Month: October 2025

खान्देश

छगन भुजबळ यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभीष्टचिंतन

नाशिक,दि.१५ :- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ज्ञानोत्सवास राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी उपस्थिती लावत मंत्री छगन भुजबळ यांचे अभीष्टचिंतन केले. या ज्ञानाच्या भेटीच्या उत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, हितचिंतकांकडून हजारोंच्या संख्येने पुस्तके भेट स्वरूपात मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात […]Read More

राजकीय

युवकांच्या सहभागाने लवकरच राज्याचे सर्वंकष युवा धोरण

मुंबई दि १५ : सर्वसमावेशक व सुधारित युवा धोरणाची गरज १३ ते ३५ वयोगटातील युवकांना जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले विचार, मते आणि सूचना देण्याचे आवाहन, क्रीडा व […]Read More

महानगर

वाचन जीवनाच्या वाटा सुखकर करतात! वाचन-प्रेरणादिनी वाहतूक पोलीस निरीक्षक सरदार

मुंबई, दि १५: मुलाला शाळेत पाठवले नाही तर पालकांना दंड ठोठावणारे महाराष्ट्रातील पहिलेच राजे छत्रपती शाहू महाराज होय.हेच शिक्षणाचे महत्व जाणून मी प्रगती साध्य करीत गेल्याने,पोलीस क्षेत्रात महत्वाच्या पदावर काम करण्याची मला संधी लाभली आहे,अशा शब्दात वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार नाळे यांनी येथे वाचन-प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रतिपादन केले.संघटनेचे अध्यक्ष […]Read More

राजकीय

अवैध लॉज व्यवसायावर कारवाईचा बडगा, रोहिंग्या व बांग्लादेशी पकडण्यासाठी शोध

मुंबई दि १५ : बांधकाम, वाहतूक, फेरीवाले, कचरा आणि सांडपाणी अशा रोजच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना आज थेट आपल्या तक्रारी मांडण्याची संधी मिळाली. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव येथील प. दक्षिण विभाग कार्यालयात जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात आमदार विद्या ठाकूर उपस्थित होत्या. तब्बल २०० हून अधिक तक्रारी नागरिकांनी […]Read More

महानगर

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई, दि १५महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आझाद मैदानात विविध मागण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यामध्ये प्रोत्साहन भत्ता रुपये २००० व १००० विना अट मानधनात वर्ग करावे. FRS मधील सर्व अडचणी सोडवा.तसेच त्याची सक्ती करु नका. FRS च्या नावाखाली लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवू नका. मातृवंदना आदी योजनाबाह्य कामांची सक्ती करु नका.पोषण […]Read More

राजकीय

मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा,मगच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या

मुंबई, दि.१५ :- २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर निवडणुका पारदर्शक होणार नाही. त्यामुळे सदोष मतदार याद्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाला […]Read More

राजकीय

कृषी विभागाचा दूरदर्शी निर्णय; शेतकऱ्यांच्या विदेश दौऱ्याला मिळणार दुप्पट मदत

मुंबई दि १५ : “जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले जाते. २०१२ नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेता, विद्यमान १ लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नव्हती. त्यामुळे अनुदान मर्यादा दुप्पट करून २ लाख रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. […]Read More

राजकीय

शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी

मुंबई, दि. १५ : राज्यातील सेंद्रीय प्रमाणित व नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. केंद्र शासन प्रमाणित संस्थाकडून राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार असून या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास अशा संस्थांचा अहवाल केंद्र शासनाला पाठवणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालय येथे सेंद्रिय […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

मौजा- मुरखळा माल ता.चामोर्शीत “कलियुगाचा कंस मामा” या दंडारीचा भव्य

चामोर्शी, दि १५:खास लोक आग्रस्तव मौजा मुरखळा माल (ता. चामोर्शी) यांच्या सौजन्याने आदिवासी महिला दंडार मंडळ वनग्राम वाकडी यांच्या वतीने आयोजित भव्य दंडारी प्रयोगाचा आज उत्साहपूर्ण माहोलात शुभारंभ संपन्न झाला. या दंडारीचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.या दंडारीचे शीर्षक होते — […]Read More

महानगर

लॉ कॉलेज नाटक महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि १५रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पियर, रोटारॅक्ट क्लब ऑफ बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉच्या सहकार्याने एचएसएनसी युनिव्हर्सिटीच्या डी.एम. येथे लॉ कॉलेजेस ’नाटक महोत्सव 2025’ चे आयोजन हरीश स्कूल ऑफ लॉ, वरळी, मुंबई येथे नुकतेच करण्यात आले. बॅरिस्टर शौकत सी. चागला यांच्या स्मृतीत त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कायदेशीर बंधुत्वासाठी त्यांचे उल्लेखनीय […]Read More