Month: August 2023

महानगर

सचिन तेंडुलकरच्या घरासमोर बच्चू कडूंचे आंदोलन

मुंबई, दि. ३१ (एमएसी न्यूज नेटवर्क) : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेने आज सचिन तेंडुलकर यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी देव आमचा जुगार खेळतो, परत करा, परत करा, भारत रत्न परत करा, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. […]Read More

ऍग्रो

केंद्राकडून इथेनॉलच्या दरात वाढ

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारनं 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (Ethanol) मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीनं सरकारचे प्रयत्न देखील सुरु आहेत. दरम्यान, येणाऱ्या नवीन 2024 या वर्षात 12 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (petrol) मिळणार मिळणार आहे. 2023 पर्यंत पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण […]Read More

देश विदेश

पंतप्रधानांनी बोलावले विशेष अधिवेशन, कारण मात्र गुलदस्त्यात

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 20 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान संसेदचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत येऊन यावर बोलावं या मागणीवर अडून राहिले होते. त्यांनंतर आता केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद […]Read More

देश विदेश

अदानी प्रकरणी राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना तीन सवाल

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी विमानतळाजवळच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करत सवाल उपस्थित केले. राहुल गांधी म्हणाले, अदाणींच्या कंपनीत पैसा कोणाचा आहे? तो […]Read More

देश विदेश

हजारो भारतीय VFX आर्टीस्टचा जॉब या कारणामुळे धोक्यात

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हॉलिवूडमध्ये गेल्या १५५ दिवसांपासून लेखक आणि कलाकार मंडळींचा AI च्या वाढत्या वापराबाबत संप सुरू आहे. यामुळे भारतीय VFX आर्टीस्ट्सचे जॉब धोक्यात आले आहे. ६३ वर्षांतील सर्वात मोठ्या संपामुळे मोठे प्रोडक्शन हाऊस बंद झाल्याने १० हजारांपेक्षा जास्त व्हीएफएक्स आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स(सीजी) कलाकारांचे रोजगार संकटात आले आहेत. सुमारे २ लाखांपेक्षा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणेकरांचा मेट्रोला भरभरून प्रतिसाद

पुणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मेट्रोला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद दिला असून १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत २०,४०,४८४ प्रवासी ट्रिप मध्ये ३,०७,६६,४८१ रुपये उत्पन्न मिळविले आहे. सरासरी दरदिवशी ६५,८२२ मेट्रो प्रवास असा हा प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट २०२३ रोजी फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे ते रुबी […]Read More

राजकीय

बालीश पुन्हा एकदा बरळला…

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांचे जिजाजी, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रॉ आणि उद्योगपती अदानी यांचे संबंध काय? ते कोणत्या प्रकल्पावर काम करत आहेत? ममता बॅनर्जी आणि उद्योगपती अदानी एकमेकांना का भेटले? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत,गौतम अदानी सोबत काय करत आहेत? शरद पवारांचे आणि उद्योगपती अदानी यांचे काय संबंध आहेत? […]Read More

महानगर

देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम; एकनाथ शिंदे फक्त चेहरा

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारपदावरून स्पर्धा सुरु आहे. अजित पवार यांच्या दादागिरीचा अनुभव मविआ सरकारने पाहिला आहे पण सध्या त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे. राज्यातील सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा आहेत आणि खरे मुख्यमंत्री ‘सुपर […]Read More

राजकीय

केंद्रासमोर राज्याची भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगावर सोपविली आहे. हे राज्यातील मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. केंद्र सरकार जे सांगते त्या पावलावरती पाऊल इथलं सरकार टाकत आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार पंतप्रधान कार्यालयाच्या मार्फत मुंबई चालवणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी […]Read More

महानगर

घमेंडीयाची बैठक म्हणजे डरपोकांचा मेळावा

मुंबई,दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घमेंडिया नावाने गोळा झालेल्या 28 पक्षांना आमचा सवाल आहे की, तुम्ही लोकशाही वाचवायला एकत्र आला की, स्वतःचे कुटुंब वाचवायला एकत्र आला आहात? माझे कुटुंब माझी जबाबदारी याचा राष्ट्रीय खेळ सुरू आहे का? ज्या मुंबईतून “क्विट इंडिया” मोहीम सुरू झाली त्या मुंबईकरांच्या वतीने आम्ही तुम्हाला “चले जाव…” म्हणत आहोत. घमेंडीया […]Read More