Month: January 2024

ऍग्रो

मधुक्रांतीसाठी मुंबईत होतोय मध महोत्सव

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात मधमाशी पालनासाठी मोठा वाव असून मधमाशी पालनामुळे शेती उत्पादनात मोठी वाढ होत असते, त्यातूनच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी मुंबईत दोन दिवसीय ” मध महोत्सवा ” चे आयोजन करण्यात आले आहे . मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये येत्या १८ आणि १९ जानेवारी असे दोन दिवस हा महोत्सव […]Read More

महानगर

मातंग समाजाने अजून किती वर्ष आंदोलन करायचे

मुंबई दि. १६ ( एम एमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या ४० वर्षापासून मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या सरकारने अद्याप निकाली काढल्या नाहीत. वेळोवेळी उपोषण,आंदोलन करत सरकारचे आश्वासन घेत आंदोलन थांबवायचे. असे किती वर्ष चालणार ? असा सवाल मातंग क्रांती महामोर्चाच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. राज्यातील २४ लाख मातंग समाजाच्या […]Read More

शिक्षण

‘ मेस्टाचे ‘ ९ वे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत

मुंबई दि.१६ ( एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज आसोसिएशन ” मेस्टा ” या राज्यव्यापी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन व सांस्कृतिक महोत्सव २०२४ या वर्षी मुंबईत होत असल्याची माहिती मेस्टा चे संस्थापक अध्यक्ष डॅा. संजयराव तायडेपाटील यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. १८ व १९ जानेवारी ला भायखळा येथे अण्णा भाऊ साठे […]Read More

राजकीय

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसच्या आढावा बैठका

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व विभागात विभागनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. १८ जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होत आहे. नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होत आहेत. […]Read More

मनोरंजन

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई, दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या वतीने तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणा-या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२१ आणि २०२२ या वर्षातील तमाशसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार अनुक्रमे हिराबाई कांबळे आणि अशोक पेठकर यांना जाहीर झाला आहे. दोन्ही पुरस्कारार्थींचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार […]Read More

सांस्कृतिक

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना जाहीर

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन २०२३ या वर्षासाठी नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाने या पुरस्कारांची आज घोषणा केली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाधव यांचे अभिनंदन केले आहे. राज्य शासनाने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देण्यासाठी निवड समिती […]Read More

बिझनेस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यासाठी रवाना

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे. याकरिता महाराष्ट्राचे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे योगदान असणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यास हे ध्येय पूर्ण होणार, असा विश्र्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे […]Read More

साहित्य

प्रसिद्ध उर्दु शायर मुनव्वर राणा यांचे निधन

लखनौ, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध शायर आणि कवी मुन्नवर राणा यांचं लखनऊ या ठिकाणी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. मुन्नवर राणा यांच्यामागे त्यांची पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असं कुटुंब आहे. मुन्नवर […]Read More

क्रीडा

कर्नाटकच्या १८ वर्षीय फलंदाजाने उभारला ४०४ धावांचा डोंगर

शिवमोग्गा, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने मुंबईविरुद्ध कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 404 धावांची नाबाद खेळी खेळली. यासह तो या स्पर्धेत 400+ धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.प्रखरच्या खेळीमुळे सामना अनिर्णित राहिला आणि आघाडीच्या जोरावर कर्नाटकने ट्रॉफी जिंकली. कूचबिहार ट्रॉफी ही भारताची अंडर-19 खेळाडूंसाठीची फर्स्ट क्लास डोमेस्टिक टूर्नामेंट आहे. प्रखरने कर्नाटकसाठी […]Read More

देश विदेश

तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूच्या खेळात ४५ जण जखमी

चेन्नई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेटासोबत झालेल्या न्यायालयीन लढाईनंतर आता तमिळनाडूमध्ये सांस्कृतिक महत्त्व असणाऱ्या जलीकट्टू खेळाचा मार्ग मोकळा झाल्याने मोठ्या प्रमाणात जलीकट्टू आयोजन केले जात आहे. मात्र या जीवघेण्या खेळात दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील नागरिक जखमी झाले आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी तामिळनाडूमध्ये पोंगल सण सुरू झाला आहे. जल्लीकट्टू हा त्याचाच एक भाग आहे. […]Read More