मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. भारताने या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध नोंदवला, तर इतर देशांनीही भारताला पाठिंबा दिला . लोकांनीही मालदीवचा बहिष्कार करत अनेक परदेशी टूर बुकिंग एजन्सींनीही मालदीव पॅकेज बंद करण्याची घोषणा केली होती. यादरम्यान मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचे सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती […]Read More
मुंबई दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांदरम्यान भारतीय क्रीडापटूंसाठी कांदिवलीचे साई क्रीडा संकुल एक महत्त्वाचे क्रीडा केंद्र बनेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण( साई) यांच्या दरम्यान आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कार्यक्रमात ते बोलत […]Read More
कोल्हापूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दरवर्षी नवरात्रोत्सवात तिरूमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठवण्याची प्रथा आहे. तिरुपतीहून आलेला हा मानाचा शालू अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे या शालुचं पूजन करून, तो अंबाबाईला अर्पण केला. तब्बल तब्बल 1 लाख 28 हजार 700 रुपये किंमतीचा हा शालू देवीला अर्पण […]Read More
मुंबई दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावी पुनर्विकासअंतर्गत धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि नियमित करण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता राज्य सरकारने सात सदस्य समिती गठित केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा प्रश्न मार्गी लावणार आहे. धारावीत […]Read More
पुणे, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ण्यातील सर्व टेकड्यांवर आणि घाटांमध्ये आता “सर्च लाईट” बसवण्यात येणार आहे. शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे.बोपदेव घाटात घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला आहे. पु सायरनच्या मदतीने […]Read More
मुंबई दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घाना सेंट्रल बँकेने देशांतर्गत बचत वाढण्यासाठी आणि चलनाला बळकट करण्यासाठी नवीन सोन्याचे नाणे लॉन्च केले. हे नाणे ९९.९९ टक्के शुद्ध सोन्याने बनवले आहे. या नाण्याचे वजन एक, दीड आणि चार औस असल्याचे बँक ऑफ घानाचे गव्हर्नर अर्नेस्ट एडिसन यांनी माध्यमांना सांगितले. ही नाणी याच महिन्यात गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार […]Read More
नंदुरबार, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नंदुरबार जिल्ह्यात कोंडाईबारी घाटात अवघड वळणे आहेत. त्यामुळे या घाटात वारंवार अपघात होतात. येथील अपघात कमी करण्यासाठी अद्याप कोणत्याही उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. आज झालेल्या आपघट्ट मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे. कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला आहे. एक भरधाव ट्रक हा मेंढयांच्या कळपात घुसला आहे. यात १०० […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डाॅ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाट (गांधीनगर) येथे शंकर भगवान मराळ यांच्या शेतातील विहिरीत पडलेले अत्यंत दुर्मिळ वन्यप्राणी असलेल्या खवल्या मांजरास वनविभागाकडून यशस्वी सुटका करून जीवदान देण्यात आले. सावंतवाडी वन विभागाला पाट (गांधीनगर) येथे विहिरीत वन्यप्राणी खवल्या मांजर पडले असलेबाबत माहिती मिळाली.त्यानुसार कुडाळ वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अधिकारी संदीप कुंभार यांचे नेतृत्वाखाली जलद […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वातील सर्वात पुरातन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मुंबईतील बीकेसी येथे ऑल इंडिया भिख्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंचशीलाचा गमचा घालून तसेच गौतम बुद्धांची प्रतिमा देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी भिख्खू संघासोबत त्यांनी बुद्ध वंदना कथन […]Read More