मुंबई दि २६ : एसटी महामंडळाकडे राज्यभरात सध्या ८५० ठिकाणी मिळून एकूण १३ हजार एकर इतकी ” लँड बँक ” उपलब्ध आहे. नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार एसटीच्या जागेचा सार्वजनिक -खाजगी भागिदारीतून (PPP) विकास करण्यासाठी ४९+ ४९ वर्ष अशी एकूण ९८ वर्ष भाडे कराराची मुदत देण्यात आलेली आहे. या संधीचा फायदा घेऊन नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट […]Read More
मुंबई दि २६ : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार ॲप-आधारित वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (MMRTA) यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, गेल्या काही दिवसांत २६३ अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल ₹३.८८ लाख इतका दंड ठोठावण्यात आला आहे.अशी माहिती परिवहन मंत्री […]Read More
मुंबई, दि २६ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांची कन्या समाजसेविका व शिवसेना कोर कमिटी सदस्य राजोल संजय पाटील यांनी आपल्या विभागातल्या विविध नवरात्री मंडळांना भेट दिली व महालक्ष्मीचे दर्शन घेतले. घाटकोपर पूर्व परिसरातील उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहून खूप छान वाटले. देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहो हीच प्रार्थना! असे यावेळी रजोल पाटील म्हणाल्या. […]Read More
सातारा दि २६ : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या व्याघ्र अभिमानाचे दर्शन घडवत वाघांना ‘सेनापती’, ‘सुभेदार’ व ‘बाजी’ अशी लोकप्रिय नावे दिली आहेत. या नावांमुळे स्थानिक लोकांचा वाघांशी असलेला आत्मीय संबंध अधिक दृढ झाला असून, संवर्धनाबरोबरच लोकसहभागाची भावना बळकट झाली आहे. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात’ अधिवास करणाऱ्या वाघांचे नामकरण करण्यात आले आहे. यासाठी छत्रपती […]Read More
चंद्रपूर दि २६ : वाघांचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या जाणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता वाघ बघणे महाग झाले आहे. त्यामुळे आता कागदावर वाघ बघण्याची वेळ पर्यटकांवर येण्याची पाळी ओढवते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात वाघ बघण्यासाठीच्या सफारीचे शुल्क भरमसाठ वाढवण्यात आले आहे. या सफारीसाठी आता प्रत्येक पर्यटकाला एकूण एक […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ : भारताने आज रेल्वे-माउंटेड मोबाईल लाँचर सिस्टमवरून अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टम वापरून हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले, ही एक खास डिझाइन केलेली ट्रेन आहे जी रेल्वे लाईनसह देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचण्यास सक्षम आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली. अग्नि प्राइम क्षेपणास्त्र २००० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता […]Read More
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नवीन बसेस दाखल होणार असल्याने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या ८ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने १७,४५० चालक […]Read More
मुंबई, दि. २५ : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनडीसी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेबसिरीजविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ही सिरिज शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केली आहे. यामध्ये बॉलुवूडमधील अनेक मोठ्या अभिनेत्यांनी भूमिका केल्या आहेत. या वेबसिरीजमध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित कथानक दाखवण्यात आले […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला ब्रिटनच्या ‘ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल’ने (BSC) या विमानतळाला आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण (HSE) क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 5-स्टार मानांकन दिले आहे. विशेष म्हणजे, हे मानांकन मिळवणारे हे 2025 मधील भारत आणि आशियातील एकमेव विमानतळ आहे. या कामगिरीमुळे ते जगातील निवडक उत्कृष्ट विमानतळांच्या यादीत सामील झाले आहे. […]Read More
मुंबई, दि. २५ : भारतातील आघाडीची वाहननिर्मिती कंपनी टाटा मोटर्सवर अलीकडेच झालेल्या सायबर हल्ल्यामुळे कंपनीला सुमारे २१ हजार कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आला असून, कंपनीच्या अंतर्गत डेटाबेस, उत्पादन यंत्रणा आणि आर्थिक व्यवहारांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की, हल्लेखोरांनी […]Read More