Month: March 2025

महिला

लाडकी बहिण योजना सुरूच राहील, विरोधकांचा सभात्याग

मुंबई दि १२ — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि राज्य सरकार योग्य वेळी घेईल अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली, त्यावर लाडक्या बहिणींची फसवणूक सरकारकडून होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभा त्याग केला . यासंदर्भातील प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला होता, […]Read More

ट्रेण्डिंग

PM- किसान योजनेपासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांनासाठी सरकारची

मुंबई, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा मजबूत आधार ठरणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, मात्र अजूनही अनेक शेतकरी योजनेच्या कक्षेबाहेर आहेत. त्यांना योजनेंतर्गत सामील करण्यासाठी पुन्हा एकदा सरकारतर्फे विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. ML/ […]Read More

पर्यावरण

POP मूर्तीवरील कोर्टाच्या बंदी विरोधात एकवटले राज्यभरातील मूर्तिकार

मुंबई, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : PoP च्या मूर्ती बनविण्यावर आणि विसर्जनावर उच्च न्यायालयाने पूर्णतः बंदी घातली आहे. परंतु या बंदीला राज्यभरातील मूर्तिकारांनी विरोध दर्शविला आहे. यामध्ये सरकारने योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी करत पीओपी हे पर्यावरणपूरक असल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मूर्तिकार संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनी काल मंगळवारी केला.परळ येथील नरे पार्क येथे पीओपी […]Read More

देश विदेश

अवैधरित्या भारतात प्रवेश करणाऱ्यांना ५ वर्ष तुरुंगवास, ५ लाख दंड

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या स्थलांतर प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी, केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल-२०२५ सादर केले.या विधेयकानुसार, जर कोणी परदेशी व्यक्तीला बेकायदेशीरपणे देशात आणले, सामावून घेतले किंवा स्थायिक केले तर त्याला ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा २ ते ५ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. […]Read More

पर्यटन

कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यासाठी चीनने घातली अट

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनच्या कुरापतीमुळे बराच काळ स्थगिती झालेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार असताना चीनकडून परत एकदा कुरबुरी चालू झाल्या आहेत.भारत-चीन यांच्यात कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यासंबंधी सहमती होऊनही अद्याप या यात्रेसाठी नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झालेली नाही. तिबेटच्या नागरी प्रांतामधील कैलास पर्वत आणि मानसरोवराच्या यात्रेसाठी सर्वात योग्य काळ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

श्री विठ्ठल मूर्तीची मोठी झीज, पुन्हा करावे लागणार रासायनिक लेपन

पंढरपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भक्तगणांच्या भेटीसाठी युगानुयुगे विटेवर उभा ठाकलेल्या पंढरीच्या विठूरायाच्या मूर्तींची आता आतोनात झीज झाली आहे. दररोजचे शोडषोपचार, पूजा, अभिषेक लाखो भाविकांची विठूराया चरणी माथा ठेकवण्याची इच्छा यामुळे ही मूर्ती आता जीर्ण होत आहे. यावर आता लवकरच रासायनिक लेप लावून तिचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. एका महिन्यांपूर्वी पुरातत्त्व खात्याच्या रासायनिक […]Read More

Lifestyle

केरळ स्टाईल अळूवड – पारंपरिक दक्षिण भारतीय कुरकुरीत भाजी

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीत तोंडाला पाणी सुटेल अशा वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांचा समावेश आहे. त्यातील एक म्हणजे केरळ स्टाईल अळूवड, जी कुरकुरीत, मसालेदार आणि चवदार स्नॅक म्हणून प्रसिद्ध आहे. साहित्य: कृती: सर्व्हिंग टिप: नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबर ही स्नॅक खास लागते. ML/ML/PGB 12 Mar 2025Read More

राजकीय

एस टी घोटाळ्याची चौकशी येत्या महिनाभरात …

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एसटी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बसगाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे कार्यादेश एसटी महामंडळाच्या स्तरावर संगनमत करून काढण्यात आले असं सांगत याच्या मागे कोण आहे ? याची एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.काँग्रेसचे राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत […]Read More

ट्रेण्डिंग

भयानक घटना, इंस्टाग्रामवर झालेल्या वादाचा आईला फटका! गाडीवरून नेले फरफट

हरियाणाच्या सोनीपतमध्ये धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. इंस्टाग्रामवरील एका कमेंटवरून दोन किशोरवयीन मुलांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादामध्ये आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, यामुळे एका वेगाने येणाऱ्या कारच्या बोनेटवर आईला जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत ओढत नेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.Read More

क्रीडा

आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद जिंकणाऱ्या महिलांचा सन्मान, मिळालं इतक्या लाखांचं

जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्चला भारताच्या संघाने आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद 2025 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. सोनाली शिंगटेच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा स्पर्धेत जेतेपद मिळवले. यासाठी भारतीय महिला कबड्डी संघाला मंगळवारी 11 मार्च रोजी गौरवण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला 67 […]Read More