Month: August 2025

ट्रेण्डिंग

BCCI घेणार रोहित शर्माची ‘ब्राँको’ टेस्ट

मुंबई, दि. २९ : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा लवकरच BCCI च्या फिटनेस चाचणीस सामोरा जाणार आहे. ही चाचणी म्हणजेच ‘ब्राँको टेस्ट’ १३ सप्टेंबर २०२५ रोजी बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) येथे घेण्यात येणार आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितची निवड होणार की नाही, हे या चाचणीच्या निकालावर अवलंबून असेल. ‘ब्राँको […]Read More

ट्रेण्डिंग

मराठा आरक्षणासाठी जरांगे समर्थकांसह मुंबईत

मुंबई, दि. २९ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईत दाखल झाले असून, आझाद मैदानावर त्यांनी निर्णायक आंदोलनाची सुरुवात केली आहे. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू झाले असून, सरकारवर दबाव वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, “मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांना […]Read More

ट्रेण्डिंग

जपान भारतात करणार ₹6 लाख कोटींची गुंतवणूक

पंतप्रधान मोदी शुक्रवारी जपानच्या २ दिवसांच्या दौऱ्यावर आले. यादरम्यान त्यांनी टोकियो येथे झालेल्या भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचाच्या बैठकीला संबोधित केले. मोदी म्हणाले की जपान तंत्रज्ञानात एक पॉवरहाऊस आहे, तर भारत प्रतिभेचे पॉवरहाऊस आहे. केवळ तंत्रज्ञान आणि प्रतिभाच नेतृत्व करू शकतात. मोदी म्हणाले की भारत आणि जपानमध्ये सहकार्याच्या प्रचंड शक्यता आहेत. जपानने भारतात पुढील पाच वर्षांत […]Read More

राजकीय

ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि.२९ :– शासनाकडून जनतेला देण्यात येणा-या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात. शासनाची संस्थात्मक बांधणी करताना नाविन्यपूर्ण आणि सातत्याने केलेल्या बदलांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने सज्ज असले पाहिजे. प्रशासनाने लोकाभिमुख सेवा वाढविल्या तरच शासनाचे उत्तरदायित्व वाढेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत सहभागी विभाग […]Read More

महानगर

आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांचा संताप

मुंबई, दि २९ आंदोलनकर्त्यांना जेवण करायला पाणी नसल्याने जेवण करायला अडचण येत आहे. देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेकडून आंदोलनस्थळी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही गावावरून शिधा आणला आहे. जेवण शिजवण्यासाठी भाजी, धान्य, इंधन सर्व काही आहे. मात्र पाणी नसल्यामुळे आम्ही […]Read More

अर्थ

IMF च्या कार्यकारी संचालकपदी RBI चे माजी गव्हर्नर

मुंबई, दि. 29 : RBI चे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाने याबाबतचा आदेश जारी केला. मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने उर्जित पटेल यांच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील कार्यकारी संचालक म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्तीला मंजुरी दिली आहे. आदेशात म्हटले आहे की, ‘उर्जित पटेल यांनी पदभार […]Read More

राजकीय

विविध कंपन्यांशी सामंजस्य करार, ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार

मुंबई, दि २९ : — श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल १७ सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांची एकूण किंमत सुमारे ३३,७६८.८९ कोटी रुपये असून, त्यातून राज्यात सुमारे ३३,४८३ रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, […]Read More

महानगर

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यायचे का हे राऊत, पवार,

मुंबई दि २९– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सदैव मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे, त्यांच्या मागण्या पूर्ण करणारे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावले, या शब्दांत भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र […]Read More

राजकीय

भाईंदर पश्चिमेला शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन !

मीरा-भाईंदर दि २९:– मिरा-भाईंदर शहरात शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक दृढ करण्याच्या दिशेने आज आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. आज देव आंगन, देवचंद नगर, जैन मंदिर (बावन जिनालय) समोर, भाईंदर पश्चिम येथे नव्या शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या प्रसंगी मोठ्या संख्येने […]Read More

सांस्कृतिक

सुपारीपासून बनवले ४ फूट उंची चे पर्यावरणपूरक बाप्पा

वाशीम दि २९:– वाशीमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे दरवर्षी गणेशोत्सवात एक वेगळीच परंपरा दिसून येत आली आहे. गावातील जय भवानी जय शिवाजी शेतकरी गणेश मंडळाकडून सुपारीपासून गणपती बाप्पाची ४ फूट उंचीची मूर्ती साकारण्यात आली आहे.या मूर्तीसाठी एकूण ९ किलो सुपारीचा वापर करण्यात आला. खास म्हणजे मंडळातील ९ सदस्यांनी प्रत्येकी एक किलो सुपारी दिली आणि सर्वांनी […]Read More