मुंबई, DI १ : केंद्र सरकारने आधिच फोर कोड बिल संमत करून कामगार चळवळीचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे.राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक मंजूर करतानाच, कामाचे १२ तास वाढविण्याचा जुलमी निर्णय घेऊन कामगार वर्गाचे खच्च्चीकरण केले आहे आणि एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तर सरकारने पूर्णपणे डोळे झाक केली आहे, तेव्हा सरकारच्या या कामगार विरोधी धोरणावर आता मंत्री […]Read More
मुंबई, दि. १ : राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध […]Read More
मुंबई, दि १:- बारामतीसह यवतमाळ, धाराशिव व लातूर विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बारामती विमानतळाचा नाईट लँडिंगसह विकास करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे […]Read More
मुंबई, दि १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून, एकाचदिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील […]Read More
मुंबई, दि. १ : मंत्रालयात विविध खात्यात नियुक्त करण्यात आलेले सल्लागार आयटी विभागाकडून एम्पॅनेल्ड करण्यात आले असले तरी त्याची पुढची कुठलीही माहिती महा आयटीकडे पुढे देण्यात येत नाही. त्यामुळे कोणती एजन्सी, अथवा व्यक्ती नियुक्ती करण्यात आली, त्यांना किती मानधन अथवा मेहनताना दिला जातो याची कुठलीही माहिती आंयटी विभागाला देण्यात येत नाही, त्यामुळे यापुढे मंत्रालयात नियुक्त […]Read More
मुंबई, दि. १ : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले. उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून […]Read More
नवी दिल्ली, दि.१:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलत विशेष नाणे आणि टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे. दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित शताब्दी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे नाणे आणि तिकीट जारी करण्यात आले. या कार्यक्रमात संघाच्या देशसेवेतील योगदानाची दखल घेतली गेली आणि संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा […]Read More
मुंबई दि. १ : आई चिंचबादेवी मंदिर , घोडबंदर, जिल्हा ठाणे बाबत महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात , वनविभाग संबंधित अधिकारी वर्ग, श्री ग्रामदैवत ट्रस्ट, यांचे समवेत मंदिराच्या जमिनीच्या अदलाबदलबाबत सकारात्मक सभा संपन्न झाली. जागा अदलाबदली हे शासन नियमात बसते यामुळे या निकषावर पुढे अधिकारी वर्गाला सहकार्य करण्याचे आदेश […]Read More
मुंबई दि १ : आदिवासींचे खरेखुरे मित्र बन्सी घेवडे यांचे 29 सप्टेंबर, 2025 रोजी रात्री 8.30 वाजतां हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे वय केवळ 58 वर्षांचे होते. बन्सी घेवडे हे कर्जत येथे राहत होते. सामाजिक कार्यात त्यांना विशेष स्वारस्य असल्याने सुरुवातीपासून त्यांच्या पत्नी जिजाताई रेरे यांच्या सोबत आदिवासी कातकरी यांच्या उत्थानासाठी स्वतःला झोकून दिले […]Read More
वाशीम दि १ : गत दोन दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणीला वेग आणला आहे. शेतकरी हातमजुरीसोबतच क्रशरच्या साहाय्यानेही काढणीचे काम करत आहेत. सोबतच मजुरांची उणीव लक्षात घेता अनेक शेत मालकांनी शेजारच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातील मजूर खाजगी कंत्राटदारामार्फत वाशीम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरासरी […]Read More