो फेटाळला. भारताच्या वतीने सीबीआयच्या वकिलाने नीरवच्या युक्तिवादांना विरोध केला होता. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) कर्ज घेऊन सुमारे १४ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर, तो जानेवारी २०१८ मध्ये देश […]Read More

राजकीय

लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर

मुंबई, दि. १६ — भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]Read More

देश विदेश

भारताची तालिबानशी प्रथमच थेट चर्चा

नवी दिल्ली, दि. १६ : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज तालिबान-शासित अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल जयशंकर यांनी मुत्ताकी यांचे आभार मानले. अफगाण-भारत संबंधांबाबत खोट्या बातम्या आणि गैरसमज पसरवण्याच्या प्रयत्नांचा मुत्ताकी यांनी केलेला निषेधही त्यांनी स्वागतार्ह असल्याचे सांगितले. तालिबानने काबूलमध्ये सत्ता घेतल्यापासून […]Read More

विदर्भ

अवकाळी पावसाचा तडाखा,संत्रा बागांना नुकसान..

अमरावती दि १६– अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील ऊसळगव्हाण येथे शेतात उभा असलेला बीएसएनएल टॉवर वादळी वाऱ्याने जमिनीवर कोसळला. यात टॉवरचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच उन्हाळी हंगामात असलेल्या भुईमूग,संत्रा पिकाला देखील मोठा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मात्र या पावसामुळे तापमानात घट […]Read More

महाराष्ट्र

राज्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने समिती करणार आंदोलन

मुंबई, दि 16राज्यात माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीच्यावतिने मंगळवार दि. २० मे, २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पुर्व), मुंबई येथिल महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष व जेष्ठ कामगार […]Read More