Month: September 2025

ऍग्रो

बनावट किटकनाशक फवारणीमुळे शेतकर्‍याची कपाशी जळाली…

जालना दि २४: जालन्यात दोन एकरवरील उभ्या कपाशीवर बनावट किटकनाशक फवारल्याने संपुर्ण कपाशी जळून गेली असल्याचे समजले आहे, यामुळे शेतकर्‍याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान शासनांने तात्काळ पिकांचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी व बनावट किटकनाशके विक्री करणार्‍यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी घनसावंगी तालुक्यातील पारडगांव येथील शेतकरी रामेश्वर लिंबाजी सातपुते यांनी […]Read More

विदर्भ

नागपूर-नागभीड मार्गासाठीराज्य शासन रेल्वेला देणार ४९१ कोटी रुपये…!

चंद्रपूर दि २४:- नागपूर – नागभीड या ११६.१५ किलोमीटरच्या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर करण्यात येत आहे. या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सुधारित खर्चास आणि त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार राज्य शासन आपला हिस्सा म्हणून रेल्वेला ४९१ कोटी ५ लाख […]Read More

महानगर

वरळी येथील स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद

मुंबई, दि २३शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आज वरळी प्रभाग क्रं १९७ मधील राजीव नगर परिसरामध्ये माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या वतीने स्वछता मोहीम राबविण्यात आली. या सूचना मोहिमेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सुचिता मोहिमेमध्ये महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी परिसराची संपूर्णपणे साफसफाई करून हा परिसर औषध फवारणी करून फवारण्यात आला. या स्वच्छता मोहिमेबाबत […]Read More

राजकीय

*शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि २३: – राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या संकटकाळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासाठी महायुतीचे सर्व मंत्री पूरग्रस्त जिल्ह्यांचा पाहणी दौरा करणार असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून दिलासा देणार असल्याचे सांगितले. आपण स्वतः ही धारशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक […]Read More

महानगर

ॲमेझॉनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला हातभार

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांसाठी देशाचे आकर्षण आहे. स्वित्झर्लंड मधील दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेतही महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आणली. या परिषदेतच ॲमेझॉनने राज्यात ‘ क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्टर’ क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केला होता. त्यानुसार ॲमेझॉन गुंतवणूक करीत आहे. यापुढेही राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असून कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

संगीत नाटकांचा समृद्ध ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे – डॉ.

पुणे, दि २३संगीत रंगभूमीला १८२ वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. हा समृद्ध ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री डॉ. वंदना घांगुर्डे यांनी केले .पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्य महोत्सवात […]Read More

राजकीय

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. २३: राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात […]Read More

राजकीय

सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले?

मुंबई, दि. २३ : राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा […]Read More

राजकीय

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सज्ज, मदतीसाठी २ हजार २१५ कोटी

मुंबई, दि २३ :- अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या […]Read More

आरोग्य

आयुर्वेद दिवस २०२५: “आयुर्वेद फॉर पीपल अँड प्लॅनेट” पुण्यात जल्लोषात

पुणे, दि २३: आयुर्वेद दिवसाच्या दहाव्या आवृत्तीच्या निमित्ताने, आयुष मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी एक व्याख्यान सत्र आयोजित केले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते डॉ. योगेश कुटे, प्राध्यापक, डॉ. डी. वाय. पाटिल कॉलेज ऑफ आयुर्वेद व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे, आणि अतिथी विशेष होते डॉ. एस. अकबर कौसर, कसिनी […]Read More