Month: August 2025

महानगर

दहीहंडी फोडताना मुंबई महानगरात एकाचा मृत्यू तर ९२ गोविंदा जखमी

मुंबई, दि. 16 : वरुणराजाची प्रचंड बरसात सुरु असताना देखील आज मुंबई महानगर आणि परिसरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या थरारक उपक्रमाला गालबोट लागले असून मुंबई महानगरात एक गोविंदाचा मृत्यू झाला असून तर ९२ गोविंदा जखमी झाले तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. प्रा.आ.व्य.कक्ष – ठा.म.पा.:- आज दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी दहीहंडी […]Read More

देश विदेश

ट्रम्प- पुतिन यांची बहुप्रतिक्षित भेट, पुतिन यांनी सर्वांसमक्ष तोडला अमेरिकी

अलास्का, दि. १६ : जागतिक स्तरावर सर्वच माध्यमांचं लक्ष या एका बहुप्रतिक्षित भेटीकडे लागलं होतं. अलास्काच्या एंकोरेज इथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची काल भेट झाली आणि या बैठकीतून पश्चिमी रशियातील तणावावर काही अंशी तोडगा निघाल्याचंही म्हटलं गेलं. शुक्रवारी साधारण तीन तासांसाठी पुतिन आणि ट्रम्प यांच्याल मोठी शिखर बैठक आणि चर्चा झाली. […]Read More

राजकीय

मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी

मुंबई, दि. १६ : मुंबईत पागडी तत्वावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न बरीच वर्षे प्रलंबित आहे.काही इमारती कधीही कोसळतील अशा बेतात आहेत. अशा इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या ५० पागडी धारकांनी शिवसेना उबाठाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray)यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. याप्रसंगी आधी पुनर्वसन केल्याशिवाय पागडीधारकांना इमारतींमधून बाहेर काढू […]Read More

शिक्षण

NCERT ने काँग्रेसला धरले फाळणीसाठी सर्वस्वी जबाबदार

नवी दिल्ली– NCERT ने आपल्या सुधारित अभ्यासक्रमात फाळणीचे गुन्हेगार या मथळ्याखाली एक नवा धडा समाविष्ट केला असून त्यात भारताच्या फाळणीचे सर्व खापर काँग्रेस पक्षावर फोडण्यात आले आहे. त्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. एनसीईआरटीने (NCERT)इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीसाठी नवा अभ्यासक्रम लागू केला आहे. त्यामध्ये देशाच्या फाळणीच्या भीषणतेवर फाळणीचे गुन्हेगार असा एक […]Read More

ट्रेण्डिंग

कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द

मुंबई, दि. १६ : कॅडबरी डेअरी मिल्कने मराठी शब्द रुजवण्यासाठी खास उपक्रम सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रसिद्ध चॉकलेट कंपनीने आपल्या पॅकेजिंगमध्ये एक खास बदल केला आहे, ज्यामुळे आता मराठी भाषा थेट चॉकलेटच्या रॅपरवर दिसत आहे. ‘जरा जरा मराठी…’ या घोषणेसह कॅडबरीने इंग्रजी आणि मराठीतील काही सोपी वाक्ये छापली आहेत. यामुळे सोशल मीडियावरया उपक्रमाचे […]Read More

देश विदेश

पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक

नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनानिमित्त, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) प्रवाशांसाठी एक मोठी भेट दिली. NHAI ने १५ ऑगस्ट रोजी FASTag वार्षिक पास लाँच केला आणि पहिल्याच दिवशी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. योजनेच्या पहिल्याच दिवशी सुमारे १.४ लाख FASTag वापरकर्त्यांनी हा पास खरेदी केला, ज्यामुळे प्रवाशांना त्याची खूप दिवसांपासून गरज होती हे स्पष्ट झाले. FASTag वार्षिक पास […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

पुणे दि. १६ — खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिकअप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक महिला व लहान मुले जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून सांत्वन […]Read More

राजकीय

सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, पहिल्या टप्यात ५० कोटींची

अहिल्यानगार दि १६:– विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्रीक्षेत्र चोंडी येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने चोंडीच्या सिना नदीवर २ बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी १५० कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. संभाव्य पर्जन्यमानः कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता. मराठवाडा […]Read More

गॅलरी

बारवी धरण भरले, पाण्याचा विसर्ग सुरू

ठाणे दि १६ — ठाणे, मिराभाईंदर आणि भिवंडी मनपा हद्दीत पाणी पुरवठा करणारा बारवी तलाव भरून वाहू लागला आहे. मुरबाड तालुक्यात असणाऱ्या MIDC च्या मालकीच्या या धरणातून ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती सोबतच या तीन शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो.Read More