Month: May 2025

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन

पुणे, दि. २० : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर (86) यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. विज्ञान संशोधनातील योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण या भारतीय नागरी सन्मानांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. डॉ नारळीकर यांनी 1988 मध्ये पुण्यात ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेची स्थापना […]Read More

मनोरंजन

‘अंधार माया’ हॉरर वेबसिरिज लवकरच ZEE5 वर

मुंबई, दि. १९ : ZEE5 वर लवकरच ‘अंधार माया’ ही हॉरर ओरिजनल सीरीज रिलिज होणार आहे. या सीरिजचा हादरवून टाकणारा ट्रेलर रीलिज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून, शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या एरिकॉन टेलिफिल्म्सने सीरिजची निर्मिती केली आहे. ‘अंधार माया’ची कथा आणि संवाद लोकप्रिय लेखक-अभिनेते प्रल्हाद […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्वर ते रत्नागिरी जोडणार अत्याधुनिक केबल-स्टे ब्रिज

मुंबई, दि. १९ : महाबळेश्वर आणि रत्नागिरी यांना थेट जोडणारा एक आधुनिक केबल-स्टे ब्रिज उभारला जात आहे. मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंकवरून (Bandra-Worli Sea Link) प्रेरणा घेतलेला हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला केबल-स्टे ब्रिज असेल. 540 मीटर लांबीचा आणि 14 मीटर रुंदीचा हा पूल असून, त्याच्या मध्यवर्ती भागात 43 मीटर उंचीची एक व्ह्यू गॅलरी उभारली जात […]Read More

राजकीय

शेतकऱ्यांना सिबल स्कोअरची अट न घालता कर्ज पुरवठा करा

मुंबई, दि. 19 – शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबल स्कोअर मागू नका, हे वारंवार सांगितले, तरी बँका सिबल स्कोअर मागतात. त्यावर आजच्या बैठकीतच तातडीने तोडगा सांगा. यापूर्वी अशा बँकावर शासनाने एफआयआर पण केले आहेत. हा विषय तुम्हालाच गांभीर्याने घ्यावा लागेल. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना कर्ज देताना CIBIL मागू नका, मुख्यमंत्र्यांचे बँकांना आदेश

मुंबई, दि. १९ : आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी सिबिलची मागणी करू नये, असे आदेश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ICICI, HDFC आणि Axis या खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकांना चांगलेच खडेबोल सुनावले. ते म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांच्याकडे सिबिलची मागणी करू […]Read More

बिझनेस

भारत-पाक तणावामुळे वाढणार सुक्यामेव्याचे दर

मुंबई, दि. १९ : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा परिणाम सुकामेव्याच्या बाजारावर दिसून येत आहे. सध्या काजू, अंजीर, बदाम, मनुका, किसमिस आणि अक्रोड यांसारख्या सुकामेव्याचे दर १०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत.या वाढीमागे मुख्यतः आयातीवरील अडथळे आणि वाहतूक खर्चातील वाढ हे कारण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेवर कडक पावले उचलली आहेत. परिणामी व्यापारमार्ग बंद […]Read More

मराठवाडा

सहकारी संस्था पुनर्निर्माण, दरेकरांनी घेतली बैठक…

छ संभाजीनगर दि १९– राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची बैठक आज सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीस छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड-वाघाळा, जालना, हिंगोली या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, महानगरपालिका, […]Read More

राजकीय

“एकत्र निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत चर्चा करताना वस्तुनिष्ठ भूमिका

मुंबई, दि. १९ – संविधान (१२९वे सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (सुधारना) विधेयक, २०२४ या अनुषंगाने आयोजित संयुक्त समितीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त आज मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित विषयांवर व्यापक व मुद्देसूद चर्चा झाली. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, […]Read More

महानगर

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड-१९ रुग्णांचा होणार उपचार

मुंबई प्रतिनिधीकोविड-१९ हा आजार आता एक प्रस्थापित (Endemic) आणि निरंतर चालणारी आरोग्य समस्या म्हणून गणली जाते. या आजाराचा विषाणू वस्ती पातळीवर स्थिरावला असल्याने, कोविड आजाराचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात अधून मधुन आढळून येतात. मागील काही दिवसांत सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी […]Read More

कोकण

मुंबई – गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव

सिंधुदुर्ग नगरी : मुंबई – गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या 179 व्या पुण्यतिथी निमित्त ओरस येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारकात आयोजित अभिवादन सभेत एस.एम.देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री नितेश राणे होते. एस.एम. म्हणाले, मुंबई – गोवा […]Read More