Month: August 2025

पर्यटन

प्रसिद्ध सोमनाथ धबधबा झाला प्रवाहित, मोठ्या संख्येत पर्यटक दाखल….

चंद्रपूर दि ११:– चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या सोमनाथ येथे शिवमंदिरापाशी असलेला सोमनाथ धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. उत्तम पावसामुळे जा धबधबा प्रवाहित झाल्याने सुट्टीचे दिवस व अन्य दिवसात देखील इथे पर्यटकांची गर्दी आहे. पर्यटकांसाठी एक सुरक्षित वर्षा सहलीचे स्थळ म्हणून इथे मूलभूत सुविधा देखील उभारण्यात आल्या आहेत. जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागातून जंगलातून आलेले […]Read More

ट्रेण्डिंग

दादर कबुतरखाना प्रकरण- शस्त्र उचलण्याची जैन मुनींची धमकी

मुंबई, दि. १० : मुंबईतील कबुतरखान्यांवरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना अन्न देण्यास बंदी घातली आहे. तरीही, या निर्णयाला डावलून जैन समाजातील काही व्यक्ती कबुतरांना खाद्य पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून आता जैन समाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 13 तारखेपासून […]Read More

ट्रेण्डिंग

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा

पंढरपूर, दि. १० : राज्यात विविध ठिकाणी मराठी भाषेची हिंदीकडून गळचेपी सुरु असण्याचे प्रकार घडून येत आहेत. धक्कादायक प्रकार म्हणजे आता पंढरपूरच्या विठूरायाच्या गाभाऱ्यातही हिंदीचा प्रवेश झाल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चक्क हिंदीतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जातोय. आता थेट मंदिरात हिंदीतून पूजा झाल्याचे समोर आल्यानंतर वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यातही चिघळला कबुतरखाना बंदीचा वाद

पुणे, दि. १० : मुंबईतील कबुतरखान्यावर न्यायालयाकडून बंदी आल्यानंतर आता जैन धर्मियांच्या भावना दुखावून त्यांनी जोरदार आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मुंबईत धार्मिक प्रथा महत्त्वाची की नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे हा बाद चिघळला आहे. त्याचबरोबर आता पुण्यातून देखील कबुतरांना खाणे घालण्याच्या प्रकाराबाबत वाद उफाळून आला आहे. पुण्यातील कबुतरांच्या खाद्यबंदीचं प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. पुणे […]Read More

ट्रेण्डिंग

एअर इंडियाचा Freedom Sale, परदेश प्रवास फक्त ४२०० मध्ये

मुंबई, दि. १० : 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांसाठी खास ‘फ्रीडम सेल’ जाहीर केली आहे. या अंतर्गत तब्बल 50 लाख तिकिटांवर मोठी सवलत दिली जाणार आहे. यामध्ये, देशांतर्गत उड्डाणांची किंमत 1,279 रुपयांपासून सुरू होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संधी फक्त 4,279 रुपयांपासून उपलब्ध केली जाणार आहे. ही ऑफर 10 ऑगस्ट 2025 पासून एअरलाइनच्या […]Read More

महानगर

राणीच्या बागेत होणार अत्याधुनिक मत्स्यालय

मुंबई, दि. १० : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात या कामाला सुरुवात होणार असून, त्याचवेळी लोकप्रिय पेंग्विन प्रदर्शनाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. दोन्ही प्रकल्प १२ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. करांसह या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ६५ कोटी रुपये आहे. जून २०२२ मध्ये बीएमसीने बायसळा प्राणिसंग्रहालयात […]Read More

ट्रेण्डिंग

नाशिकमधील बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेट उद्ध्वस्त

नाशिक, दि. १० : CBI ने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (रेनफॉरेस्ट रिसॉर्ट) येथे भाड्याने घेतलेल्या जागेत काही खाजगी व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयने 8 ऑगस्ट रोजी मुंबईतील रहिवासी असलेल्या 6 आरोपींविरोधात तसेच अज्ञात खाजगी व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. CBI […]Read More

ट्रेण्डिंग

महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापुरात देशातील पहिले अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र

कोल्हापूर, दि. १० : कोल्हापुरातील नांदणी येथील महादेवी हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशानंतर ‘वनतारा’ येथे नेण्यात आले होते. मात्र, आता हा वाद संपुष्टात आला आहे. वनताराकडून कोल्हापूर जिल्ह्यात हत्तींसाठी देशातील पहिले अत्याधुनिक सेटेलाइट पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) ‘वनतारा’ […]Read More

महाराष्ट्र

१ कोटी लखपती दीदी बनवण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य

मुंबई,दि. १० : महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र सरकारचे राज्यात एक कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी आम्ही २५ लाख लखपती दिदी तयार केल्या. यावर्षी आम्हाला आणखी २५ लाख जोडायच्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले. मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन उत्सवात मुख्यमंत्री […]Read More

ऍग्रो

मुसळधार पावसाने कापूस पीक आडवे, शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या…

जालना दि १०:– जालन्याच्या सावंगी तलाव येथे मुसळधार पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जालना तालुक्यातील सावंगी तलाव मंडळातील बरडी या गावात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे या भागातील कापूस पीक आडवे झाले आहे. बरडी येथील शेतकरी सुधाकर गंगातीवरे व प्रभू गंगातीवरे यांनी त्यांच्या एक हेक्टर क्षेत्रावर कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र, […]Read More