Month: September 2025

राजकीय

अण्णा साहेबांनी माथाडी चळवळ निस्वार्थपणे उभारले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीमुंबई, 25 : घर संसार संस्थान इत्यादी गोष्टी कुर्बान करून अण्णासाहेब या महापुरूषाने माथाडी चळवळ निस्वार्थपणे उभारली व लाखो माथाडी कामगारांचे भविष्य उज्वल केले. आज त्यांचा वारसा निस्वार्थ भावनेने ही चळवळ कार्यरत ठेवली आहे. या चळवळीची पाळेमुळे खोलवर गेली असून या चळवळीला कुणीही थांबवू किंवा अडवू शकत नाही. असे गौरवोद्दगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेबांच्या […]Read More

महानगर

राजभवन येथे पं.दीनदयाल उपाध्याय यांना आदरांजली

मुंबई दि २५ : एकात्म मानवतावादाचे उद्गाते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर) राजभवन येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांना आदरांजली वाहण्यात आली.राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी […]Read More

मराठवाडा

हर्षवर्धन सपकाळ मराठवाड्याच्या दौऱ्यावर

छ संभाजीनगर दि २५ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मसई येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि वरिष्ठ […]Read More

विदर्भ

अतिवृष्टीमुळे कपाशी चे प्रचंड नुकसान

वाशीम दि २५: वाशीम जिल्ह्यात झालेल्या अति मुसळधार पावसाने पिकांचं होत्याचं नव्हतं केलं असून कपाशीला या पावसाचा जबर फटका बसला आहे. सततच्या अति मुसळधार पावसानं कपाशीची वाढ खुंटली असून त्याला पात्या आणि बोन्ड कमी प्रमाणात लागली त्यामुळं शेतकऱ्यांचा या कपाशी मधून लावलेला खर्च ही निघणार नाही. आम्ही शेतकरी कायम दुसऱ्यांना उभं करतो आता आम्हाला उभं […]Read More

महानगर

बाणगंगेचे प्रदुषण रोखण्यासाठी महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई, २४ सप्टेंबर – दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावामध्ये रविवारी ‘पितृपक्ष’ निमित्त धार्मिक विधी पार पडले, त्यानंतर तलावात शेकडो मृत मासे तरंगताना आढळले. या घटनेमुळे तलावाच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली जात असून, पर्यावरणप्रेमींनी यावर उपाय सुचवले आहेत. शहरातील एका पर्यावरण कार्यकर्त्याने तलावाच्या प्रदूषणास आळा घालण्यासाठी एक अभिनव शिफारस केली आहे. त्यांनी धार्मिक विधींसाठी बाणगंगा तलावाच्या […]Read More

ट्रेण्डिंग

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर

केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला. आज, २४ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या उत्पादकता-लिंक्ड बोनस (PLB) ला मान्यता देण्यात आली. यासाठी १,८६६ कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले, ज्याचा फायदा १०.९१ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होईल. ७८ दिवसांच्या पगाराइतका हा बोनस दरवर्षीप्रमाणे दुर्गा पूजा आणि दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी नॉन-राजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला […]Read More

देश विदेश

पहलगाम हल्ल्यात मदत करणाऱ्याला अटक

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडवली होती. आता या प्रकरणात जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले असून, हल्ल्याला मदत करणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद युसूफ कटारिया असून, तो लष्कर-ए-तैयबा […]Read More

साहित्य

ज्येष्ठ साहित्यिक एस.एल. भैरप्पा यांचे निधन

बंगळुरु, दि. २४ : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि तत्त्वज्ञ एस. एल. भैरप्पा यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवलेल्या भैरप्पा यांनी ‘पर्व’ आणि ‘आवरण’ यांसारख्या वादग्रस्त आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. बंगळूरु येथील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी बुधवारी (24 सप्टेंबर) दुपारी वाजता अखेरचा श्वास […]Read More

राजकीय

शिवसेनेनं कामगारांच्या प्रश्नाबाबत घेतली माझगाव डॉक व्यवस्थापनाची भेट

मुंबई, दि २४माझगाव डॉक लढावू जहाज निर्मितीच्या कारखान्यातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्यासंदर्भात आज खासदार अरविंद सावंत यांनी माझगाव डॉक कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन श्री. जगमोहन, महाव्यवस्थापक श्री. श्रीनिवास सिन्हा, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. सत्यनारायण प्रधान, उप महाव्यवस्थापक सर्वश्री प्रदीप महाडेश्वर, अरुण केदारे, आणि भारद्वाज ह्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीमध्ये फिक्स्ड […]Read More

महानगर

मुंबई विद्यापीठात पाली भाषा – आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली

आंदोलनकर्ते व कुलगुरु यांची संयुक्त बैठक लावा मुंबई, दि 2४-मुंबई विद्यापीठात पाली भाषा विभागाला स्वतंत्र जागा देऊन इमारत बांधण्यात यावी.महाराष्ट्र शासनाने पालीभाषा विभागासाठी रुपये ५० कोटीची भरीव तरतूद उपलब्ध करून द्यावी. पाली भाषा विभागासाठी कायम व स्थायी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच . पाली भाषा विभाग अनुदानावर आणण्यात यावा अशा मागण्या मेहकरचे आमदार सिदार्थ खरात […]Read More