Month: September 2025

पश्चिम महाराष्ट्र

शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटनेच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी डॉ.

पिंपरी, दि ११मानिनी फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात महिलांचे संघटन उभारलेल्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांची शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघच्या ‘राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी’ आणि ‘राष्ट्रीय कार्यकारणी समिती सदस्य’पदी निवड करण्यात आली आहे. तसेच महा ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी फेडरेशनच्या ‘कार्यकारी अध्यक्ष’ पदावरही डॉ. भारती चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे, […]Read More

महानगर

मुंबईकरांच्या २५ हजारांहून अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा

मुंबई, दि ११– महानगरपालिका, नगर विकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा प्रमाणपत्र देण्या […]Read More

विदर्भ

वर्धा नदी फुगल्याने इरई धरणाचे तीन दरवाजे पुन्हा उघडले

चंद्रपूर दि ११:- वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपुरातून कोरपनाकडे जाणारा गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाला. मार्ग बंद होण्याची ही सहावी वेळ आहे. पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याने वर्धा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाला. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. चंद्रपुरातील इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटर ने उघडण्यात आल्याने नदी काठावरील […]Read More

सांस्कृतिक

भाईंदर येथे गायन आणि वाद्य जुगलबंदी

ठाणे दि ११– स.न.वि.वि. नाट्यशाला आणिराम सेवा मंडळ भाईंदर आयोजित ” खास प्रशिक्षित आणि हौशी संगीत कलाकार वादक गायकांसाठी…”नांदी गायन , नाट्य संगीत गायन आणि वाद्य जुगलबंदी( तबला, व्हायोलिन, पखवाज ) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एका टीम मध्ये किमान दोन वादक असण्याची अट घालण्यात आली आहे.याशिवाय हिंदी, उर्दू साहीत्यप्रेमींसाठी आणि शालेय शिक्षकांसाठीमुन्शी प्रेमचंद की […]Read More

महाराष्ट्र

महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई —-गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः जोरदार बॅटींग केल्यानंतर आता वरुणराजा थोडासा विश्रांती घेताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागांत हवामान बदलले असून उन्हाची चाहूल लागली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर राज्यभरात कमी होताना दिसणार आहे. सततच्या पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांनाही यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य भारतात […]Read More

ट्रेण्डिंग

ठाणे जिल्हातील ११२ पर्यटक नेपाळच्या दंगलीत अडकले ..

ठाणे दि १०:– नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर बंदी आणली आणि त्याविरोधात हजारो युवकांनी जोरदार आंदोलन केलं. काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनला हिंसक वळण लागलं नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर झाली असून ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यातील ११२ पर्यटक नेपाळमध्ये सुरु असलेल्या दंगलीत अडकून पडल्याची माहिती मुरबाडचे आमदार किशन कथोरे यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील […]Read More

ट्रेण्डिंग

स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून न्यायालयाकडून सरकारची कानउघाडणी

मुंबई, दि. १० : नागरिकांकडून स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून लाखो रुपये वसूल करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. तुम्ही नागरिकांवर अन्याय करुन त्यांच्या पैशांवर स्वतःची तिजोरी भरू शकत नाही. जनतेच्या पैशांवर स्वतःला समद्ध करू नका, अशा शब्दांत न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी राज्य सरकारची कानउघाडणी करताना एका कंपनीला अयशस्वी मालमत्ता व्यवहारासाठी ६० लाख रुपये स्टॅम्प […]Read More

ट्रेण्डिंग

मालेगाव बॉम्बस्फोट निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई, दि. 10 : मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य पाच आरोपींची निर्दोष सुटका केली होती. मात्र, या निर्णयाला आता बॉम्बस्फोटात बळी पडलेल्या पीडितांच्या […]Read More

देश विदेश

नेपाळनंतर आता फ्रान्समध्ये देखील सरकार विरोधात निदर्शने

पॅरिस, दि. 10 : नेपाळमध्ये सरकारविरोधात झालेल्या आंदोलनानंतर आता फ्रान्समध्येही जनतेचा रोष उफाळून आला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या धोरणांविरोधात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, देशभरात असंतोषाची भावना तीव्र झाली आहे. पॅरिससह अनेक शहरांमध्ये निदर्शकांनी जाळपोळ, दगडफेक आणि वाहतूक अडथळे निर्माण केले आहेत. ‘ब्लॉक एव्हरीथिंग’ या ऑनलाइन मोहिमेच्या माध्यमातून आंदोलनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर […]Read More

राजकीय

हैदराबाद गॅझेट जीआरबाबत सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल

मुंबई, दि. १० : मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानंतर कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. या निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील ऐतिहासिक नोंदींचा आधार घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, या निर्णयाला काही संघटनांनी आणि व्यक्तींनी न्यायालयात आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर बीड […]Read More