Month: November 2025

आरोग्य

अवयव प्रत्यारोपणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करा – SC चे आदेश

नवी दिल्ली, दि. २० : सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (मुख्य न्यायमूर्ती भुषण आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन) महत्त्वपूर्ण आदेश दिला. इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला देशभरात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत राष्ट्रीय धोरण व एकसमान नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. या धोरणामुळे सर्व नागरिकांना समान संधी […]Read More

देश विदेश

“काश्मीर टाईम्स’च्या कार्यालयावर छापा, शस्त्रास्त्र साठा जप्त

जम्मू, दि. २० : जम्मूमधील ‘काश्मीर टाईम्स’ या वृत्तपत्राच्या कार्यालयावर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (SIA) ने आज छापा टाकला. या कारवाईत AK रायफलचे काडतूसे, पिस्तुलाच्या गोळ्या आणि ग्रेनेडचे लीव्हर जप्त करण्यात आले. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. SIA ने या वृत्तपत्राविरुद्ध एफआयआर नोंदवला असून आरोप आहे की या माध्यमातून देशविरोधी […]Read More

महानगर

लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने वाद, मराठी विद्यार्थ्याने संपवलं जीवन

ठाणे, दि. २० : मुंबई-शहर आणि उपनगरात गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी मराठी-अमराठी वादाचे अनेक प्रसंग घडून येत आहेत. आज झालेल्या अशाच एका वादावादीत एका मराठी तरुणाने लोकल ट्रेनमध्ये हिंदीमध्ये बोलल्यामुळे मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीमुळे निराश होऊन आत्महत्त्या केली आहे. कल्याण पूर्व तिसगाव नाका येथे राहणारा अर्णव खैरे मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिकत होता. १८ […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यपाल-राष्ट्रपतींना वेळमर्यादा नाही- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. २०: देशातील विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय देण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यावर वेळमर्यादा लागू होत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले, की न्यायालय राष्ट्रपती किंवा राज्यपालांना वेळमर्यादा देऊ शकत नाही. परंतु, विधेयक अनिश्चित काळासाठी […]Read More

ट्रेण्डिंग

कुत्रा चावून मृत्यू झाल्यास कुटुंबाला 5 लाख भरपाई , जखमींना

बंगळुरु, दि. २० : सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात देशभरातील सार्वजनिक ठिकाणांवर भटक्या कुत्र्यांची उपस्थिती पूर्णतः हटवण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडा संकुल, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरतो.  या आदेशानंतर आता राज्य सरकारांनी विशेष कारवाई सुरु केली आहे. देशभरात […]Read More

ट्रेण्डिंग

१० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवरही लागणार फिटनेस टेस्ट शुल्क

नवी दिल्ली, दि. २० : केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, आता १० वर्षांहून अधिक काळापासून वापरात असलेली वाहने जास्तीची फी भरतील तर २० वर्षांपेक्षा जुन्या कमर्शियल वाहनांसाठी ही फी तब्बल दहापट वाढवण्यात आली आहे. या बदलामुळे जुनी वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. केंद्र सरकारने जुनी आणि सुरक्षित नसलेली वाहने रस्त्यावरून हटवण्यासाठी मोठा निर्णय घेतला […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

हाजी मस्तान मिर्झा यांनी स्थापन केलेला भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ

पुणे, दि, २०: आगामी पुणे महानगर पालिका निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून, सामान्य मतदारांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रस्थापित राजकीय पक्ष दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघाने केला आहे. सर्वसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीवासीय तसेच अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ पुणे महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तौसिफ अब्बास शेख यांनी पत्रकार परिषदेत […]Read More

महानगर

‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर 151 कोटी झाडे लावणार

मुंबई, दि, २०: राजकोटस्थित जगातील सर्वात मोठे विनामूल्य वृध्दाश्रम – सद्भावना वृध्दाश्रम – ज्येष्ठ, गरीब आणि आजारी व्यक्तींसाठी सेवा देत आहे. पर्यावरण संवर्धन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना अधिक बळकटी देण्यासाठी संस्थेने संपूर्ण भारतभर १५१ कोटी झाडे लावण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची ऐतिहासिक घोषणा सद्भावना वृद्धाश्रमचे विजय दोबारिया यांनी आज मुंबई मराठी पत्रकार […]Read More

पर्यावरण

बिबट्या ‘नरभक्षक’ नाही, तर नव्या युगाचा ‘सहोदर’?

बिबट्यांची पुढली पिढी मानवी वावराला सरावलेली; मानव-प्राणी संबंधांचा राजस्थानातील आदर्श विक्रांत पाटील भीती आणि वास्तवाच्या पलीकडेरात्रीच्या अंधारात घरामागे होणारी किर्रर्र… आणि दुसऱ्या दिवशी आढळणारे कुत्र्याचे अवशेष. महाराष्ट्रातील शहरांच्या वेशीवर बिबट्याचे अस्तित्व आता केवळ बातमी नाही, तर अनेकांसाठी ती एक जिवंत भीती बनली आहे. बिबट्या म्हणजे ‘नरभक्षक’, एक धोकादायक प्राणी, ही आपली सामान्य समजूत. पण या […]Read More

कोकण

ताम्हिणी घाटातील गाडीचा अपघात, ४८ तासांनंतर माहित कळली.

अलिबाग दि २० –रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पुणे माणगांव मार्गावर ताम्हिणी घाटात मोठा अपघात घडला आहे. कोकण आणि पुण्याला जोडणारा ताम्हिणी घाटदेखील अपघातप्रवण बनला आहे. गेल्या आठवड्यात एक सनरूफ कारवर दगड कोसळण्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर आता एक भीषण अपघात झाला असून यात चौघांचे मृतदेह सापडले आहेत तर दोघांचा शोध सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे […]Read More