Month: August 2025

विदर्भ

दिव्या देशमुखच्या घरी जाऊन दिली सरन्यायाधीशांची शाबासकी

नागपूर, दि. २ : दिव्याने यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवला. अवघ्या 19 व्या वर्षी ही दैदीप्यमान कामगिरी बजावत तिने इतिहास घडवला. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बुद्धीबळ विश्व विजेती दिव्या देशमुख हिच्या नागपूरमधील शंकरनगर येथील घरी जाऊन तिला शुभेच्छा देत शाबासकी दिली. आमचे तीन पिढ्यापासूनचे कौटुंबिक नाते आहे, दिव्याचा विजय […]Read More

ट्रेण्डिंग

माघी गणेशोत्सवापासून रखडलेल्या गणेशमूर्तींचे आज विसर्जन

मुंबई, दि. २ : पीओपी गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आज माघी गणेशोत्सवात विराजमान झालेल्या डहाणूकरवाडीतील श्री आणि चारकोपचा राजाचे तब्बल ६ महिन्यांनंतर गणेशभक्तांनी विसर्जन केले. या विसर्जन मिरवणुकीत गोविंदा पथकांनी थर रचून मानवंदना दिली. त्यात साईलीला दहिकाला पथक(गोराई उत्कर्ष दहिकाला पथक, स्वस्तिक महिला गोविंदा पथक, ओम साई माऊली क्रीडा मंडळांचा समावेश […]Read More

ट्रेण्डिंग

महादेवी हत्तीणीबाबत ‘वनतारा’कडून स्पष्टीकरण

कोल्हापूर, दि. २ : जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले. यावरून ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही हत्तीण पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर आता ‘वनतारा’कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. वनताराने म्हटले की, कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठातू अलिकडेच स्थलांतरित […]Read More

सांस्कृतिक

१२७ वर्षांनंतर भारतात आल्या भगवान बुद्धांच्या अस्थी

नवी दिल्ली, दि. २ : तब्बल १२७ वर्षांनंतर, भगवान बुद्धांच्या अस्थी त्यांच्या ‘खऱ्या भूमी’त म्हणजेच भारतात परतल्या आहेत. १८९८ मध्ये उत्तर प्रदेशातील पिप्रहवा येथे या अस्थी सापडल्या होत्या. ब्रिटीश राजवटीत त्या देशाबाहेर पाठवण्यात आल्या होत्या. या वर्षी एका आंतरराष्ट्रीय लिलावात त्या प्रदर्शित करण्यात आल्या. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या भारतात आणण्याचा निर्णय घेतला होता. […]Read More

पर्यावरण

हिमाचलमधील पर्यावरण विनाशाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली, दि. २ : सर्वोच्च न्यायालयाने (SC) हिमाचल प्रदेशातील पर्यावरणीय विनाश आणि अनियंत्रित विकासाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने म्हटले आहे की जर हिमाचलमध्ये बांधकाम आणि विकास योजना वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय अशाच प्रकारे सुरू राहिल्या तर तो दिवस दूर नाही जेव्हा हिमाचल देशाच्या नकाशावरून गायब होईल, देव करो, असे होऊ नये. खरंतर, […]Read More

अर्थ

आर्थिक क्रांतीकडे टाकलेले सक्षम पाऊल

पिंपरी प्रतिनिधी, दि. २ : ‘एक देश एक कर’ या संकल्पने अंतर्गत देशपातळीवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) २०१७ सालापासून आकारण्यास सुरुवात झाली. हे आर्थिक क्रांतीकडे टाकलेले सक्षम पाऊल आहे. यामुळे कर चोरी, कर बुडवणे यावर नियंत्रण मिळवता येईल आणि भारत एक आर्थिक सक्षम देश म्हणून पुढे जाईल असा विश्वास हैदराबाद येथील केंद्रीय कर आयुक्त […]Read More

मराठवाडा

शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार

बीड दि २:– सुप्रसिद्ध कीर्तनकार, जेष्ठ पत्रकार तथा संवेदनशील कवी ह. भ. प. श शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील आध्यात्मिक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 3 ऑगस्ट रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठानचे वतीने मोहन गुंड यांनी दिली. क्रांतीसिंह […]Read More

राजकीय

“सनातन दहशतवाद”? – युवासेनेचा तुफान संताप!

भाईंदर दि २ :– कॉंग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या “भगवा नाही, सनातन दहशतवाद म्हणा” या अत्यंत आक्षेपार्ह व हिंदू धर्माच्या भावनांवर घाव घालणाऱ्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्याचा निषेध करत आज मिरा-भाईंदरमध्ये युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट सर्कल येथे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश […]Read More

महानगर

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आंदोलन

ठाणे, २ : हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत आज युवा सेनेने ठाणे येथील आनंद आश्रम येथे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म, हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधान करत असतील त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. राज्यभरात युवासेनेकडून पृथ्वीराज चव्हाण […]Read More

महानगर

पायाभूत सुविधांचे सुशोभीकरण, मुंबई मेट्रोच्या खांबांचे कलाकृतींमध्ये रूपांतर…

मुंबई दि २ – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपल्या शहराच्या सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा उपक्रमात आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला. मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण २,९५५ खांबांपैकी २,५३७ खांबांवर (८६%) संकल्पनाधारित रंगकाम पूर्ण करण्यात आले आहे. ही महत्त्वाकांक्षी पुढाकार योजना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, तसेच एमएमआरडीएचे महानगर […]Read More