Month: October 2025

करिअर

अंतर योग गुरुकुलाने केला महिलां दुर्गांचा गौरव

मुंबई, दि ३: नवरात्रीच्या अष्टमी निमित्त सीएसटी येथील अंतर योग फाउंडेशन गुरुकुलाने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा दुर्गा स्वरूप मानून शास्त्रोक्त पूजनाने सन्मान करण्यात आला. त्याच दिवशी कुमारिका पूजन आणि भैरव पूजन देखील विधिवत पार पडले, ज्यात बालक आणि उपस्थित साधकांनी देवीच्या विविध रूपांचे पूजन केले. महिला शक्तीचा गौरवअंतर योगच्या अनोख्या पद्धतीनुसार, […]Read More

महानगर

“बी.एस.यु.पी. योजनेतील घरे – पात्र लाभार्थ्यांच्या हाती लवकरच घरकुलांची चावी”

मीरा-भाईंदर दि ३ :मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या जनतानगर झोपडपट्टीतील बी.एस.यु.पी. (Basic Services for Urban Poor) योजनेतील घरे पात्र लाभार्थ्यांना लवकरच मिळणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. त्याची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी तत्काळ पावले उचलली आहेत. मंत्री सरनाईक यांनी महानगरपालिका आणि गृहनिर्माण विभागाला स्पष्ट निर्देश दिले […]Read More

ऍग्रो

राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

मुंबई, दि. ०३: राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

नाट्य क्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार नीना कुलकर्णी यांना जाहीर

सांगली दि ३ : नाट्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनी या पुरस्काराचा वितरण होणार आहे. मानपत्र, 25 हजार रुपये रोख रक्कम शाल श्रीफळ आणि गौरव पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींना गेल्या […]Read More

राजकीय

समाजवादी चळवळीचा वटवृक्ष : डॉ जी जी पारिख!

१९७८ साल ! महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. तत्पूर्वी १९७७ साली भारतीय राजकारणातील अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या सरकारला उलथवून लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले होते. इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ ला आणिबाणी लादून भल्या भल्यांना तुरुंगात डांबले होते. इतकेच काय तर कॉंग्रेस मधल्या तरुण तुर्क […]Read More

देश विदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष मेळाव्यात स्वदेशीचा नारा

नागपूर, दि. २ : येथील रेशीमबाग मैदानावर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षाचा विजयादशमी मेळावा अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरला. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन […]Read More

देश विदेश

पाच वर्षांनंतर सुरु होणार भारत-चीन थेट विमान सेवा

नवी दिल्ली: (२ ऑक्टोबर) पूर्व लडाखमधील सीमावादामुळे तणावग्रस्त झालेले संबंध पुन्हा निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाच वर्षांच्या अंतरानंतर, भारत आणि चीन या महिन्याच्या अखेरीस थेट विमानसेवा पुन्हा सुरू करतील. चीनच्या तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाल्यानंतर एक महिन्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने […]Read More

अर्थ

रात्रभर सुरू ठेवता येणार मॉल, रेस्टाॅरंट, चित्रपटगृहे

मुंबई, दि. 2 : राज्य सरकारने राज्यभरातील मॉल्स, दुकाने, चित्रपटगृह २४x७ उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. सणासुदीला दुकाने २४ तास सुरू राहणार असल्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढणार असून ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. मद्य विक्री व मद्य दिली जाणारी आस्थापने वगळता अन्य व्यावसायिक आस्थापनांना स्थानिक प्रशासनाने लावलेल्या अटींशिवाय २४x७ सुरू ठेवता येणार आहेत. याबाबत बुधवारी राज्य […]Read More

ट्रेण्डिंग

धरणांजवळील जमीन भाड्याने देण्याची सरकारची योजना

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्रातील प्रमुख 20 धरणांजवळील मोक्याची जमीन आता पर्यटन आणि महसूल निर्मितीसाठी खुली होणार आहे. राज्य सरकारने जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील या जमिनींचे मुद्रीकरण करण्यासाठी धोरण अंतिम केले असून, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच निविदाप्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळून राज्याला प्रतिवर्षी सुमारे 500 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता […]Read More

सांस्कृतिक

गिरगावात दसऱ्याला झाले सरस्वतीचे आगमन

मुंबई, दि २गिरगावातल्या एसव्हीपी रोड मार्गावर जुन्या नव्या अमृतवाडीतील रहिवाशांना एकत्र आणण्यासाठी अमृतवाडीच्या मोकळ्या पटांगणात शारदीय नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर १०० वर्षांपूर्वी ज्ञान आणि बुद्धीची देवता सरस्वती मातेची मोठ्या भक्ती भावाने स्थापना करण्यात आली होती. ह्यामागे सर्व जाती-धर्मातील रहिवाशांना एकत्र आणण्याचा एका शिक्षकाचा मनसुबा होता. आज या उत्सवाला शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ […]Read More