Milind

सांस्कृतिक

रामनवमी निमित्ताने धायरी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन

पुणे, दि २७:   रामनवमीनिमित्त धायरी परिसरात भगवान श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत स्थानिक नागरिक, युवक व महिला मोठ्या उत्साहाने पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले. या शोभायात्रेमुळे धायरीत प्रचंड उत्साहाचे, भक्तिपूर्ण आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. सरकार प्रतिष्ठान, अखिल नरवीर तानाजी मालुसरे पथ श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने ही शोभायात्रा आयोजित करण्यात […]Read More

महानगर

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरीवाल्यांना न्याय द्या

मुंबई, दि २६ अधिकृत व अनधिकृत असे फेरीवाले कोण ? याबाबत न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाहून पालिका पोलिस प्रशासन व सरकारचे प्रतिनिधी तसेच रेल्वे हद्दीतील किंवा इतर कोणाच्याही हद्दीतील फेरीवाले यांच्याबाबत योग्य तो तोडगा काढत फेरीवाल्यांना न्याय द्यावा. अशी मागणी आझाद होकर्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघ […]Read More

महानगर

परळ गाव येथील बंद रस्त्यामुळे रहिवाशी हैराण, टॅक्सीने होतोय प्रचंड

मुंबई, दि २६परळ गाव येथील ग.द आंबेकर मार्गावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या समोर भोईवाडीच्या दिशेकडे जाणारा रस्ता दुरुस्तीचे नावावर बंद ठेवला आहे. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना प्रचंड मनस्ताप होत असून परळ गाव ते केम रुग्णालय येथून फिरून पुन्हा भोईवाडा नाका येथे दुसऱ्या मार्गाने जावे लागत असल्याने अवाच्या सव्वा टॅक्सीवर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे येथील […]Read More

राजकीय

हक्कभंग समितीने सूर्यकांत मोरेंना सुचवलेली शिक्षा योग्यच, तरीसुद्धा…” म्हणत मुख्यमंत्री

मुंबई २६: अहिल्यानगर येथील जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती आणि सभागृहाच्या सदस्यांविषयी कथितपणे केलेल्या आक्षेपार्ह विधानासाठी त्यांना परिषदेतील आमदार श्री प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखालील हक्कभंग समितीने दिलेला अहवाल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ठरवला. मात्र त्यात सुचविलेली शिक्षा मात्र कमी करण्याची […]Read More

बिझनेस

‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ची बी-टू-बीमधील भक्कम कामगिरीच्या माध्यमातून झाली यशस्वी सांगता

मुंबई, दि २६: प्लास्टिकच्या तयार उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ या २३ ते २५ मार्च २०२६ दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आयोजित बी-२-बी प्रदर्शनाची यशस्वी सांगता बुधवारी बांद्रा येथे यशस्वीरीत्या झाली. या प्रदर्शनात जागतिक खरेदीदार, भारतीय एमएसएमई आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज एकत्र आले आणि त्यामुळे निर्यातकेंद्रित व्यवसाय वृद्धीसाठी हे एक प्रभावी […]Read More

महानगर

दक्षिण मुंबईतील घरगल्ल्या होणार मजबूत! दुरुस्तीसाठी पालिकेचा ३ कोटींचा आराखडा

मुंबई, दि २६: दक्षिण मुंबईतील काळबादेवी, चिरा बाजार, चंदनवाडी आदी दाटीवाटीच्या भागांतील घरगल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात या घरगल्ल्यांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या उपक्रमामुळे जुन्या व अरुंद घरगल्ल्या अधिक मजबूत आणि सुस्थितीत येण्याची अपेक्षा आहे. दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये जागेअभावी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

श्रीराम दरबार मध्ये श्रीराम नवमी उत्साहात साजरी

पुणे, दि २६- जय श्रीराम चा जयघोष, श्रीराम जय राम जय जय राम मंत्राचा अखंड मंत्रोच्चार, विविध रामभक्तीपर गीतांचा जागर आणि हजारो राम भक्तांची उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणात कोंढवा खुर्द येथील श्री संकट हरण महादेव मंदिराच्या आवारातील श्रीराम दरबार मध्ये श्रीराम नवमी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.पवन बंसल आणि सुनीता बंसल यांनी आपला नातू मास्टर […]Read More

सांस्कृतिक

कॉटन ग्रीन येथील प्राचीन राम मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

मुंबई, दि २६कॉटन ग्रीन येथील प्राचीन कालीन राम मंदिरात रामनवमीच्या पावन उत्सवानिमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी करून श्रीरामाचे दर्शन घेतले. हे मंदिर 1935 साली स्थापन झाले असून या मंदिराला मोठा इतिहास आहे. या मंदिराला इच्छापूर्ती राम मंदिर असे संबोधले जाते. या मंदिरामध्ये केलेला नवस पूर्ण होतो अशी येथील मंदिराची आख्यायिका आहे. हे मंदिर संपूर्णपणे एका मार्बल […]Read More

सांस्कृतिक

शिवचरित्राचे अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांचे निधन

कोल्हापूर दि २६ : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांचे कोल्हापुरात निधन झाले. यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर अंत्यदर्शनासाठी कोल्हापुरात येत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनक्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर […]Read More

महानगर

पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) उपक्रमाचा प्रशासनाकडून आढावा

मुंबई, दि २५ बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे महानगरपालिकेच्या सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते ४ थीच्या सुमारे १ लाख २० हजार विद्यार्थ्यांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ( Foundational Literacy and Numeracy) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक प्रगतीची आढावा बैठक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील […]Read More