Month: September 2025

पश्चिम महाराष्ट्र

दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी दोन किलोमीटर परिसरातून २० ट्रॅक्टर कचरा केला

पुणे, दि २९:  पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पी.आय.बी.एम.), पिरंगुट कॅम्पसद्वारे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष ‘स्वच्छता अभियान’ आणि ‘स्वच्छता महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या राष्ट्रव्यापी आवाहनास अनुसरून, राष्ट्रीय सेवेसाठी आणि स्वच्छतेसाठी वेळ देण्याच्या उद्देशाने हा आठवडाभर चालणारा उपक्रम आयोजित केला गेला आहे; याची […]Read More

ट्रेण्डिंग

जगातील दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात

चंद्रपूर दि २९ :- जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात आढळली. दोन फूट तीन इंच एवढी तिची उंची आहे. त्यामुळे तिची नोंद आता international Book of records मध्ये झाली आहे. राजेश्वरी गुणेदार असे या मुलीचे नाव असून, ती चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात परसोडी येथील रहिवासी आहे. काही युवकांना ती रस्त्याच्या कडेला चालताना दिसली. तिची […]Read More

गॅलरी

यवतमाळ दौर्‍यावर मुख्यमंत्र्यांनी हाकली बैलगाडी

यवतमाळ दि २९ – राज्यातील शेतकऱ्यांची बैलगाडी म्हणजे त्याच्या जीवनाची ओळख आहे. शेतकऱ्यांची मेहनत, धैर्य आणि निष्ठेचा साक्षीदार हा नेहमीच शेतकरी शेतात शेतीचे काम करताना बैलगाडी व बैलाने नेहमीच शेतकऱ्यांची मदत केली आहे. असे वर्णन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या दौऱ्यात बैलगाडी हाकतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहेML/ML/MSRead More

महानगर

सोलापुरच्या बहिणींना खा. संजय दिना पाटील यांची मदत

मुंबई, दि. २९– राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. रविवारी मराठवाड्यात पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीचा फटका शेतक-यांना बसला आहे. पावसाच्या पाण्यात शेतीसह घरदार वाहून गेल्याने शेतक-यांचा संसार उघड्यावर पडला आहे. सोलापूरात दोन बहिणींचे शैक्षणिक साहित्य पावसात वाहून गेल्याने त्यांची पिडा, अश्रु अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी या […]Read More

मराठवाडा

श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा

धाराशिव दि २९ : तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज २९ सप्टेंबर रोजी सोमवारी, आठव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची भवानी तलवार अलंकार महापूजा मोठ्या भक्तिभावाने मांडण्यात आली. सकाळपासूनच मंदिर व परिसरात भाविकांची गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षणासाठी श्री तुळजाभवानी देवींने प्रसन्न होऊन स्वतःच्या हाताने भवानी तलवार दिली.त्या तलवारीच्या आर्शीर्वादाने […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकार

पुणे, दि २९: महाराष्ट्रातील पूरग्रस्त बांधवांसाठी भाजपा, पुणे शहर यांच्या वतीने मदत साहित्य संकलनाचा मोठा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात भाजपा व्यापारी आघाडी, पुणे शहर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले. अनेक देणगीदारांनी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व अन्य साहित्य तसेच रोख स्वरूपात मदत दिली. […]Read More

मराठवाडा

बीड जिल्ह्यातील १७ धरणे भरली; ४८ मंडळात अतिवृष्टी

बीड दि २९ – बीड जिल्ह्यातील १७ -धरणे १०० टक्के भरली असून, २ धरणे ही ९०टक्क्यांच्या आसपास आहे. केवळ माजलगावमधून विसर्ग करण्यात येत आहे. वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे आवश्यक ती मदत पुरविली जात आहे. एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक बीडमध्ये सज्ज असून, ते बचावकार्य करीत आहेत. सुमारे ४८ मंडळात काल अतिवृष्टी […]Read More

कोकण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखान्याचा आधुनिकीकरण सोहोळा उत्साहात

मुंबई, दि. २९ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावात, आंबडवे, ता. मंडणगड , जिल्हा रत्नागिरी येथे ‘वैद्यकीय उपकरणांचा हस्तांतरण सोहळा’ अत्यंत यशस्वीपणे पार पडला.या सोहोळ्यात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व परीक्षेत उत्तीर्ण मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व उपस्थित बंधू-भगिनींच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे आणि सहकार्यामुळे सोहळ्याची शोभा अनेक पटींनी वाढली. उपस्थितांचा विश्वास व […]Read More

ऍग्रो

मुसळधार पावसामुळे जालन्याच्या केळी बागेचे मोठे नुकसान….

जालना दि २९: जालन्याच्या कोरेगाव येथे मुसळधार पावसामुळे केळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे. परतूर तालुक्यासह जालना जिल्ह्यात मागील 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकं आणि फळबागांवर मोठं संकट ओढवलंय. परतूर तालुक्यातील शेतकरी बाजीराव खरात यांनी सुमारे आठ हजार केळीची लागवड केली होती. मात्र, सततच्या पावसामुळे त्यांच्या बागेतील केळी झाडावरच सडत असून […]Read More

महानगर

विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र लेखनाचे प्राणतत्व, ज्येष्ठ

मुंबई, दि २८: मूलभूत, मर्मभेदी, चिंतनशील, चिकित्सक, बुद्धिप्रामाण्यवादी, झुंझार, क्रांतिकारी अशी बाबासाहेबांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती. अस्पृश्यांना नवा उच्चार आणि नवा उदगार बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला. लोकमनाला आवाहन करण्याची क्षमता त्याच्या भाषेत होती.विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रिय लेखनाचे प्राणतत्त्व होय, असे प्रतिपादन राजकीय पत्रकार, लेखक श्रीकांत जाधव यांनी येथे केले. ‘डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत पत्रकारिता’ या […]Read More