Month: May 2025

विदर्भ

मुसळधार पावसाने भुईमूगाच नुकसान, हातातोंडाशी आलेला घास हिरावला….

वाशीम दि १७:– वाशीम जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या हळद आणि भुईमूग काढणीचा हंगाम सुरू असताना, अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची मेहनत वाया घातली आहे. वाशीम तालुक्यातील सुदी शेतशिवारात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. मोठ्या प्रमाणावर भुईमूग शेतात काढून सुकवण्यासाठी पसरवलेली असताना, शेतकऱ्यांना आपल्या पिकांना झाकण्याची वेळसुद्धा मिळाली […]Read More

आरोग्य

मुंबई महापालिकेचा सुविधा उपक्रम: शहराच्या स्वच्छतेसाठी एक मोठे पाऊल

मुंबई, दि. १७ : मुंबई महापालिकेने (BMC) शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नव्या प्रणालीची पायाभरणी करत “सुविधा” हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईसारख्या महानगरात स्वच्छतागृहांची कमतरता आणि अस्वच्छता ही मोठी समस्या होती. यावर उपाय म्हणून, BMC ने हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या सहकार्याने सुविधा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित […]Read More

देश विदेश

आग्नेय आशियाई देशांमध्ये कोरोनाची लाट

नवी दिल्ली, दि. १७ : आग्नेय आशियातील देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ झाली असून, चीन आणि थायलंडमध्ये देखील संक्रमण दर वाढत आहे. सिंगापूरमध्ये 3 मेपर्यंत 14,200 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात ही संख्या तब्बल 28% ने वाढली आहे. सिंगापूरमध्ये LF.7 आणि NB.1.8 […]Read More

देश विदेश

भारत-बांगलादेशच्या सीमेवर वाढला तणाव

ढाका, दि. १६ : भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष चालू असताना आता दुसरीकडे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. भारत सीमेवरून काही लोकांना बांगलादेशच्या सीमेत पाठवत आहे, असा आरोप करत बांगलादेशने सीमेवर गस्त वाढवली आहे. याच कारणामुळे सध्या बांगलादेशने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय नागरिकत्त्व नसलेल्या लोकांना भारताकडून बांगलादेशमध्ये पाठवले जात असल्याचा दावा […]Read More

ट्रेण्डिंग

Swiggy, Zomato पावसाळ्यात लागू करणार दरवाढ

मुंबई, दि. १६ : पावसाळ्यात ग्राहकांना फूड डिलिव्हरीवर वाढीव अधिभाराचा फटका सहन करावा लागणार आहे. झोमॅटो गोल्ड आणि स्विगी वन या दोन्ही प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर दिलेल्या प्रीमियम सबस्क्रिप्शन सर्व्हीसमध्ये नोंदणी केलेल्यांना हवामानाशी संबंधित वाढीदरम्यान अतिरिक्त शुल्क भरण्यापासून सूट दिली होती.आता हा लाभ बंद केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. झोमॅटो गोल्ड आणि स्विगी […]Read More

राजकीय

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून

मुंबई, दि. १६ : — भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत 09 जून 2025 पासून सुरू होत आहे. या 5 दिवसांच्या विशेष […]Read More

राजकीय

भाजपा हॉकर्स युनियन फेरीवाला यांच्या पाठीशी

मुंबई, दि 16मुंबईतील ठिकाणी अधिकृत फेरीवाल्यांवर नाहक महापालिका पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. न्यायालयाचा आदेश आहे की अधिकृत परिवलन कडे कारवाई करू नये परंतु महापालिका प्रशिक्षण आणि पोलीस प्रशासन या आदेशाला केराची टोपली दाखवून अनधिकृत फेरीवाला तसेच अधिकृत फेरीवाला यांच्यावर ही कारवाई करत आहे. हे कुठेतरी चुकीची असून त्याचा निषेध आम्ही नोंदवत असून यापुढे अधिकृत […]Read More

पर्यावरण

मुंबईच्या ऑक्सिजनची जबाबदारी पालघर जिल्ह्याने स्वीकारली

पालघर दि १६:– वाढत्या वातावरण बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी एक कोटी बांबू वृक्षांची लागवड करून हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्याबरोबरच शेजारच्या महामुंबईला ऑक्सीजन पुरवण्यासाठी आता आदिवासी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. पालघर जिल्हा प्रशासन आणि श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून ‘मिशन बांबू लागवडी’चा महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार वनपट्टे तसेच खाजगी जमिनीवर बांबू लागवड […]Read More

राजकीय

सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक

पोर्ट ब्लेअर दि १६ —सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस असून त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज अंदमान निकोबार चे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेतली. मंत्री ॲड आशिष शेलार आज अंदमान निकोबार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सेल्युलर जेल […]Read More

देश विदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न

सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ चा वापर करून राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजूर करण्यासाठी एक अंतिम मुदत दिली होती. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम १४३ चा वापर करून सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रपती आणि राज्यपालांचे अधिकार, न्यायालयीन हस्तक्षेप आणि कालमर्यादा निश्चित करणे यासारख्या मुद्द्यांवर मुर्मू यांनी स्पष्टीकरण मागितले आहे.राष्ट्रपती आणि राज्यपालांचे […]Read More