Month: November 2022

ऍग्रो

शेतकऱ्यांनी अडविला मंत्र्यांचा ताफा

औरंगाबाद, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यात कृषी मंत्री व पालक मंत्री याच्या गाड्यांचा ताफा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला. सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसून त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पालक मंत्री संदिपान घुमरे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महालक्ष्मी मंदिरास भेट स्वरूपात मिळाला दुर्मिळ खजिना

कोल्हापूर दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या संदर्भात ग्रंथालय उभे करण्यात येणार आहे. या ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील एक हस्तलिखित प्राप्त झालं आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर! यामंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या […]Read More

मराठवाडा

स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे

औरंगाबाद, दि.19 :- आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा आहे. स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. शरद पवार, पद्मभुषण डॉ.विजय भटकर, कुलगुरू डॉ.प्रमोद […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना

मुंबई दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांच्या 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरोग्‍य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा यात समावेश आहे. समितीचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. Reconstitution of High Level Committee on Maharashtra-Karnataka […]Read More

विदर्भ

भारत जोडो यात्रेने देशात परिवर्तन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

बुलढाणा दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारीपासून निघालेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र हे काँग्रेस विचारधारेला मानणारे राज्य आहे. या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपाने निर्माण केलेली भिती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रेला […]Read More

गॅलरी

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

ठाणे, दि. १९ : (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. Chief Minister Eknath Shinde greeted Indira Gandhi ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ML/KA/SL 19 […]Read More

विदर्भ

भारतीय वायुसेने तर्फे एअर फेस्ट शो

नागपूर दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  युवक,युवतींना भारतीय वायुसेनेकडे आकर्षित करण्याचा उद्देशाने आज नागपूरात भारतीय वायुसेने तर्फे एअर फेस्ट शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एअर मार्शल विभास पांडे Air Marshal Vibhas Pandey  यांची प्रमुख उपस्थिती होती. Air Fest Show by Indian Air Force. वायुसेनेच्या वैमानिकांनी चित्तथरारक हवाई कवायती सादर करून उपस्थितांचे मने यावेळी जिंकली. […]Read More

Featured

यूकेची महागाई 41 वर्षांच्या उच्चांकावर बाजाराच्या सेंटीमेंटला धक्का

मुंबई,दि.19 (जितेश सावंत) : जिओपॉलिटिकल अनिश्चितता आणि यूकेची महागाई 41 वर्षांच्या उच्चांकावर वाढल्याने बाजाराच्या सेंटीमेंटला धक्का बसला.गेल्या आठवड्यात बाजार किरकोळ नुकसानासह बंद झाला. ऑक्टोबरमधील WPI महागाई 19 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली आणि CPI महागाई अपेक्षेप्रमाणेच राहिली.गेल्या आठवड्यात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निव्वळ खरेदी केली. सध्या जगभरातील महागाईने कळस गाठला असून त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रदीर्घ काळ […]Read More

Uncategorized

एलॉन मस्कच्या कडक धोरणा विरोधात शेकडो कर्मचाऱ्यांचा ट्विटरला रामराम

मुंबई,दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे गेले काही दिवस या कंपनीत रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरमधून एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून शेकडो कर्मचारी स्वत:च नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. “कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी […]Read More

महानगर

एसटीच्या ताफ्यात येणार पाच हजार इलेक्ट्रिक आणि दोन हजार डिझेल

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक […]Read More