Month: August 2025

देश विदेश

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप – लोकसभेत १२ तर राज्यसभेत १४

नवी दिल्ली, दि. २१ : २१ जुलैपासून सुरू झालेल्या संसदेतल्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करत अधिवेशन संपल्याची घोषणा केली. या महिनाभर चाललेल्या अधिवेशनात लोकसभेत १२ तर राज्यसभेत १५ विधेयकांना मंजुरी मिळाली. अधिवेशनात एकूण १२० तासांच्या चर्चेची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र […]Read More

देश विदेश

ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक संसदेत मंजूर

नवी दिल्ली,दि. २१ : भारताच्या संसदेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे देशातील ऑनलाईन मनी गेमिंगवर कठोर बंदी घालण्यात येणार आहे. “ऑनलाईन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन विधेयक 2025” हे विधेयक दोन्ही सभागृहांत बहुमताने मंजूर झाले असून, यामुळे सट्टा, जुगार, फँटसी स्पोर्ट्स, रमी, पोकर आणि तत्सम पैशांचे व्यवहार असलेले गेम्स पूर्णतः बेकायदेशीर ठरवले जातील. सरकारने […]Read More

राजकीय

या राज्यात १८ वर्षांवरील व्यक्तीला मिळणार नाही आधारकार्ड

गुवाहाटी, दि. २१ : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी आज घोषणा केली की, बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापासून रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात १८ वर्षांवरील लोकांना पहिल्यांदाच आधार कार्ड मिळणार नाही. जर १८ वर्षांवरील लोकांना अद्याप आधार कार्ड मिळाले नसेल तर त्यांना फक्त एक महिन्याची मुदत दिली जाईल, असे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. […]Read More

ट्रेण्डिंग

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास

मुंबई, दि. २१ : गणेशोत्सव अगदी आठड्याभरावर आलेला असताना कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य सरकार विविध सवलती जाहीर करत आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर […]Read More

ट्रेण्डिंग

पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद

मुंबई, दि. २१ : जैन समाजासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्यूषण काळात दोन दिवस म्हणजेच २४ आणि २७ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.पर्यूषण पर्वाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून कत्तलखाने बंद ठेवण्याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. जैन समाजासाठी पर्यूषणकाळ पवित्र मानला जातो. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि […]Read More

बिझनेस

२९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर

मुंबई, दि. २१ : सरकारने ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर केल्यानंतर लुडो क्लासिकसारखे ऑनलाइन गेम बनवणारी कंपनी नझारा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांत एकूण २९% घसरण झाली आहे. Nazara Technologies चे रिअल मनी गेम्सशी अप्रत्यक्ष व्यवहार आहेत. कारण पोकर कंपनी मूनशाईन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्यांचा ४६.०७ टक्के हिस्सा आहे. या विधेयकात भारतात […]Read More

क्रीडा

Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी

नवी दिल्ली, दि. २१ : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यावर बंदी घालणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी कारण देताना क्रीडा मंत्रालयाने आशिया चषक ही स्पर्धा दोन देशांमध्ये नव्हे तर अनेक देशांमध्ये आहे, त्यामुळे या स्पर्धेतील भारत-पाक सामना रोखणं योग्य होणार नाही असं […]Read More

अर्थ

12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा

नवी दिल्ली, दि. २१ : केंद्र सरकारनं आता 5 टक्के आणि 18 टक्के GST स्लॅब सुरु ठेवले आहेत 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे बंद होणार आहेत आज झालेल्या बैठकीत मंत्रिगटानं केंद्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे. सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के या चार पैकी दोन […]Read More

सांस्कृतिक

शिवसेना पक्ष आयोजित “चला खेळूया मंगळागौर” कार्यक्रम उत्साहात !

*ठाणे दि २१:– मिरा-भाईंदर शिवसेना शहर आयोजित “चला खेळूया मंगळागौर” हा पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम बुधवार, दिनांक २० ऑगस्ट रोजी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या पाच वर्षांपासून श्रावण महिन्यात पारंपारिक शिवसेना महिला आघाडीमार्फत या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन होत असून यंदाही तब्बल ३१ महिला गटांचा सहभाग नोंदवला गेला होता. या कार्यक्रमात […]Read More

कोकण

रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली,बचाव कार्य सुरू

अलिबाग दि २१–रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली असून, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे. घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ, आणि नौदालाच्या गस्त नकाद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र अपघात […]Read More