Month: January 2024

शिक्षण

सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांचे वेतन आता विनाविलंब

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी, 2024 पासूनचे वेतन आता नियमित वेळेत होणार आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट) प्रणालीमार्फत तसेच ज्या जिल्ह्यांत ई-कुबेर कार्यरत आहे, त्या जिल्ह्यांत ई-कुबेर प्रणालीमार्फत […]Read More

राजकीय

शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर केला ५० टक्के कमी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला असून सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा 50 टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एमएसआरडीसी ने दिलेल्या प्रस्तावात बदल करून सरकारने आज हा निर्णय घेतला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कारसाठी […]Read More

राजकीय

या कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अशा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन […]Read More

देश विदेश

मिनिमम बॅलन्स चार्जबाबत RBI चा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ने बँक खाते धारकांचे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा निर्णय बँक खात्यातील किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) रकमेबाबत घेण्यात आला आहे. जर तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करत नसाल तर […]Read More

ट्रेण्डिंग

मायक्रोसॉफ्टने कीबोर्डमध्ये केले महत्त्वाचे बदल

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI मुळे आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत बड्या कंपन्यांच्या त्यांच्या हार्डवेअर आणि गॅजेट्समध्ये महत्त्वाचे बदल करावे लागत आहेत. याच कारणास्तव टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने जवळपास 30 वर्षांनंतर लॅपटॉप आणि पीसीच्या कीबोर्डमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. तुमचा AI चॅटबॉट Copilot थेट कीबोर्डवरून लाँच करण्यासाठी कीबोर्डवर एक नवीन बटण जोडण्या […]Read More

ट्रेण्डिंग

सत्यशोधक’ चित्रपट होणार करमुक्त ?

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट उद्या (दि. ५) प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच पार पडला आहे. या खास शोला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली होती. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट पाहताना छगन भुजबळ यांनी त्याचं […]Read More

ट्रेण्डिंग

येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह या राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून भारताच्या ऋतूचक्रामध्ये प्रचंड बदल झाले आहेत.गेल्या ४ ते ५ वर्षांपासून हिवाळ्याच्या कालावधीत अवकाळी पाऊस होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे रब्बी पिकांच्या या हंगामात पावसाची टांगती तलवार असल्यामुळे शेतकरी हवालदील होत आहे. या वर्षी देखील अवकाळी पावसाची स्थिती निर्माण होण्यास अनुकुल वातावरण तयार झाले आहे. […]Read More

देश विदेश

काँग्रेसने बदललं भारत न्याय यात्रेचं नाव

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत न्याय यात्रा सुरू करणार असल्याची घोषणा मागील आठवड्यात केली होती. १४ जानेवारीला सुरू होणाऱ्या या यात्रेचं नाव बदलून आता भारत जोडो न्याय यात्रा असं करण्यात आलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, राज्य प्रभारी, राज्य युनिट प्रमुख आणि काँग्रेस […]Read More

विदर्भ

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता करण्याची अट शिथिल

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प प्रस्तावित असून यातून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात पावसाळ्यातील पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून पूर्णा तापी खोऱ्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पापर्यंत कालव्याद्धारे […]Read More

ऍग्रो

वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना आता पाच वर्षांसाठी

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.कोरोनाच्या काळात २०२०-२१ मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. या योजनेत २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे. 2023-24 […]Read More