Milind

पश्चिम महाराष्ट्र

‘दगडूशेठ’ गणपती मंदिराला अंगारकीनिमित्त भव्य पुष्पआरास

पुणे दि ६ : ओम् गं गणपतये नम :…गणपती बाप्पा मोरया… जय गणेश… मंगलमूर्ती मोरया… अशा गणेश नामाच्या जयघोषाने ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नववर्षातील पहिला अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली पारंपरिक आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

पुणे दि ६ : माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश शामराव कलमाडी यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले, ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा , दोन विवाहित मुली तसेच परिवार आहे. कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते, माजी खासदार आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक होते. सुरेश कलमाडी पुणे […]Read More

महानगर

मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी विभाग स्तरावर भरारी पथके कार्यरत

मुंबई, दि ५बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ यांच्याद्वारे कळविण्यात आल्यानुसार हिवाळ्यात हवेच्या कमी तापमानामुळे व वेगवान वा-याच्या अभावाने जमिनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. मुंबईच्या नैसर्गिक हवामानाच्या स्थितीनुसार दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रदूषणाच्‍या प्रमाणात वाढ होत असते. मुंबई शहरातील वायू प्रदूषण वाढण्‍यास विविध कारणे कारणीभूत आहेत. यामध्‍ये औद्योगिक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

माईंचा खडतर प्रवासाची गोष्ट उलगडून सांगणारा चिंधीची गोष्ट हा बालकथासंग्रह

पुणे, दि ५: सिंधुताई सपकाळ या कारुण्याचा झरा होत्या, सेवेतून त्यांनी आपले कार्य केले आणि ते करत असताना त्यांनी इतरांच्या कार्यालाही मदत केली, सामाजिक कार्यात कार्यरत असलो तरी मला लोकांशी मदत मागायला कसे बोलायचे हे समजत नसे, त्यावेळी त्यांनी मला सांगितले तुम्ही बोलला नाही तर तुमचे कार्य समजणार कसे, त्यांनी मला एक प्रकारची ऊर्जा दिली […]Read More

ऍग्रो

एडीएम आणि बायर यांची अन्न मूल्य साखळीतील भागीदारी अधिक मजबूत,महाराष्ट्रातील

गुरुग्राम, दि ५:एडीएम (NYSE: ADM) आणि बायर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या अन्न मूल्य साखळी (Food Value Chain) भागीदारीला पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही भागीदारी प्रथम २०२२ मध्ये सुरू करण्यात आली असून याला प्रचंड यश मिळाले आहे. नव्या विस्तारामुळे हा उपक्रम शेतकरी उत्पादक संघटनांच्या (FPOs) माध्यमातून २५,००० वरून १,००,००० शेतकऱ्यांपर्यंत […]Read More

राजकीय

बदल घडणार!आम्ही सज्ज आहोत विजयासाठी!

मुंबई, दि ५ : भांडुप वॉर्ड क्र. 114 मधून मुंबई महापालिका निवडणूक 2026 (उबाठा-मनसे)च्या उमेदवार राजूल संजय पाटील यांचा प्रचाराचा जोर दिवसन दिवस वाढतच आहे. मुंबईचा विकास, मराठी माणसाचा हक्क आणि प्रभागाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना–मनसेची युती एकजुटीने मैदानात उतरली आहे.या प्रचार फेरीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेताहेत. यावेळी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठ व कसबा पेठ

पुणे, दि ५:–पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक ५ जानेवारी२०२६ रोजी सकाळी भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले प्रशाला येथे व कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय यांचे न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील मतदान प्रक्रिये संदर्भात महत्त्वपूर्ण पाहणी करण्यात आली. या पाहणीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री.नवल किशोर राम, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, भवानी […]Read More

राजकीय

एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस वर्षाअखेरपर्यंत दाखल करा…

मुंबई दि. ५ — सन २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतिमान करण्यात यावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम परिवहन मंत्री तथा एसटी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चित्पावन शांडिल्य गोत्री जोशी स्नेहसंमेलनात फडणीस यांना ‘कुलभूषण’ पुरस्कार

पुणे, दि. ५ ( शेखर जोशी ):ज्ञातींची होणारी कुलसंमेलने म्हणजे कुटुंबाचीच विस्तारित संकल्पना आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ हास्य -व्यंगचित्रकार शि.द. फडणीस (मूळचे चित्पावन शांडिल्य-आडनाव जोशी) यांनी रविवारी येथे केले.महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानने सुपर्ण मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या ४० व्या चित्पावन शांडिल्य गोत्री जोशी स्नेसंमेलनात ते बोलत होते. भूगर्भशास्त्र विषयात डॉॅक्टरेट पदवी मिळविलेले प्रा. संशोधक डॉ. मुकुंद […]Read More

महानगर

…ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगी ; योगेश वसंत त्रिवेदी यांनी

मुंबई, दि ५: साप्ताहिक आहुति च्या हीरक महोत्सवी समारंभात अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाली ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगीच म्हणावी लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. साप्ताहिक आहुतिचा हीरक महोत्सवी समारंभ अंबरनाथ येथील वडवली विभागात असलेल्या रोटरी सभागृहात प्रहारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार श्री पद्मभूषण देशपांडे आणि ठाणे जिल्हा […]Read More