भारत आणि ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी ‘CRIB’ नावाचा एक नवीन आणि अत्यंत दुर्मिळ मानवी रक्तगट शोधला आहे. या शोधामुळे गंभीर आजारांवरील उपचार, गर्भाशयाच्या निदानाची प्रक्रिया आणि जागतिक रक्तदानासाठीच्या नियमांमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कोलार येथील एका 38 वर्षीय महिलेमध्ये हा अनोळखी रक्तगट आढळला आहे. यानंतर त्याला ‘CRIB’ असे औपचारिक नाव देण्यात आले. हा जगातील सर्वात […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ : गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरुन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. यामुळे अनेक महापालिकांच्या निवडणुका तब्बल चार ते पाच वर्षांपासून रखडल्या आहेत. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचे आदेश दिले आहेत. संपूर्ण राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणासह होणार […]Read More
पुणे, दि ४– मानाचा चौथा महागणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानात पुण्यातील विविध गणेश मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध ढोल ताशा पथकातील वादक मित्र असे मिळून तब्बल 561 युवकांनी रक्तदान केले .हे शिबिर रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ […]Read More
मुंबई : गोरेगावं पूर्व येथील नागरी निवारा फेडरेशन ची पंच वार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. विसावा नागरी निवारा ज्येष्ठ नागरिक संघाचे, हिंदुराव वाडते ( अध्यक्ष ), मुकुंद सावंत, सुशील घाग, राजू पायरे, व संतोष कांबळे हे पाच सदस्य नागरी निवारा फेडरेशन, मुंबई वर अटीतटीच्या निवडणुकीत निवडून आल्याने त्यांचा, भव्य सत्कार नुकताच नागरी निवारा प्लॉट नंबर […]Read More
मुंबई, दि ४ : साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे. राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर […]Read More
मुंबई, दि ४काल, दि. ३ ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर (पूर्व) विधानसभा आयोजित रक्तदान शिबिराला ईशान्य मुंबई (UBT ) चे खासदार संजय दीना पाटील यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा सन्मान केला, त्यांच्या सेवाभावी योगदानाचे कौतुक केले.या वेळी आयोजक व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत, सामाजिक उपक्रमांतून जनतेशी असलेली नाळ अधिक दृढ करण्याचा संकल्प […]Read More
भिवंडी:दि.03 ऑगस्ट गणेशोत्सव साजरा करताना त्याचे पावित्र्य राखण्याची सर्वाची जबाबदारी आहे.जेथे शांतता नांदत असते तेथे प्रगती व विकास होत असतो,त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक एकतेच्या भावनेतून सण साजरा करणे आवश्यक आहे.उत्सव साजरा करताना शासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे व कायद्याचे पालन करावे असे असे प्रतिपादन ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांनी केले.ते भिवंडीत पोलिस आयुक्तालयातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव […]Read More
ठाणे, दि ३ :- मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा प्रभाग क्रमांक १७३चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज ठाणे येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा हाती. देत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिंदे यांनी त्यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर केली. यावेळी त्यांच्यासह, […]Read More
मुंबई, दि. 3 ( प्रतिनिधी ) – कर्जत तालुक्यातील नेरळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना लॅपटॉप व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कर्जत तालुका आगरी समाज संघटने तर्फे दहावी-बारावी मध्ये […]Read More
मुंबई दि ३ — मुंबईत कबूतरांना आहार देण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले.लोढा यांनी पत्रात नमूद केले […]Read More