Month: May 2025

महानगर

उद्यापासून ही मनपा महिलांना देणार बस भाड्यात ५०% सवलत

वसई, दि. ३१ : वसई-विरार महानगरपालिकेने महिलांना आनंदाची बातमी दिली आहे. उद्या १ जूनपासून महिलांना बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय वसई-विरार महानगरपालिकेने घेतला आहे. ही योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्याची माहिती वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दिलीय. वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत एकूण १३० बस चालतात. यापैकी […]Read More

ट्रेण्डिंग

सिंधूताई सपकाळांच्या संस्थेचं नाव वापरून लग्नांसाठी अनेकांची फसवणूक

मुंबई, दि. ३१ : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाचा गैरवापर करून अनेकांची विवाहासाठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ममता सिंधुताई सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे, आणि लोकांना अशा अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांत लग्नाच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस […]Read More

ट्रेण्डिंग

अटलांटिक महासागराच्या तळाशी सापडले १ लाख २० हजार वर्षांपूर्वीचे शहर

अटलांटिक महासागरात हे लुप्त झालेले शहर सापडले आहे. 2300 फूट खोल समुद्रात सापडले 120000 वर्षांपूर्वी हरवलेले पृथ्वीवरील सर्वात मोठे शहर सापडले आहे. मध्य-अटलांटिक रिजजवळ एक पर्वत आहे, जिथे लॉस्ट सिटी हायड्रोथर्मल फील्ड नावाचे एक अद्वितीय ठिकाण सापडले आहे. येथे उंच चुनखडीच्या चिमण्या आहेत, ज्या निळ्या प्रकाशात चमकतात. पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात येण्याबाबतची अनेक रहस्य उलगडण्यास हे […]Read More

गॅलरी

सचिन पिळगावकर यांच्या हस्ते 3 जून रोजी होणार अक्की पुस्तक

पुणे प्रतिनिधी: किशोर वयापर्यंत एकदम फिट असलेल्या मुलाला दहावीची परीक्षा तोंडावर असताना अचानक उद्भवलेल्या Wilson डिसीज मुळे दिव्यांग मुलांसारखे जगणे नशिबी आले, तरीही खचून न जाता अक्षय परांजपे या जिद्दी तरुणाने एक फोटोग्राफर म्हणून नावलौकिक मिळवला आहे. याच अक्षयच्या जीवनाची संघर्षगाथा, त्याचा प्रेरणादायी प्रवास ‘अक्की’ या पुस्तकामधून उलगडणार आहे. अशी माहिती अक्षयचे वडील संतोष परांजपे […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

मुंबई, दि 31मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.Read More

करिअर

परदेशात जाण्याची गरज नाही, आता भारतात मुबलक संधी उपलब्ध

पिंपरी, दि 31भारतीय तरुणांनी आता परदेशात जाण्याची गरज नाही. भारतात आता उद्योग, व्यवसायाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेऊन आपण उद्योग, व्यवसायात पुढे गेले पाहिजे असे मार्गदर्शन अमेरिकेतील एकमेव मराठी खासदार श्री ठाणेदार यांनी पुण्यात केले.गुरुवारी (दि.२९) पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि महाराष्ट्र आर्थिक […]Read More

मराठवाडा

बीड जिल्ह्यातील 06 प्रकल्प ओव्हर फ्लो…!

बीड दि ३१– बीड जवळचा बिंदुसरा प्रकल्प मे महिन्याच्या अखेरीसच ओसंडून वाहू लागला. याचे जलपूजन बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले.. या तलावातून बीड शहराच्या काही भागाला तसेच परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो तसेच मोठ्या प्रमाणात शेती सिंचनासाठी देखील या पाण्याचा उपयोग होतो यावर्षी मे महिन्यातच झालेल्या जोरदार पावसामुळे हा प्रकल्प ओसंडून वाहू लागला असून […]Read More

राजकीय

*विकासक आणि वास्तुविशारदांनी ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकाराव्यात

पुणे, दि 30- रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि वास्तुविशारदांनी नवीन प्रकल्पांचे नियोजन करताना ‘ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पना स्वीकाराव्यात. कारण पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे आवाहन पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच बांधकाम व्यावसाईकांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञान एकत्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी […]Read More

राजकीय

एमएसआरडीसीकडून राज्यात सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवा

मुंबई,दि ३०:– महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी […]Read More

राजकीय

गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे फक्त स्टंटबाजी

कोल्हापूर, दि 30गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा. स्वत:च्या स्टंटबाजी साठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचे नुकसान करायचे आणि नेहमीच या मैदानाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा, हेच उद्योग सद्या एका समाजकंटक टोळक्याकडून सुरु आहेत. गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार असून, याच टोळक्याकडून गांधी मैदानाच्या विकास कामात खो घालायचे, काम जाणूनबुजून बंद […]Read More