Milind

क्रीडा

सोलापूर येथे होणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार!

पुणे दि ३ : सोलापूर येथे दिनांक २८ आणि २९ मार्चला चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेकडे स्पर्धेचे संयोजनपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार आहे. यापूर्वी तिने […]Read More

कोकण

सावर्डेमध्ये होल्ट्या शिमग्याची अनोखी प्रथा….

रत्नागिरी दि ३ : चिपळूण तालुक्यातील सावर्डेमध्ये शिमगोत्सवात एक अनोखी प्रथा जपली जाते. इथं चक्क पेटते निखारे एकमेकांवर फेकले जातात. यालाच होल्टा शिमगा असे म्हणतात. या खेळात गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहतात, लाकडं पेटवतात. ढोल ताश्यांच्या गजरात आरोळ्या ठोकतात आणि सुमारे तीन फुटांच्या अंतरावरून पेटती लाकडं तीन फेरीत तीन वेळा एकमेकांवर फेकतात. मात्र ही […]Read More

राजकीय

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये..

मुंबई दि ३ : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत […]Read More

महानगर

तरुणांनी धोरण निर्मितीला आकार देण्याचे काम करावे – राजोल पाटील

मुंबई, दि. २ – मारवाडी विद्यापीठ, द सेंटर फॉर युथ पॉलिसी व कोनराड-एडेनॉअर-स्टिफ्टंग (केएएस) इंडिया यांनी राजकोट येथे ‘युवा आणि लोकशाही परिषदे’चे आयोजन केले होते. या परिषदेत निवडून आलेले तरुण लोक प्रतिनिधी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासक यांना एकत्र आणण्यात आले होते. या परिषदेने लोकशाही सहभाग, जागतिक दृष्टिकोन, नागरी तंत्रज्ञान, मीडिया व डिजिटल […]Read More

बिझनेस

अमेरिका, इजरायल विरुद्ध इराण युद्धामुळे सोन्याला प्रचंड तेजी

मुंबई, दि २अमेरिका इजरायल विरुद्ध इराण येथे सुरू असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीचे भावात प्रचंड वाढ झाली आहे. या युद्धामुळे सोने एक लाख 75 हजार रुपये तोळा झाले असून चांदी तीन लाख पाच हजार रुपये किलो झाली आहे. लग्नसराईचे दिवस सुरू झाले असून मोठ्या प्रमाणामध्ये सोने, चांदीच्या दागिनामध्ये वाढ झाल्यामुळे नवरा आणि नवरीचे बजेट कोलमडले […]Read More

महानगर

अभिनेते विजय पाटकर यांना धगधगती मुंबईचा जीवनगौरव पुरस्कार

मुंबई, दि. १ : ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय पाटकर यांना भीमराव धुळप यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या धगधगती मुंबईतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विवेक पाटकर यांनाही उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्या प्रत्येकाला सन्मानाचे भाग्य मिळत नाही. परंतु धगधगती मुंबई च्या माध्यमातून संपादक भीमराव धुळप […]Read More

विदर्भ

राऊळगाव स्फोटातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत, दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे

मुंबई, दि. १:- नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित कंपनी देखील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले […]Read More

विदर्भ

एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये झालेल्या स्फोटात १७ ठार

नागपूर दि १ : कळमेश्वर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव स्थित एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) १७ ठार झाल्याची माहिती आहे. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याला दुजोरा दिला. या स्फोटात १८ जण जखमीं झाले आहेत. जखमींना नागपुरातील अॅारेंजसिटी रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे. नागपुरातील कळमेश्वर (नागपूर) येथील एसबीएल […]Read More

महानगर

महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा.

मुंबई, दि १जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली.स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी माननीय महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घाटकोपर (पूर्व) परिसरातील पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदान येथे भेट दिली. महापौर श्रीमती […]Read More

राजकीय

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला गन्ना किसान हे

मुंबई, दि १- येत्या एप्रिल मे महिन्यात आसाम, पाँडेचेरी, केरळ, तामिळनाडु, आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक यंदाच्या वर्षी होत आहेत.या आगामी पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणुक आयोगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाला गन्ना किसान ( ऊस शेतकरी) हे निवडणुक चिन्ह दिले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय […]Read More