Month: May 2023

राजकीय

आता मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे धोरण

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास ५५ ते ६० वर्षे कालावधी लोटला आहे. बहुतांश इमारती मोडकळीस आलेल्या असून त्या […]Read More

राजकीय

फडणवीसांनी परमवीर सिंहाच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अँटिलिया स्फोटकाचा कट रचून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आता उघडे पडले असून परमवीर सिंह हे फडणवीसांच्या हातचे बाहुले होते हे स्पष्ट झाले आहे. परमवीर सिंहानी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता […]Read More

राजकीय

महेश आहेर प्रकरण राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांना केले तडीपार

ठाणे,दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि कळवा-मुंब्राचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांची कौटुंबिक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना ठाणे पालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मारहाण केली होती. त्या राष्ट्रवादीच्या अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. ठाणे […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ बैठक: संक्षिप्त निर्णय १६ मे २०२३

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये. भरीव वाढ.(कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभाग) अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय(पदुम विभाग) इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ (उद्योग विभाग) मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण (सामाजिक न्याय) सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली […]Read More

राजकीय

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे चुकीचे अर्थ माध्यमांनी लावले

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे चुकीचे अर्थ लावून चुकीची आणि अर्धवट माहिती माध्यमांनी दिली . समाजमध्यमातही चुकीचे संदेश प्रसारित करण्यात आले असा ठपका उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने ठेवला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती त्यांनी समाज माध्यमातून प्रसिद्ध केली आहे,ती पुढीलप्रमाणे…. सुप्रीम कोर्टाने शिवसेना वादावर महत्वपूर्ण निकाल […]Read More

खान्देश

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी विशेष चौकशी समिती

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले आहेत. ही एसआयटी केवळ […]Read More

Uncategorized

अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे

** मुंबई, दि.१५ – अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींनंतर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात असून […]Read More

क्रीडा

ICC कडून फलंदाजांना हेल्मेट बंधनकारक

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आता विशिष्ट परिस्थितीत हेल्मेट अनिवार्य केले आहे. आपण फक्त विकेट किपर्सनीच हेल्मेट घातलेले पाहतो. पण आता हेल्मेटची सक्ती जेव्हा फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागतो, जेव्हा यष्टीरक्षक स्टंपपर्यंत उभे असतात आणि क्षेत्ररक्षक विकेटसमोर फलंदाजाच्या जवळ असतात तेव्हा करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार, आयसीसीने ‘हाय-रिस्क […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. २५ जून ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जून रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरपूर आषाढी […]Read More

देश विदेश

या अत्याधुनिक युद्धनौकेवरून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या INS मुरगाव या अत्याधुनिक नवीन युद्धनौकेवरून ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने या युद्धनौकेची रचना केली असून ही जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र वाहक शस्त्रांनी सुसज्ज आहे. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका, विमान किंवा जमिनीवरून सोडले जाऊ शकते. […]Read More