मुंबई, दि. ३- माजी खासदार, आमदार व समाजसेवक स्व.दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील व भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. स्व.दि.बा.पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्यात येणार असून दिल्लीला तसा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे खा. […]Read More
सिंधुदुर्ग दि ३ : जिल्ह्यातील शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहे. यातील ३ पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व […]Read More
मुंबई, दि. ३ : उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे, ‘विकृत मानसिकतेचे प्रदर्शन’, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुंबईत पत्रकारांना त्यांनी सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत पराभव आणि येणाऱ्या निवडणुकीत विजयाची चिन्हे नसल्याने ठाकरे यांची मानसिकता विकृतीकडे गेली आहे. ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह भाजपासह महायुतीची घौडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत आत्मविश्वासाने काम करायला […]Read More
मुंबई, दि. ३ : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देश यांचा विचार करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे. […]Read More
मुंबई, दि. ३ : RBIने चेक क्लिअरन्सची प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि पेमेंट सुरक्षा वाढवण्यासाठी अद्ययावत केलेली सेटलमेंट फ्रेमवर्क लागू केली आहे. त्यानुसार 4 ऑक्टोबरपासून बँका त्याच दिवशी चेक क्लिअर करतील. सध्या चेक ट्रंकेशन सिस्टीम (CTS) द्वारे चेक क्लिअरन्स बॅच-प्रोसेसिंग पद्धतीने चालतो. बँकांनी जाहीर केले आहे की- 4 ऑक्टोबरपासून जमा केलेले चेक त्याच कामाच्या दिवशी काही […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली अँगमो यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची विनंती केली आहे. लडाखमधील जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या आदिवासी पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्यांनी वांगचूक यांच्या विनाशर्त सुटकेची मागणी केली आहे. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने देशभरात ५७ नवीन केंद्रीय विद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये ७ शाळा गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असतील, तर उर्वरित ५० शाळांचे संचालन संबंधित राज्य सरकारांकडे सोपवले जाईल. या शाळांपैकी २० शाळा अशा जिल्ह्यांमध्ये उभारल्या जातील जिथे अद्याप केंद्रीय विद्यालय अस्तित्वात नाही, पण केंद्र सरकारचे कर्मचारी मोठ्या […]Read More
मुंबई, दि ३शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार यांनी उपमुख्यमंत्री,शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मराठवाड्यातील पूरग्रस्तांना जेवढी होईल तेवढी मदत करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार पाच लाखाचा धनादेश शिवसेना सहायता निधीला सुपूर्द केला. मी एक शोधा शेतकरी आहे शेतकऱ्यांचे दुःख मी समजू शकतो. मराठवाडा येथे आलेला पूर हा फार भयानक असून फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे. […]Read More
मुंबई, दि. ३ : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावे, वीज बिलाची थकबाकी माफ करावी आणि खरवडून गेलेल्या शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी, […]Read More
मुंबई दि ३: उपमुख्यमंत्र्यां विरोधात गलिच्छ भाषेत आक्षेपार्य पोस्ट करणारे विरोधात आज दक्षिण मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या तमाम कार्यकर्त्यांनी मिळून ताडदेव येथील पोलीस ठाणे वरिष्ठ पोलिसांना अर्जाद्वारे तक्रार केली ह्या प्रसंगी शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. ताडदेव येथील एका व्यक्तीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या बरोबर व्हिडिओच्या […]Read More