Month: May 2024

आरोग्य

MDH आणि Everest मसाल्यांना FSSAI कडून क्लिन चिट

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय मसाल्यांच्या गुणवत्तेबाबत जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेले संशयाचे धुके आज विरले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) भारतीय मसाल्यांमध्ये हानिकारक पदार्थांच्या भेसळीचा मुद्दा फेटाळून लावला आहे. विस्तृत तपासणीनंतर, संस्थेने त्यांच्यामध्ये इथिलीन ऑक्साईड (ईटीओ) नसल्याचे स्पष्ट केले आहे. FSSAI ने मसाल्यांची तपासणी करण्यासाठी 22 एप्रिल रोजी […]Read More

देश विदेश

प.बंगालमध्ये २०१० नंतरची सर्व ओबीसी प्रमाणपत्रे रद्द

कोलकाता, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलकाता उच्च न्यायालयाने आज पश्चिम बंगालमध्ये 2010 नंतर जारी केलेली सर्व इतर मागासवर्गीय (OBC) प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती तपोब्रत चक्रवर्ती आणि राजशेखर मंथर यांच्या खंडपीठाने सांगितले की, 2011 पासून प्रशासनाने कोणतेही नियम न पाळता ओबीसी प्रमाणपत्रे जारी केली आहेत.खंडपीठाने नमूद केले आहे की – अशा प्रकारे […]Read More

पर्यावरण

उष्माघातामुळे ८५ माकडांनी गमावला जीव

मेक्सिको, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या जगभर आलेल्या उष्णतेच्या लाटांना मानवासह अन्य प्राणीमात्र देखील हवालदिल झाले आहेत. वन्यजीवांना या उष्णतेमुळे जीव गमावावा लागत आहेत. मेक्सिकोतील आग्नेय परिसरातील कोतमकाल्कोमधील जंगलात हॉऊलर प्रजातीच्या माकडांचा उष्माघातामुळे मृत्यू होत आहे. झाडांवरून फळे पडावीत, अशारीतीने ही माकडे खाली पडत असून त्यांच्या मृतदेहांचा जमिनीवर खच पडला आहे. यात आतापर्यंत […]Read More

देश विदेश

काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना निवडणूक

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना आणि स्टार प्रचारकांना त्यांच्या भाषणात संयम ठेवण्यास, सावधगिरी बाळगण्यास आणि शिष्टाचार राखण्यास सांगितले.लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींसह काँग्रेसचे नेते आपल्या भाषणात संविधान वाचवण्याचा आणि अग्निवीर योजनेचा वारंवार उल्लेख […]Read More

महाराष्ट्र

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी १ जूनपासून लागू होणार नवीन नियम

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशातील सध्याच्या वाहतूक नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल १ जूनपासून होणार आहेत. सध्या चालकांना वाहतूक परवाना मिळविण्यासाठी वैयक्तिक प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) जाऊन परीक्षा द्यावी लागते. मात्र, बदल करण्यात येणाऱ्या नियमांनुसार आता अर्जदार हे त्यांच्या पसंतीच्या आणि सर्वात जवळ […]Read More

मराठवाडा

बीड जिल्ह्यात आठ तालुक्यात दुष्काळ सदृश स्थिती जाहीर

बीड, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हयामध्ये जून ते सप्टेबंर 2023 या कालावधीतील पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र तसेच पिकांची परिस्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपतीची शक्यता विचारात घेवून शासन निर्णय, महसूल , वन विभाग दि. 31 […]Read More

पर्यटन

एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

मुंबई दि.22 एम एमसी न्यूज नेटवर्क) : १ जानेवारी २०२४ पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ […]Read More

ट्रेण्डिंग

पुणे कार अपघात प्रकरणी विशाल अगरवाल ला दोन दिवसांची पोलीस

पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात बेदरकारपणे पोर्श ही अलिशान गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील वृत्त दिलं. या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तसंच, न्यायलयाने अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर ताशेरेही ओढले. […]Read More

राजकीय

मुंबईतील मतदान कमी होण्यामागे मोठे षडयंत्र

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाचव्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी झाली. याला निवडणूक आयोगाचा अनागोंदीपणा आणि निष्काळजीपणा जबाबदार आहे. पिण्याची पाण्याची गैरसोय, मतदान केंद्रावर मंडप नसणे, मोबाईल बंदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी याकडे सरकारचे मोठया प्रमाणात दुर्लक्ष झाले. यामागे मोठं षडयंत्र आहे. तसेच मर्जीतील निवडणूक अधिकारी बसविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी […]Read More

पर्यावरण

पवई तलावातील १३ हजार ९२० मेट्रिक टन जलपर्णी काढली

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन प्रकल्‍प अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तलावातील जलपर्णी, तरंगत्‍या वनस्‍पती काढण्‍याची कार्यवाही सुरु आहे. एकूण सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी, आज (२२ मे ) पर्यंत सुमारे १३ हजार ९२० मेट्रिक टन म्हणजे ५५ टक्के इतकी जलपर्णी […]Read More