मुंबई दि २५ : कोकणातील आंबा आणि काजू या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून त्यांना यावेळी फळ पिक विमा आधारित नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली, याबाबत झालेल्या बैठकीनंतर प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही घोषणा त्यांनी केली. ज्या शेतकऱ्यांनी फळ पिक विमा काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना देखील हेक्टरी 22 हजार रुपये इतकी […]Read More
मुंबई दि २५ : अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामध्ये घातपात असेल तर तो करणाऱ्याचे मुडदे देखील खणून काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केवळ राज्याची बदनामी व्हावी यासाठीच यासंदर्भातील एफ आय आर कर्नाटक सरकारने दाखल करून तो राज्याला पाठवला आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरण्यासाठी […]Read More
मुंबई, दि २५- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा प्रशासकीय दरारा… कामाचा धडाका आणि विकासाची दूरदृष्टी आता पुढच्या पिढीला अभ्यासता यावी, यासाठी त्यांच्या जीवनावर आधारीत एक विशेष धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत आज केली.अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी ही महत्वपूर्ण […]Read More
मुंबई, दि २५सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वी न जमा केल्यास संबंधित मालमत्ताधारकांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. निश्चित केलेल्या ध्येयानुसार कर संकलन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच, थकीत करभरणा न करणाऱ्या मालमत्तांवर तत्काळ अटकावणी आणि जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. […]Read More
मुंबई, दि २५बेरड आणि रामोशी समाजाच्या एकजुटीचे आणि प्रगतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाणारी राज्यव्यापी नोकरदार परिषद येत्या २९ मार्च रोजी मराठी ग्रंथसंग्रहालय, अग्निशमन दलाशेजारी, जुने शारदा टॉकीज जवळ, दादर (पूर्व), मुंबई, येथे होणार आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी दिशा ठरविण्याचा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. इतिहास पाहता शौर्य, […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ – कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित फ्रेन्डस् ऑफ एमएसएमई इन पार्लियामेंट (Friends of MSME in Parliament) या महत्त्वपूर्ण बैठकीत देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. काल सायंकाळी झालेल्या या बैठकीत उद्योग क्षेत्रासमोरील विविध अडचणी, आर्थिक व प्रशासकीय अडथळे, तसेच वाढीच्या […]Read More
मुंबई दि २५ : राज्याच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत “महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५” अंतर्गत २०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाच्या वतीने परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे. सभागृहात नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना मंत्री सरनाईक यांनी हे धोरण मांडले. […]Read More
मुंबई, दि २५मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन केंद्राचा विकास हा मुंबईची जागतिक ओळख स्थापन करणारा, मुंबईकरांच्या अस्मितेशी जोडलेला आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महसुलात भर टाकणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावयाची आहे. पुढील १५ दिवसांत या चारही प्रवेशद्वारांची संकल्पना सादर करावी. या चारपैकी ऐरोली प्रवेशद्वार […]Read More
मुंबई दि २५ : राज्यातील महत्त्वाच्या गोसीखुर्द प्रकल्प संदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, मदत व मोबदला यासंबंधीचे प्रश्न शासनाच्या गांभीर्याने विचाराधीन असून, लवकरात लवकरच समग्र निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली. सभागृहात संजय मेश्राम यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री जयस्वाल म्हणाले की, गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित गावांमध्ये पुनर्वसन, मोबदला व […]Read More
मुंबई दि २५ : शक्ती कायदा आता अधिक कडक करण्यासाठी शक्ती कायद्यात आता बलात्कारित स्त्री सोबतच ॲसिड हल्ल्यातील स्त्रीची ओळख पटू नये यासाठी बंदी. त्यासोबतच समाज माध्यमांवर महिलांसोबतचे अश्लील चित्रण, छायाचित्रे, AI वापरून त्यांची बनावट चित्रे अथवा चित्रफिती तयार करून प्रसारित करणे यावर बंदी घालण्याची तरतूद असणारे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चेअंती मंजूर […]Read More