Month: October 2025

महानगर

नवरात्रोत्सवात दिला आईने कौल

मुंबई दि. १ : आई चिंचबादेवी मंदिर , घोडबंदर, जिल्हा ठाणे बाबत महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात , वनविभाग संबंधित अधिकारी वर्ग, श्री ग्रामदैवत ट्रस्ट, यांचे समवेत मंदिराच्या जमिनीच्या अदलाबदलबाबत सकारात्मक सभा संपन्न झाली. जागा अदलाबदली हे शासन नियमात बसते यामुळे या निकषावर पुढे अधिकारी वर्गाला सहकार्य करण्याचे आदेश […]Read More

महानगर

बन्सी घेवडे : आदिवासींचा खराखुरा मित्र व पाठीराखा !

मुंबई दि १ : आदिवासींचे खरेखुरे मित्र बन्सी घेवडे यांचे 29 सप्टेंबर, 2025 रोजी रात्री 8.30 वाजतां हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे वय केवळ 58 वर्षांचे होते. बन्सी घेवडे हे कर्जत येथे राहत होते. सामाजिक कार्यात त्यांना विशेष स्वारस्य असल्याने सुरुवातीपासून त्यांच्या पत्नी जिजाताई रेरे यांच्या सोबत आदिवासी कातकरी यांच्या उत्थानासाठी स्वतःला झोकून दिले […]Read More

ऍग्रो

पावसाने उसंत दिल्याने सोयाबीन सोंगणीला वेग…

वाशीम दि १ : गत दोन दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणीला वेग आणला आहे. शेतकरी हातमजुरीसोबतच क्रशरच्या साहाय्यानेही काढणीचे काम करत आहेत. सोबतच मजुरांची उणीव लक्षात घेता अनेक शेत मालकांनी शेजारच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातील मजूर खाजगी कंत्राटदारामार्फत वाशीम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरासरी […]Read More

मराठवाडा

आरक्षणासाठी धनगर बांधवांनी शेळ्या मेंढ्यासह केले रास्ता रोको…

जालना दि १ : एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात धनगर समाज आक्रमक झाला होता, त्यांनी शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. शेळ्या मेंढ्या रस्त्यावर उतरवून त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात करण्यात जोरदार घोषणाबाजी आली. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करत […]Read More

खान्देश

धुळ्यातील रोहिणी ग्राम पंचायत ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्काराने सन्मानित

विशाखापट्टणम, दि. १ : पूर्णपणे कागदविरहित ई-कार्यालय प्रणाली स्वीकारणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्राम पंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम इथे झालेल्या 28 व्या ई गव्हर्नन्स राष्ट्रीय चर्चासत्रात पंतप्रधान कार्यालय तसेच कार्मिक, नागरी तक्रार निवारण व निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर रोजी पुण्यात

पुणे, दि १ : लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 D2 तर्फे लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल शेराटन येथे आयोजित करण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात प्रसिद्ध सिनेतारका संगीता बिजलानी तसेच अन्य मान्यवर अतिथी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० व्यक्तींना सन्मानित करणार आहेत. सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शिक्षण, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोरियन प्रगती अभ्यासण्याची विद्यार्थ्यांना संधी – यू डोंगवान

पुणे, दि १- दक्षिण कोरियाने शैक्षणिक, तांत्रिक, औद्योगिक प्रगती केली आहे. कोस्मे – पीसीयू यांच्या मध्ये झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना हे ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी पीसीयू व दक्षिण कोरिया यांच्यातील विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमांना चालना दिली जाईल. कोरियन भाषा शिक्षण सुरू करण्यासाठी सहाय्य करून दक्षिण कोरियातील विद्यापीठांशी थेट संवाद साधण्यासाठी आवश्यक सहकार्य […]Read More

विदर्भ

दीक्षाभूमी येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

नागपूर दि १ : 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य 2 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार असून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेला स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, विश्वस्त विलास गजघाटे […]Read More

राजकीय

पूरग्रस्त शेतक-यांसाठी दुष्काळाच्या निकषाप्रमाणे प्रमाणे मदत करणार

मुंबई,दि. १ : मे,जुन,जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतक-यांना आतापर्यंत २२५० कोटी रुपयांची अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी मदत करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पूरग्रस्त शेतक-यांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सवलती सर्व लागू केल्या जाणार आहेत. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक […]Read More

राजकीय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन

मुंबई दि १: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात हातभार म्हणून कृषी विभागाचे राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच त्यांनी स्वतःचे एक महिन्याचे वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीस […]Read More