Month: August 2025

राजकीय

मराठा आरक्षण मागणी, न्या शिंदे समितीला मुदतवाढ, घडामोडींना वेग

मुंबई, दि. २६ : मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. 29 ऑगस्ट रोजी जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येण्याचा निर्धार केला असून हजारो समर्थकांसह ते मुंबईत आझाद मैदानावर पोहोचून उपोषण चालू करणार आहेत.आज (26 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षण आणि त्यासाठी चालू असलेल्या प्रक्रियेबाबत […]Read More

शिक्षण

विद्यापीठाशी संबंधित ५६ अधिसूचित ऑनलाइन सेवा‘आपले सरकार’ पोर्टलवर

मुंबई, दि. २६ :– महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठाशी संबंधित पुरविण्यात येणाऱ्या ५६ अधिसूचित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्रालयात लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विद्यापीठाशी संबंधित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक […]Read More

राजकीय

रिपब्लिकन पक्षाचे साहित्यिकांशी विचारमंथन ~ केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि २६~ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित व्यापक रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी तसेच बदलत्या काळात रिपब्लिकन पक्षाची वाटचाल मजबूत करण्यासाठी साहित्यिक आणि विचारवंतांशी विचार मंथन करून पुढील वाटचालीचे दिशादर्शन करण्यासाठी येत्या दिनांक 27 आणि 28 ऑगस्ट रोजी महाबळेश्वर मध्ये रिपब्लिकन पक्षाचे विचारमंथन शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]Read More

देश विदेश

भारतात इ.स.पूर्व काळापासून लोकशाही संकल्पना

नवी दिल्ली, दि २६ – भारतात इ.स.पूर्व काळापासून लोकशाही संकल्पना रूजलेली आहे. वैशाली गणराज्य, चाणक्य-चंद्रगुप्त कार्यकाळ यावेळी लोकशाही संकल्पनेशी निगडीत अनेक दाखले आपल्याला दिसून येतात. भारतातील संसदीय लोकशाही आणखी बळकट आणि लोककल्याणाभिमुख करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असून पीठासीन अधिकारी यांचे योगदान महत्वपूर्ण ठरणारे आहे, असे मत महाराष्ट्र विधान परिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे यांनी […]Read More

राजकीय

*वसई व जळगांव मधील ‘बविआ’च्या माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये

मुंबई, दि २६शरद पवार गटाच्या जळगाव जि. प. माजी सदस्य संभाजी पाटील, डी. पी. साळुंखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तसेच वसई येथील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक छोटू आनंद यांच्यासह ‘बविआ’च्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आ. स्नेहा दुबे […]Read More

पर्यटन

नांदेड- मुंबई ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे

मुंबई, दि. २६ :–मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

देश विदेश

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी

मुंबई दि.२६.:- लंडनमधील मराठीजनांना आपल्या हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करुन तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने लंडनमधील मराठीजनांना […]Read More

मनोरंजन

तरुणाईच्या संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या ‘बॅच नं. 22’ या चित्रपटाची घोषणा

पुणे, दि २६: आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक तरुण-तरुणींची झुंज सुरूच असते. त्यासाठी गाव सोडून शहरात दाखल होणाऱ्या या तरुणांचे संघर्ष, त्यांच्यातील मैत्रीची नाती आणि ध्येयाप्रतीची निष्ठा याचं चित्रण करणारा, योगीराज किरण एंटरटेनमेंट निर्मित मराठी चित्रपट ‘बॅच नं. 22’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘बॅच नं. 22’  मधील गणरायाचा जयघोष आणि जल्लोष […]Read More

सांस्कृतिक

पूजा, प्रसाद सामुग्रीसह बाप्पाला शैक्षणिक साहित्य अर्पण करा – गणेशोत्सव

मुंबई, दि २६- गणेशोत्सवात, गणरायाचरणी पूजा प्रसादाच्या साहित्यासह , शैक्षणिक साहित्य अर्पण करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन गणेशोत्सव मंडळांचे विश्वव्यापी संघटन असलेल्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि विदर्भ वैभव मंदिर यांनी राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना केले आहे. श्रीगणेशाचे येत्या २७ ऑगस्ट रोजी आगमन होत आहे महाराष्ट्रात १० दिवस गणेशोत्सव मोठ्या […]Read More

ट्रेण्डिंग

गणेशोत्सवानिमित्त राज्यपालांकडून शुभेच्छा

मुंबई दि २६– राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा केवळ राष्ट्रीयच नाही तर वैश्विक उत्सव झाला आहे. गणेशोत्सव लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रासाठी केलेल्या त्याग व समर्पणाचे स्मरण देतो. गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी सामाजिक सौहार्द व एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करतो व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, […]Read More