Month: August 2025

राजकीय

हत्तीण, कबुतर, वाघ यामुळे महायुती सरकारची अवस्था ‘सर्कसी’ प्रमाणे

मुंबई, दि. १२ :– कोल्हापूरच्या हत्तीणीच्या प्रश्नाने जनतेच्या दुखावलेल्या भावना, दादरच्या कबुतरांच्या प्रश्नाने प्रदूषित झालेले वातावरण, वांद्र्याच्या वाघाने शिवाजीपार्कवर सुरु केलेला फेरफटका, या साऱ्या घटना हाताळतांना महायुती सरकारची ‘सर्कस’ झाली आहे अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते प्रा अनंत गाडगीळ यांनी केली आहे. सर्कसीमध्ये ‘तारेवरची कसरत’, हे एक मोठे आकर्षण असते. कोल्हापुरातील हत्तीण आणि वनतारातील ‘अंबारी’, […]Read More

राजकीय

रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेेत वाढ

मुंबई दि. १२ :– राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) अन्न, धान्याचे (शिधा) वितरण करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेेत वाढ करण्याचा महत्वपुर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यातील […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

मंगळवार, दि. १२ ऑगस्ट, २०२५ (गृह विभाग)महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी (अन्न, नागरी पुरवठा विभाग)राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण. (विमानचालन विभाग)सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध […]Read More

राजकीय

दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्याची परिवहन मंत्र्यांची मागणी

मुंबई दि. १२ – मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोलनाक्या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More

मनोरंजन

‘टँगो मल्हार’ या चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

पुणे, दि १२चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या १९ सप्टेंबरला हा […]Read More

गॅलरी

२०२५ मधील अंतिम चंद्रग्रहण: काय परिणाम होणार? जाणून घ्या राजकीय,

जितेश सावंत ह्या वर्षांतील दुसरे व शेवटचे चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून ग्रहण रात्री २१. ५७ मिनिटांनी सुरु होणार असून मध्य रात्री ०१ वाजून २७ मिनिटांनी संपेल (८ सप्टेंबर). ह्या ग्रहणाचा प्रभाव हा कुंभ राशीवर आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्रावर जास्त असेल. हे ग्रहण पूर्णचंद्र ग्रहण असून हे ग्रहण Asia (आशिया […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अंबाबाई मूर्तीवर सुरू झाली संवर्धन प्रक्रिया, मूर्तीचे दर्शन बंद….

कोल्हापूर दि १२– करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रियेसाठी औरंगाबादच्या भारतीय पुरातत्व विभागाचा चमू काल म्हणजे सोमवारी रात्री कोल्हापूरात दाखल झाला. आज आणि उद्या असे दोन दिवस हा चमू मूर्ती संवर्धन प्रक्रिया पूर्ण करणार आहे. आजपासून मूर्तीचे गाभाऱ्यातील मुख्य मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी बंद झाले. परंतु या दोन दिवसांसाठी भाविकांकरीता उत्सवमूर्ती व मंगल […]Read More

महानगर

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कबुतरखाना बंदी विरोधातील याचिका

नवी दिल्ली, दि. ११ : कबुतरांना खाऊ घालण्याच्या मुंबईतील ‘कबुतरखाना’ प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना दादर आणि इतर ठिकाणी बेकायदेशीरपणे आणि नियम तोडून खाऊ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, या आदेशाविरुद्ध दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाने मुंबई हाय कोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास स्पष्टपणे […]Read More

ट्रेण्डिंग

कवी सौमित्र यांचं मुंबईतलं राहतं घर धोक्यात, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

मुंबई, दि. ११ : अभिनेते आणि कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांच्या अंधेरीतलं राहत्या घराला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मदत मागितीली आहे. मुंबईतील धोकादायक तसंच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पांती कामं जोरात सुरू आहेत. पण यात अनेकदा घर मालकांची फसवणूकही होताना दिसतेय. सौमित्र यांच्या घराच्या बाबतीतही काहीसे असेच घडले आहे. सौमित्र […]Read More

ट्रेण्डिंग

अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात

नवी दिल्ली, दि.११ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव शुल्कामुळे अमेरिकेला होणाऱ्या २ अब्ज डॉलरच्या कोळंबी निर्यातीत गंभीर अडचणी येत असल्याने भारतीय सीफूड एक्सपोर्ट असोसिएशनने वाणिज्य आणि वित्त मंत्रालयांशी संपर्क साधून आपत्कालीन आर्थिक मदत मागितली आहे, असे रविवारी एका निवेदनात म्हटले आहे. असोसिएशनने ‘सॉफ्ट लोन’द्वारे कार्यरत भांडवलात ३० टक्के वाढ करण्याची विनंती केली […]Read More