Month: May 2025

देश विदेश

हा देश नागरिकांना देणार ChatGPT चे मोफत सब्सक्रिप्शन

Open AI टूल ChatGPT चे सब्सक्रिप्शन मोफत वाटण्याची योजना UAE लवकरच तेथील नागरिकांना देणार आहे. हा जगातला पहिला असा देश आहे जो संपूर्ण लोकसंख्येला चॅटजीपीटी प्रीमियम व्हर्जन फ्री देणार आहे. या कामासाठी Open AI आणि युएई सरकार दरम्यान पार्टनरशिप देखील झालेली आहे. ज्यात अबू धाबी येथे युएई नावाचा एक मोठा डेटा सेंटर स्थापन करण्यात येणार […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

मुसळधार पावसामुळे भीमाशंकर परिसरात 25 गावांचा संपर्क तुटला

पुणे, दि. २७ : गेल्या २ दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. अतिवृष्टीमुळे गावोगावचे नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरातील अनेक गावांच्या आसपासच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, डिंभे धरणाच्या आतमध्ये असणाऱ्या गावांकडे जाणारा रस्ता खचला आहे, त्यामुळे इकडच्या जवळपास 25 गावांचा संपर्कही तुटला आहे, मात्र पर्यायी रस्त्याने आताही वाहतूक वळविण्यात आली […]Read More

देश विदेश

पाकची नरमाई- काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्यास तयार

तेहरान, दि. २७ : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केल्यावर आणि जगभरात नाचक्की झाल्यावर पाकने आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीर, पाणी वाटप , व्यापार, आणि दहशतवाद यांसारख्या दीर्घकाळ प्रलंबित विषयांवर भारतासोबत संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे. ते सध्या इराणच्या दौऱ्यावर असून तेहरानमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी […]Read More

आरोग्य

राज्यात बोगस पेथॉलॉजी लॅबचे रॅकेट सुरूच

मुंबई, दि. 27 मागील पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी बोगस पॅथॉलॉजी लॅब्स लवकरच बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता हिवाळी अधिवेशन महिन्याभरात सुरू होईल. मात्र मागील अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांचे घोंगडे तसेच भिजत पडल्याने आजही राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब्सचा सुळसुळाट सुरूच आहे. सरकारने जनतेचे आरोग्य आश्वासनाच्या दावणीला बांधल्याने राज्यातील जनतेच्या आरोग्याचा खेळ सुरूच आहे. […]Read More

महानगर

मुसळधार पावसामुळे सीएसटी येथील केबल तुटल्या, शॉर्ट सर्किटचा धोका

मुंबई, दि 27सीएसटी येथील मुंबई महापालिका समोरील पदपथावर मुसळधार पडलेल्या पावसाने अनेक केबल आणि वायर रस्त्यावर पडल्या आहेत. तर काही केबल पदपथावर लोंबकळत आहेत. त्या अर्ध्या तुटलेल्या अवस्थेत असून काही केबलमधून करंट मारत आहे. या पदपथावरून रोज लाखो पादचारी ये जा करत असतात. तसेच विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी याच पदपथावरून ये जा करत असतात. त्यामुळे […]Read More

महानगर

ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली

मुंबई दि २७ :– माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा जयंती महोत्सव आज अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या विशेष प्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री व मलबार […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

(मंगळवार, दि. २७ मे २०२५) एकूण निर्णय: १० • रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्च्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच,पदांना मान्यता. (दिव्यांग कल्याण विभाग) •मा. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता.(विधि व न्याय विभाग) • इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता. इचलकरंजीला […]Read More

आरोग्य

*मिरज मधील वानलेस हॉस्पिटल सुरू करणे हेच आमचे मिशन

सांगली प्रतिनिधी ~ सांगली जिल्ह्यातील मिरज येथील वाणलेस रुग्णालय हे सांगली जिल्ह्यात मिशन रुग्णालय म्हणून प्रसिद्ध आहे.ते रुग्णालय मागील काही वर्षांपासून बंद आहे.त्यामुळे या रुग्णालयातील कामगारांची वेतनाविना उपासमार होत आहे.डॉक्टरांना काम नाही.येथील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा स्वस्तात देण्यासाठीय वानलेस रुग्णालय सुरू करणे काळाची गरज आहे. वानलेस हॉस्पिटल सुरू करणे हेच आमचे मिशन आहे असा निर्धार […]Read More

राजकीय

बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगींचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई प्रतिनिधीबँकींग क्षेत्रातील विविध प्रश्नावर मागील ४० वर्ष सातत्याने सरकारला जाब विचारणारे विश्वास उटगी यांनी आज गांधी भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विश्वास उटगी यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. “केंद्र व राज्यात भाजपा सरकारचा मनमानी कारभार सुरु असून बँकांच्या कामातही हस्तक्षेप […]Read More

महानगर

परमवीर चक्र विजेता सरदार जोगिंदर सिंह मार्गाचे नामफलक ४८ तासांत

मुंबई, दि 27अंधेरी (पूर्व) चिमटपाडा परिसरातील इंकानिका हॉटेलपासून अंधेरी-कुर्ला मार्गापर्यंतच्या रस्त्याचे नामकरण परमवीर चक्र विजेता सरदार जोगिंदर सिंह मार्ग असे करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेने याठिकाणी नामफलकही बसवले होते. मात्र, सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान नामफलक हटवण्यात आला व नंतर तो दीर्घकाळ लावण्यात आलेला नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी के/पूर्व विभागाचे सहायक […]Read More