Milind

महानगर

विजयाची मशाल निश्चितच प्रज्वलित होणार

मुंबई, दि १२भांडुपच्या प्रभाग क्र ११४ च्या उमेदवार राजुल संजय पाटील (उबाठा/मनसे) यांची रमाबाई नगर नं. १ ते अशोक केदारे चौकपर्यंत काल भव्य प्रचार फेरी पार पडली. या फेरीला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे, आणि त्यांच्या साथीने प्रभाग क्र ११४ मध्ये विजयाची मशाल निश्चितच प्रज्वलित होणार आहे असे राजुला पाटील यांनी माध्यमाशी […]Read More

राजकीय

सत्तेच्या गणितात भाजपची नैतिकता शून्य

ॲड. श्रीनिवास बिक्कड देशात आणि राज्यात मूळ संघ, भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेच पक्षात अल्पसंख्यांक झाले आहेत. ज्यांनी कठीण काळात पक्ष वाढवला, संकटात झेंडे हातात घेतले, सत्ता नसताना उपेक्षा आणि अपमान सहन केले. असंगाशी संग आणि विचारांना तिलांजली ही स्वत:ला पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपची सध्याची स्थिती आहे. नैतिकता, शूचिता आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचे गोडवे गाणाऱ्या […]Read More

पर्यावरण

ईरई नदीकाठी वाघीण मृतावस्थेत आढळली

चंद्रपूर दि १२ :- चंद्रपूर वनविभागांतर्गत येणाऱ्या पायली-भटाली बिटमधील दुर्गापूर क्षेत्रात, चिचोली गावाजवळ ईरई नदीकाठी नॉन-फॉरेस्ट (वनबाह्य) परिसरात सकाळच्या सुमारास एक तरुण वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक पाहणीत मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे तसेच शरीराचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून वनविभागाकडून सखोल चौकशी […]Read More

ऍग्रो

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शुद्ध गावरान गुळाची वाढली मागणी…

वाशीम दि ११ : वाशीम जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावरान गुळाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील रिधोरा परिसरात सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या शुद्ध गावरान गुळासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. संक्रांतीसाठी आवश्यक असलेल्या तिळगुळासाठी यंदा ग्राहकांचा कल बाजारातील प्रक्रिया केलेल्या गुळाऐवजी नैसर्गिक, रसायनमुक्त गावरान गुळाकडे अधिक झुकलेला दिसून येत […]Read More

महानगर

मुंबईसाठी पायाभूत सुविधांचे नवे युग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा

भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी आणि देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या मुंबईने गेल्या दशकात अशा एका परिवर्तनाचा अनुभव घेतला आहे, ज्याची तुलना जागतिक स्तरावरील केवळ मोठ्या महानगरांशी केली जाऊ शकते. दुर्दैवाने एकेकाळी रखडलेले प्रकल्प, वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील प्रचंड ताण ही मुंबईची ओळख बनली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या ‘मुंबई […]Read More

खान्देश

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र

By विक्रांत पाटील जळगाव येथील जैन हिल्सवर दरवर्षी भरणारा कृषी महोत्सव हा केवळ एक प्रदर्शन किंवा मेळावा नाही, तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक ‘कृषी तीर्थक्षेत्र’ बनला आहे. हे एक असे ठिकाण आहे, जिथे शेतकऱ्यांना केवळ नवीन तंत्रज्ञान पाहता येत नाही, तर ते आत्मसात करून आपल्या शेतात क्रांती घडवण्याची प्रेरणा मिळते. या महोत्सवामागे एक प्रामाणिक विचार […]Read More

विदर्भ

काटेपूर्णा अभयारण्यात पार पडली आशियाई पाणपक्षी गणना

वाशिम दि ११ : पश्चिम विदर्भातील वाशीम व अकोला जिल्ह्यात विस्तारलेले, ‘पाणी देणार जंगल’ अशी ओळख असलेले काटेपूर्णा अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या अभयारण्यात असलेला जलाशय देशी-विदेशी पाणपक्ष्यांचे प्रमुख आश्रयस्थान असून दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या संख्येने दाखल होतात. काटेपूर्णा जलाशयातील मानवनिर्मित द्वीपावर शेकडो पाणपक्ष्यांचा वावर कायमस्वरूपी पाहायला मिळतो. […]Read More

राजकीय

राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये

कर्तृत्त्ववान, युवा उमेदवाराला मत देण्याचे आवाहन मुंबई, दि. १० – ऱाष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भांडुप पश्चिम येथे येऊन राजुल संजय पाटील यांचा प्रचार केला. राजुल या कष्टाळू, कर्तृत्त्ववान असून आपल मत युवा पिढीच्या राजुल पाटील यांना द्यावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. राजुल पाटील या प्रभाग क्रमांक ११४ मधून निवडणुक लढवित आहेत. […]Read More

क्रीडा

ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे भव्य उद्घाटन*

पुणे, 9 : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा आठवा हंगाम २३ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी […]Read More

ऍग्रो

आष्टीच्या डांगर भोपळ्याला ५ राज्यांतून मागणी; ८ महिन्यांत ४५ टन

बीड दि ९ ( रोहिदास हातांगळे ) ….दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडच्या मातीतून सोन्यासारखं पीक कसं काढायचं, हे आष्टी तालुक्यातील एका दुर्गम भागातील महिला शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. कानडी खुर्द मेहकरी येथील महिला शेतकरी मंदाकिनी नानासाहेब गव्हाणे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय डांगर भोपळ्याची यशस्वी लागवड केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या भोपळ्याचा […]Read More