Month: August 2025

महानगर

नवी मुंबईचे मोरबे धरण १००% भरले

पनवेल दि २०– रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण मागील सहा दिवस सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे १०० टक्के भरले आहे. मोरबे धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रात सततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बुधवार दिनांक २० ऑगस्ट रोजी पहाटे ३.१० वाजता मोरबे धरणाचे (१२ मी.× ३ मी. आकाराचे )दोन्ही वक्राकार दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात […]Read More

गॅलरी

अजित पवारांनी घेतला परिस्थितीचा आढावा

मुंबई दि २० — उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या.ML/ML/MSRead More

मराठवाडा

शेतीपिकांत साचले पाणी,शेतांना आले तळ्याचे स्वरूप…

जालना दि २०:– जालन्यात मुसळधार पावसामुळे शेतीपिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जालना जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिके पूर्णपणे जलमय झाली आहेत. पावसामुळे पाडळी शिवारातील शेतांना […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कृष्णा आणि वारणा दुधडी भरून वाहत असल्याने नागरिकांचे स्थलांतर

सांगली दि २०:- सांगली जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस पडत आहे. वारणा नदी पाणी पातळीत वाढ झाल्यानं शिराळा तालुक्यातील चरण-सोंडोली पूल, आरळा- शित्तूर पूल, बिळाशी- भेडसगाव पूल, मांगले -सावर्डे पूल, मांगले- कांदे पूल, कांदे -सावर्डे पूल पाण्याखाली गेले आहेत.बॅरिगेटिंग करून वाहतूक बंद करण्यात आली आहे. कृष्णा नदी पाणी पातळीत देखील वाढ झाल्यानं महानगरपालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट, […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई महानगरात तुफान पाऊस, रेल्वे – विमानसेवा कोलमडली

मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मुंबईत २४ तासांत ३५० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला, ज्यामुळे अनेक भाग जलमय झाले बरसलेल्या तुफान पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. शहरातील अनेक भागात पाणी साचले तसेच रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक सेवाही ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. अंधेरी, दादर, सायन, हिंदमाता यांसारख्या परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प […]Read More

महानगर

मोनोरेलचा थरार अन् सव्वा तासानंतर १०० प्रवाशांची सुटका

मुंबईत पावसाने हाहाकार माजवला आहे. रस्ते जलमय झाले आहेत. तर, रेल्वे सेवा देखील ठप्प झाली. त्यांनतर आता मोनो रेल देखील बंद पडली. भक्तीपार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान मोनो रेल बंद पडली 100 प्रवासी आत अडकले. एकजण बेशुद्ध पडला. घाबरलेल्या प्रवाशांनी मोनो रेलच्या काचा फोडल्या. संध्याकाळी 6.15 च्या सुमारास चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान मोनो ट्रेन […]Read More

सांस्कृतिक

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८

पुणे प्रतिनिधी : मुस्लिम धर्मियांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैगंबर यांची जयंती यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला असली तरी याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने धार्मिक सलोखा राखण्यासाठी पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे सिरत कमिटीने घेतला आहे. सुरत कमिटीच्या या निर्णयाचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागत करत कमिटीचे […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई महानगरात तुफान पाऊस, रेल्वे – विमानसेवा कोलमडली

मुंबई. दि. १९ : मोनोरेलमध्ये अडकले प्रवासीचेंबूर ते भक्ती पार्क धावत असताना मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि मोनोरेल जागीच थांबली. सुमारे सव्वा तासांनंतर या मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. या दरम्यान, अनेकांचा जीव गुदमरला, अनेकांचा जीव टांगणीला लागला. त्यामध्ये भीतीने गांगलेल्या प्रवाशांनी हात जोडल्याचे दिसून आले तर एका प्रवाशाने काच फोडून मोकळा श्वास घेण्याचा […]Read More

क्रीडा

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

मुंबई, दि. १९ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यावेळी निवड समितीने अनुभव आणि युवा खेळाडूंचा समतोल साधलेला संघ निवडला आहे. ही टी-२० स्वरूपातील स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात (UAE) येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार […]Read More

पर्यटन

प्रवासात अधिक सामान नेल्यास रेल्वे आकारणार 6 पट दंड

मुंबई, दि.१९ : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या बॅगेच्या किंवा कार्टनच्या आकारासोबतच त्याच्या वजनाकडेही लक्ष द्यावे लागेल. जर बॅग हलकी असेल पण आकाराने मोठी असेल आणि जास्त जागा व्यापत असेल तर तुम्हाला प्रवास तिकिटासह सामान बुक करावे लागेल. जर तुम्ही ते प्री-बुकिंग केले नसेल, तर तुम्हाला निश्चित सामान शुल्काच्या 6 पट जास्त शुल्क भरावे […]Read More