Month: September 2025

बिझनेस

मारुतीची नवीन कॉम्पॅक्ट SUV Victoris लाँच

मारुती सुझुकीने आपल्या SUV पोर्टफोलिओमध्ये एक महत्त्वपूर्ण भर घालत नवीन कॉम्पॅक्ट SUV Victoris भारतात लाँच केली आहे. २२ सप्टेंबर २०२५ पासून विक्रीसाठी उपलब्ध होणारी ही गाडी ₹१०.४९ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. Victoris ही गाडी Arena डीलरशिप्सद्वारे विकली जाणार असून ती Brezza आणि Grand Vitara यांच्यामधील स्थान घेणार आहे. Victoris ला भारत NCAP आणि ग्लोबल […]Read More

देश विदेश

स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप- आनंद कुमारने जिंकले सुवर्णपदक

भारताच्या आनंद कुमार वेलकुमारने स्केटिंगमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २२ वर्षीय आनंद कुमारने सुवर्णपदक जिंकले. स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तो पुरुषांच्या वरिष्ठ १००० मीटर स्प्रिंट स्पर्धेत प्रथम आला. आनंदकुमारने १ मिनिट २४.९२४ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले आणि भारताचा पहिला विश्वविजेता स्केटर बनला. […]Read More

राजकीय

शेतकऱ्यांच्या मुलांची पिळवणूक करणाऱ्या कला केंद्राचे परवाने होणार रद्द

धाराशिव, दि. १६ : सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका युवकाने नर्तिकेच्या वेडापायी आणि तणावात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गत आठवड्यात घडला होता. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. तसेच, सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली अवैध धंदे आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या कला केंद्रांवर कारवाई करा, ते […]Read More

ट्रेण्डिंग

तुळजाभवानी नवरात्रोत्सवही आता राज्याचा प्रमुख महोत्सव

मुंबई, दि. १६ : कोल्हापुरातील शाही दसर्‍यानंतर आता तुळजापुरातील तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवाचा महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार त्याठिकाणी येत्या नवरात्रौत्सवात घटस्थापनेपासून दसर्‍यापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राज्याच्या पर्यटन विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले. या राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे तुळजापुरमध्ये (Tuljapur)धार्मिक विधीबरोबरच राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरील सुप्रसिध्द कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, […]Read More

महाराष्ट्र

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मिळाली मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. १६ : न्यायालयीन आदेशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर स्पष्ट झाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला (SEC) कडक शब्दांत फटकारले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे अंतिम आदेश दिले. न्यायालयाने स्पष्ट केले की ही मुदतवाढ एकदाच दिली जात असून यानंतर कोणतीही मुदत […]Read More

महानगर

मुंबईतील मोनो रेल्वे सेवा तात्पुरती बंद, तांत्रिक सुधारणा होणार

मुंबई, दि. १६ : मुंबई मोनोरेल सेवा २० सप्टेंबर २०२५ पासून तात्पुरती बंद करण्यात येणार असून, ही बंदी एक महत्त्वपूर्ण अपग्रेडच्या तयारीचा भाग आहे. गेल्या काही महिन्यांत दोन वेळा मोनोरेल मार्गातच बंद पडल्यामुळे अनेक प्रवासी अडकले होते आणि त्यांना तासोंतास रेस्क्यू करावे लागले. या घटनांमुळे मोनोरेलच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली होती. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पिंपरी चिंचवडकरांना अनुभवता येणार “रंगानुभूति:

पुणे, दि १६१९ ते २१ सप्टेंबर ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे नाट्य प्रयोगकला महोत्सवाचे आयोजन पिंपरी, पुणे (दि. १६ सप्टेंबर २०२५) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सव २०२५” चे आयोजन १९ ते २१ सप्टेंबर पर्यंत ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, […]Read More

राजकीय

कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी,बावनकुळे यांचा आदेश…

​मुंबई, दि. १६ : — बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ​बैठकीत आर्थिक मुद्द्यांवरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, समाजासाठी प्रलंबित असलेला २९३३ कोटी रुपयांचा निधी पंधरा दिवसांत वितरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ​ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अन्न […]Read More

ऍग्रो

ऑगस्ट, सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यांत१७,८५,७१४ हेक्टर क्षेत्र बाधित

मुंबई दि १६ — “ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, […]Read More

ऍग्रो

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत बांबू परिषद

मुंबई, दि. १६ :- वातावरण बदलाचे संकट रोखून मानव जात वाचवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) व फिनिक्स फाऊंडेशन यांच्यामार्फत मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. दि. 18 आणि 19 सप्टेंबर 2025 मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ही बांबू परिषद होणार आहे. “बांबू फॉर पीपल, प्लॅनेट […]Read More