Month: April 2024

गॅलरी

संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन

नागपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महाल येथील केंद्रीय कार्यालयातून काल सांयकाळच्या सुमारास प्रतिपदा उत्सव संचलन काढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या तिथीनुसार जन्मदिनच्या निमित्ताने घोष विभागाचे पथसंचलन बडकस चौक येथून संघ मुख्यालयातून पथसंचलनाला सुरुवात करीत डॉ. हेडगेवार याच्या निवासस्थानी घोष पथकाच्या स्वयंसेवकांनी धून वाजवून मानवंदना […]Read More

खान्देश

मांजराला वाचविण्यासाठी पाच जणांनी गमावले आपले जीव

अहमदनगर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेण, जनावरांचे मलमूत्र जमवलेल्या जुन्या विहिरीतील गाळामध्ये पडलेल्या मांजरीला वाचविण्याच्या प्रयत्नात एका मागून एक अशा पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विहिरीतील विषारी वायूमुळे बेशुद्ध होऊन सहा जण विहिरीत पडले. त्यांच्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील वाकडी येथे काल दुपारी […]Read More

Featured

आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्ष प्रारंभ

मुंबई, दि. 10 (जाई वैशंपायन) : प्रभू रामचंद्रांनी लंका विजयानंतर अयोध्येत प्रवेश केला तो दिवस आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणून याला धार्मिक महत्त्वही आहे. वसंत ऋतूमध्ये सारी सृष्टी सृजनाच्या रंगांमध्ये नाहून निघत असताना वाजतगाजत नववर्षाचा प्रारंभ करणे, भारतीय मनाला रुचते. ध्वजाचे महत्त्व भारतवर्षाला किमान ५,००० वर्षांपासून ठाऊक आहे. त्यामुळे, ‘दुष्ट शक्तींचे निवारण […]Read More

गॅलरी

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट

नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अकोल्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट झाली. तीन ते चार वाजताच्या दरम्यान च्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कांदा, भुईमूग, भाजीपाला आंबा, लिंबू, टरबूज इत्यादी फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवेमुळे मोठमोठी झाडे उलथून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे असणार आहेत. 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण […]Read More

ऍग्रो

C-DAC कडून शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म’ चे अनावरण

पुणे, दि. ९. (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात सी-डॅक आपल्या स्थापनादिनी अर्थात गुढीपाडव्याला शेतकऱ्यांसाठी एक अनोखी भेट घेऊन आले आहे. संस्थेकडून आज बदलते हवामान, तापमान, आद्रता, पाऊस, मृदा परीक्षणाच्या सूचना आणि उपयोजनात्मक माहिती देणाऱ्या स्मार्टफार्मचे अनावरण करण्यात आले.पाषाण येथील भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) सभागृहात आज ‘सीडॅक’चा ३७वा स्थापना दिवस साजरा झाला.यावेळी […]Read More

देश विदेश

इडीची अटक वैध ठरवत केजरीवालांना उच्च न्यायालयाचा धक्का

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): मद्य घोटाळा प्रकरण गेल्या 9 दिवसांपासून तिहार तुरुंगात असलेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे. इडीने केलेली अटक वैध ठरवत न्यायालयाने केजरीवालांची याचिका फेटाळून लावली आहे. ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या (Money Laundering) आरोपाखाली २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. […]Read More

ऍग्रो

पाण्याअभावी मोसंबी बागा सुकल्या, दुष्काळ झाला तीव्र

जालना, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हयात घनसावंगी तालुक्यातील राणीऊंचेगाव परिसरात दुष्काळाची तीव्रता दिसून येतेय. राणीउंचेगाव भागातील मोसंबी बागा पाण्याअभावी सुकल्या आहेत. आज गुढी पाडव्याचा नवीन वर्षाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय. मात्र हे नवीन वर्ष आमच्यासाठी दुःखाचे असून गुढी पाडव्यासाठी आमचेकडे गाठ्या घ्यायला सुद्धा पैसे नसल्याची प्रतिक्रिया राणीउंचेगाव येथील शेतकऱ्यांनी दिल्या […]Read More

महानगर

मराठी फलक न लावणाऱ्यांना दुकानदारांना दुप्पट मालमत्ता कर

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई मनपाचे नवनियुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी कारभार हाती घेताच मराठी पाट्यांच्या मुद्दा ऐरणीवर घेत धडाकेबाज निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दुकाने, अस्थापणे यावरील फलक व बोर्ड हे मराठी भाषेत लिहिन्याचे आदेश देऊन देखील मुंबईत अनेक दुकानदार आणि आस्थापना मालकांनी मराठी फलक न लावल्याने आता मुंबई महानगर पालिका […]Read More

पर्यावरण

जायकवाडी धरणातील जलसाठा १८ टक्यांवर

छ. संभाजी नगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीनंतर सुरु झालेल्या तीव्र उन्हाच्या झळांनी राज्यातील नागरीक हवालदिल झाले आहेत. त्यातच आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातल्या बहुतांश धरणांतील पाणी पातळी झपाट्याने घसरत असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठी झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जायकवाडी धरणात फक्त १८ टक्केच […]Read More