Milind

राजकीय

राज्य निवडणूक आयुक्तांची ‘राष्ट्रीय परिषद’ २४ फेब्रुवारीला नवी दिल्लीत

मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) वतीने राज्य निवडणूक आयुक्तांची (State Election Commissioners – SECs) राष्ट्रीय परिषद २४ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील राज्य निवडणूक आयुक्त या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, ही राष्ट्रीय परिषद २५ वर्षांहून अधिक कालावधीनंतर […]Read More

महानगर

करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण

मुंबई, 5करी रोड येथील महादेव पालव मार्गावरील पदपथावर मध्यभागी इमर्जन्सी अग्निशमन पाण्याचे हायड्रेल असल्याने पादचाऱ्यांना ये जा करणे फार त्रासदायक झाले आहे. फोनवर बोलताना तसेच लक्ष नसताना चालताना हे हायड्रेल पायामध्ये अडकून अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. करी रोड, लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात होलसेल मार्केट असल्याने या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. […]Read More

महानगर

विक्रोळी येथे आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

मुंबई : 5 – हुमाना पीपल टू पीपल इंडिया आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या प्रकल्प निरामया मार्फत विक्रोळी इस्ट येथील कन्नमवार नगर २, दाजी वाडा येथे आयोजन करण्यात आले होते.या वेळी या शिबिरात गर्भाशयाच्या मुखाची तपासणी, स्तन तपासणी, व रक्तदाब तपासणी मधुमेह अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. यावेळी महिला व […]Read More

राजकीय

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांचे वर्तन पक्षपाती – खासदार . वर्षा

नवी दिल्ली, 5 लोकसभेतील कामकाज बंद पाडण्यात सत्ताधारी पक्षच आघाडीवर आहे. विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, त्यांचे माईक बंद केले जातात. सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम आणि विरोधकांसाठी वेगळे नियम आहेत असे चित्र आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सातत्याने बोलण्यापासून रोखत होते, त्यांचा माईक बंद करत होते. पण भाजपा खासदार […]Read More

महानगर

8 फेब्रुवारी पासून राणीबागेत पुष्पोत्सव

मुंबई,5बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी ते रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत ‘मुंबई पुष्पोत्सव’ भरविण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (उद्याने) श्री. अजितकुमार […]Read More

आरोग्य

व्यावसायिक वाहन चालकांसाठी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

पुणे, 5 : वाहनचालकांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एएसजी आय हॉस्पिटल, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर तसेच कोकणे चौक, पिंपळे सौदागर (पिंपरी चिंचवड) येथे चालक दृष्टी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम २० जानेवारी पासून सुरु झाली असून ११ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.या विशेष उपक्रमांतर्गत सर्व व्यावसायिक वाहनचालकांसाठी (ऑटो, ट्रक, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

‘व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2026’ची घोषणा

पुणे, 5 : भारतातील पहिली डॉक्टर-सेलिब्रिटी टी-20 लेदर बॉल क्रिकेट लीग असलेल्या व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग (WCCL) 2026 ची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. “जिथे आरोग्यसेवा, क्रिकेट आणि ग्लॅमर एकत्र येतात” या संकल्पनेवर आधारित ही अनोखी लीग डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सन्मान देतानाच दर्जेदार क्रिकेट मनोरंजन देणार आहे अशी माहिती या लीगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सचिन […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

एमईएस एम्प्लॉईज को – ऑप. क्रेडिट सोसायटी १०० वर्षे सेवा

पुणे, 5स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये १९२४ मध्ये मिलिटरी इंजीनियरिंग सर्व्हिस (एमईएस) या केंद्र सरकारच्या संस्थेची स्थापना झाली. या नंतर दोन वर्षांनी १९२६ मध्ये एमईएस एम्प्लॉईज को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची स्थापना झाली. एमईएसच्या निवडक कामगारांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही संस्था सुमारे १० हजार पेक्षा जास्त सभासदांना एकत्र करून सलग १०० वर्षे सुलभ पद्धतीने […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गोणवडी या भागामध्ये बिबट्याचा वावर

पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरा जवळील गोणवडी या भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांकडून अनेकदा वन विभागाला तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने उसाच्या शेताजवळ वनविभागाने पिंजरा लावला व काल रात्री त्या पिंजऱ्यामध्ये अचानक एक बिबट्या येऊन अडकला त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.AG/ML/MSRead More

राजकीय

एक्सप्रेस मार्गावर टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का

मुंबई दि ५ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार,प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली […]Read More