मुंबई, दि २९उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बारामती येथे विमान दुर्घटनेमध्ये अपघाती मृत्यू झाला त्याचे पडसाद आज मंत्रालयात पाहायला मिळाले. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर त्यांच्या दालनामध्ये नागरिकांची रोजच मोठया प्रमाणात गर्दी असते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक मंडळी मंत्रालयात आपली शासकीय कामे करण्यासाठी सहाव्या मजल्यावर येत असतात. मंगळवारीच मंत्रालयातील कॅबिनेट बैठकीसाठी अजितदादा मंत्रालयात आले होते. अनेक नागरिकांनी आपली […]Read More
मुंबई, 29बुधवार, २८ जानेवारी २०२६ हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात हा दिवस कधीही विसरता येणार नाही. एका दु:खद विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकस्मात निधन झाले आणि संपूर्ण राज्य शोककळेत बुडाले. ठाम निर्णय, निर्भीड भूमिका आणि प्रशासनावरची पकड यासाठी ओळखले जाणारे अजितदादा अचानक काळाच्या पडद्याआड गेले, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या घटनेनंतर […]Read More
पुणे दि २९ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पुढाकाराने जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत महाराष्ट्रातील १७७१ दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात येत आहेत. थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील ट्रस्टच्या आरोग्य सेवा केंद्र, हिराबाग कोठी येथे हे शिबीर आठवडाभर चालणार आहे. टाटा ऑटोकॉम सिस्टिम्स, पिनॅकल इंडस्ट्रीज आणि श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपूर […]Read More
मुंबई, दि २८महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जाण्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरू न शकणारी आहे. ईशान्य मुंबईखासदार संजय दिना पाटील यावेळी म्हणाले की, माझे पवार कुटुंबीयांचे अतिशय घनिष्ठ संबंध असून राष्ट्रवादीत असताना दादांशी नेहमी चर्चा होत असे, त्यांचा जनता दरबार असो वा मंत्रालय ते नेहमी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न […]Read More
धुळे दि २८ – धुळे जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ,थाळनेरसह शिरपूर परिसरात गारपीट झाली. अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या गारपिटीचा फटका थाळनेर, अजनाड, सावेर, बभळाज, तरडी, होळनांथे, भाटपुरा, अहिल्यापूर, वाठोडा, नागेश्वर बंगला इत्यादी गावांच्या शिवारांना बसला आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, […]Read More
मुंबई, 27 :मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातील प्रलंबित थकीत असलेली ग्रॅज्युइटी(उपदान) व इतर देणी त्वरीत मिळावी यासाठी बेस्ट उपक्रमामधील परिवहन व विद्युत सेवेतील सेवानिवृत अधिकारी, कर्मचारी यांनी मंगळवारपासून आझाद मैदानात साखळी बेमुदत उपोषण सुरु केले.याचे बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिती अध्यक्ष भाई पानवडीकर नेतृत्व करीत आहेत. मुंबईकरांना वीजपुरवठा व परिवहन या बेस्ट उपक्रमातून ३०ते ३५ वर्षे […]Read More
मुंबई, दि. २७ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना मंत्रालयातील त्यांच्या दालनात निवेदन दिले. वनमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तत्काळ आदिवासी बांधवांची घरे तोडण्याच्या कारवाईला महाराष्ट्र शासनातर्फे स्थगिती देण्याचे आदेश वन […]Read More
मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीभारताचे संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला.इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंटस मॅनेजमेंटचे संचालक, समाजसेवक के . रवी ( दादा ) यांनी मुंबई टाटा कॅन्सर रुग्णालयाबाहेरील फुटपाथवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एक विशेष कार्यक्रम केला.या […]Read More
मुंबई, 27 : भारतामध्ये घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ना-नफा तत्वावरील उद्योग मंडळ होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) तर्फे बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती ‘कॉम्फर्ट’ विरोधात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. ‘कॉम्फर्ट’ ही डास प्रतिबंधक अगरबत्ती महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे विक्रीस उपलब्ध असून ती मेसर्स धूप छांव कंपनी यांचे […]Read More
मुंबई दि २७ : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमीन विविध कारणांसाठी ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येतात. त्यांचा कालावधी पुढे ४९ वर्षांपर्यंत वाढवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाच्या मालकीच्या […]Read More