Month: May 2025

मराठवाडा

अवकाळी पावसाचा कहर, 87 जनावरे दगावली, शेतीला बसला फटका…

जालना दि २१:– जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात मागील दहा दिवसांमध्ये 7 जणांसह 87 जनावरे अंगावर वीज पडून दगावली आहेत. तर 1925 हेक्टरवरील शेतीला ही अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार 187 गावातील 2 हजार 645 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यात 1 […]Read More

महानगर

मुक्त तसेच ई वेबसाईट व ई पेपर वर काम करणाऱ्या

मुंबई प्रतिनिधी : सरकारने मुक्त तसेच ई वेबसाईट व ई पेपर वर काम करणाऱ्या पत्रकारांना दर महिना 10 हजार रुपये पेन्शन स्वरूपात द्यावेत अशी मागणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन चे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई यांनी नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मुक्त पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर मोठे संकट ओढवले असून त्यांना […]Read More

मनोरंजन

अक्षय कुमारने परेश रावलांवर दाखल केला 25 कोटींचा दावा

मुंबई, दि. २० : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने परेश रावल यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. हा वाद ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या संदर्भात आहे, ज्याचे चित्रीकरण परेश रावल यांनी अचानक सोडल्याचा आरोप आहे. अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊसने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावर सोडल्यामुळे […]Read More

पर्यावरण

अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन

मुंबई दि २०– महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. 22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र […]Read More

महानगर

रायगडमधील पोशीर प्रकल्पास ६ हजार ३९४ कोटी

मुंबई, दि. २० : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास 6394.13 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर 12.344 टी.एम.सी.चे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 9.721 टी.एम.सी.आहे. त्यापैकी पिण्यासाठी 7.933 टी.एम.सी. आणि औद्योगिक वापरासाठी […]Read More

महानगर

MGL ला बायोमेथेनेशन प्रकल्पासाठी देवनार येथील भूखंड

मुंबई दि २०– महानगर गॅस लिमिटेड कंपनीला देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारचे गोबरधन योजनेअंतर्गत शहरी भागात 75 बायोमेथेनेशन प्रकल्पासह 500 नवीन बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी येणारा खर्च तेल आणि वायू विपणन संस्था करणार आहे. मात्र […]Read More

महानगर

पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय

मुंबई दि २० — आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून आता पालघर जिल्ह्याला MH-60 ही नवीन परिवहन ओळख मिळाली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ९ एप्रिल रोजी संपर्कमंत्री या नात्याने पालघर येथे झालेल्या लोकदरबारामध्ये लवकरच पालघर मधील नागरिकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय […]Read More

राजकीय

‘माझे घर, माझा अधिकार’ राज्याचे गृहनिर्माण धोरण, ३५ लाख घरांच्या

मुंबई, दि. २० : राज्याच्या गृहनिर्माण धोरण 2025 ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘माझे घर, माझा अधिकार’ हे ब्रीद अनुसरून वर्ष 2030 पर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घराचे अभिवचन देणाऱ्या राज्याच्या गृह निर्माण धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या […]Read More

ट्रेण्डिंग

NCERT ची 2.5 कोटींची पायरेटेड पुस्तके जप्त

नवी दिल्ली, दि. २० : दिल्ली पोलिसांनी काल एनसीईआरटी चा १.७ लाखांहून अधिक पायरसी केलेली पाठ्यपुस्तके जप्त केली. त्याची किंमत २.४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे, ज्यात एका पिता-पुत्राचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख प्रशांत गुप्ता (४८) आणि त्यांचा मुलगा निशांत गुप्ता (२६) आणि अरविंद […]Read More

देश विदेश

अमेरिकेत विमानतळावर अडकले भारतातून पाठवलेले ४ कोटी रुपयांचे आंबे

भारतीय आंबा निर्यातदारांना मोठा धक्का बसला आहे, कारण अमेरिकेने १५ आंबा शिपमेंट्स परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा येथील विमानतळांवर ही शिपमेंट्स अडवण्यात आली असून, एकूण ₹४.२ कोटींचे नुकसान झाले आहे. परत पाठवण्याचा खर्च जास्त असल्याने निर्यातदारांनी आंबे अमेरिकेतच नष्ट करण्याचा निर्णय घेतला. निर्यातदारांनी आरोप केला आहे की ही चूक […]Read More