Month: October 2025

राजकीय

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार…

पालघर दि १४ : वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिर आज उत्साहात संपन्न झाले. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी […]Read More

महानगर

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास मिळणार 6 लाखांची मदत

मुंबई, दि. १४ : राज्यात अनेक रस्त्यावरील खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे आजवर हजारो नागरीकांचा मृत्यू होते. मात्र या समस्येवर सर्वांगिण उपाययोजना करण्यात येत नाही. या रस्त्यावरील खड्ड्यांवरुन हायकोर्टानं प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. खड्डे आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून एखाद्याचा जीव गेल्यास आता मृताच्या वारसांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे..तसंच जखमींना दुखापतीच्या स्वरुपानुसार […]Read More

देश विदेश

सणवार आणि लग्नसराईमुळे देशात होणार ७ हजार कोटींची उलाढाल

जयपूर, १४ : भारतात सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात आणि आगामी लग्नसराईमुळे देशभरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह आणि खरेदीचा जोर दिसून येत आहे. भारतीय उद्योग व्यापारी मंडळ (BUVM) या राष्ट्रीय व्यापारी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या सणासुदीच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये मिळून एकूण ₹७.५८ लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. BUVM चे राष्ट्रीय अध्यक्ष बाबूलाल गुप्ता यांनी सांगितले […]Read More

ट्रेण्डिंग

‘मनाचे श्लोक’ आता नव्या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. १४ : ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या नावामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट आता नव्या नावाने, संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने हिरवा कंदील दाखवूनही काही संघटनांनी प्रदर्शनात अडथळे आणल्याने निर्मात्यांनी अखेर एक मोठा निर्णय घेतला आहे. मनाचे श्लोक या चित्रपटाचे […]Read More

विदर्भ

“विश्व स्नेहाचा संदेश – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताह गडचिरोलीत

गडचिरोली, दि १४“विश्व स्नेहाचा ध्यान धरा, सर्वांचा सन्मान करा!” या सार्वभौम मानवतेच्या संदेशाचा गजर करत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताह व सर्वसंत स्मृती मानवता दिन सप्ताह कार्यक्रमाचा समारोप अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मुख्य शाखा – गडचिरोली येथे झाला. या पवित्र प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी […]Read More

विदर्भ

सरन्यायाधीशांच्या हल्ल्याविरोधात आम आदमी पार्टी नागपूर तर्फे मुक आंदोलन

नागपूर, दि १४सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी, नागपूर तर्फे आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) रोजी संविधान चौक, नागपूर येथे मूक आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व श्री भूषण ढाकुळकर (प्रदेश संघटन सचिव), डॉ. शहीद अली जाफरी (प्रदेश सचिव), डॉ. अमेय ई. नारनवरे (शहर महासचिव), श्री रोशन […]Read More

राजकीय

बौद्ध, आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात जनआंदोलन

मुंबई, दि १४केल्याशिवाय ऐक्याचा प्रहार मुक्त होणार नाही महाबोधी महाविहार अशी काव्यमय सुरुवात करून आंबेडकरी बौद्ध जनतेने सामाजिक धार्मिक राजकीय राज्य करणे आवश्यक आहे. माझ्या निमंत्रणाला मान देऊन सर्व पक्षीय बौद्ध नेते मोर्चास उपस्थित राहिले.प्रा.जोगेंद्र कवाडे यांना आणि मला ही वाटते की रिपब्लिकन ऐक्य व्हावे .काही लोकांना वाटते की ऐक्य होऊ नये.प्रकाश आंबेडकर यांनीही समाजाच्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील मौजे कवलापूर नागरी विमानतळ येत्या दोन वर्षात

मुंबई, दि.१४ : सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ६६.३६ हेक्टर क्षेत्रा व्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून व्हिजिबल सर्वे करण्यात येईल. तसेच याठिकाणी येत्या दोन वर्षात विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली […]Read More

कोकण

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई दि १४ : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळवून देऊ , असा विश्वास खेडेकर यांनी यावेळी बोलून दाखविला. या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सह […]Read More

महानगर

विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत नाही

मुंबई, दि. १४ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे केले. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात […]Read More