Month: May 2025

ट्रेण्डिंग

पावसात अडकलेल्या नागरिकांना माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी केली मदत

मुंबई, दि 26मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा, तसेच वाहतूक अगदी संथ गतीने सुरू होती. काही नागरिकांना तसेच चाकरमानी नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. अशा दादर येथे पावसात अडकलेल्या नागरिकांना, चाकरमान्यांना, तसेच रेल्वे प्रवाशांना भवानजी यांनी मोफत जेवण आणि छत्री वाटप करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याबाबत नागरिकांनी त्यांचे आभार मानले. […]Read More

बिझनेस

अनिल अंबानींची कंपनी झाली कर्जमुक्त

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक स्थिती ढासळलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडले आहे. कंपनीवर आता कोणाचेही कर्ज नाही. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने अधिकृतपणे कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज परतफेड केले. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत […]Read More

विदर्भ

वाघीण आणि बछड्यांनी केलेल्या हल्ल्यात रानगव्याची शिकार , व्हिडीओ वायरल…

चंद्रपूर दि २६:–चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना बफर भागात वाघ कुटुंबाने केलेल्या रानगव्याच्या शिकारीचा व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. कॉलरवाली वाघीण आणि तिचे 3 बछडे रानगव्याला घेरून शिकारीच्या प्रयत्नात होते. चाहूल लागताच रानगव्याने निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र चारही बाजूने घेरून वाघ कुटुंबाने आधी रानगव्याला जायबंदी केले. आणि नंतर शिताफीने जमिनीवर लोळवले. या संघर्षात वाघ कुटुंबाची रणनीती सफल […]Read More

महानगर

अक्वा लाईन जलभराव प्रकरण – जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांची

मुंबई, दि 26मुंबई मेट्रो लाईन ३ (अक्वा लाईन) च्या अच्युत अत्रे चौक आणि वरळी स्टेशन परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या जलभरावामुळे मेट्रो सेवा तात्पुरती थांबवण्यात आली होती. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला असून सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी MMRC (मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.) कडे संबंधित […]Read More

ट्रेण्डिंग

आंबेनळी घाटातपावसामुळे रानकडसरी टोकाजवळ दरड कोसळली.

महाड दि २६– रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने गेली अनेक दिवस धुमाकूळ घातला असून काल रात्रीपासून धुवाधार पाऊस पडत असून महाड तालुक्यातील सावित्री नदीचे पाणी ढवळी कामथी व घोडवणी चोळई नदीतुन पाणी वाहू लागले आहे. महाबळेश्वर प्रतापगड परिसरात रात्रीपासून पाऊस पडत असल्याने आंबेनळी घाटा मध्ये काम चालू असल्याने गटारे मातीच्या भरावाने भरून गेली आहेत. डोंगर दऱ्या […]Read More

राजकीय

भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करण्याचे प्रताप सरनाईक यांचे आदेश

मुंबई दि २६ — ५१५० भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यात संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली असून या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले . ते आज महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले, २२ मे पर्यंत […]Read More

राजकीय

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकता

मुंबई, दि. २६ – मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हीजन डॉक्युमेंट 2047 तयार करत असताना वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यांचा प्रामुख्याने समावेश असावा. तसेच या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये मत्स्यव्यवसायाशी संबधित भविष्याचा वेध घेणाऱ्या सर्वच घटकांचा जसे अधुनिक तंत्रज्ञान, एआचा वापर यांचा समावेश करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.मंत्रालयात आज व्हीजन डॉक्युमेंट […]Read More

कोकण

कातळशिल्पांचा ‘जागतिक वारसा स्थळा’च्या यादीत समावेशासाठी रोडमॅप

मुंबई, दि.२६ :– राज्यातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत समावेश व्हावा, यासाठी या कातळशिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आजच्या बैठकीत दिले. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. […]Read More

ट्रेण्डिंग

आपत्तीत कामे करण्याला प्राधान्य; राजकारण करणाऱ्यांना उत्तरे देणार नाही

मुंबई दिनांक २६:– आपत्तीमध्ये काम करण्याला आमचं प्राधान्य आहे. आपत्तीचे राजकारण करणाऱ्यांना उत्तरं देत बसणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील सध्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अद्ययावत अशा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आपत्कालीन कार्य केंद्र तंत्रज्ञानाने सुसज्ज असे झाल्याने कोणत्याही आपत्तीत शासनाला योग्य व्यवस्थापन […]Read More

कोकण

मंडणगड मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, दापोली हर्णे रस्ता खचला…

रत्नागिरी दि २६:– रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दापोली, मंडणगड तालुक्यात तर अक्षरश: पावसाचा कहर सुरू आहे. खेड तालुक्यात जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून खेड शहराला पुराचा धोका वाढला आहे. दुपारी बारा वाजता जगबुडी नदीची इशारा पातळी म्हणजेच सहा मीटर इतकी नोंदवली गेली आहे. मुसळधार पावसामुळे दापोली-हर्णे रस्ता खचला आहे. दापोली तालुक्यातील वणंद […]Read More